आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही पाने वार्यावर थरथरली होती
पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती
वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती
अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती
कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ जराशी उडली होती....
अनंत ढवळे..
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा