गझल

गझल

अफवा

मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा

काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा

दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा

सारखे वाटते मरुन जावे..
हा असा काय आलाय थकवा?

निघुन जाईल हा 'आज' सुद्धा..
काय घडले तरी काल, परवा?

'देव' ही

गझल

मान ठेवा कशास कोणाचा
कोण होईल दास कोणाचा

एकमेकांस वाहुनी पाहू
भार होतो कुणास कोणाचा

केवढा खिन्न वाटतो रस्ता
ठप्प झाला प्रवास कोणाचा

शेकडो हूड छोक-यांमध्ये
एक मुलगा उदास कोणाचा

ईप्सिते क्लिष्ट होत जाणारी
काय तगणार ध्यास कोणाचा

भुलवणे ही तुझी नशा मानू
गुंतलो तो विलास कोणाचा

-विजय दिनकर पाटील

नाव रिकामी

नाव रिकामी लाटांवरती डोलत होती
कथा कुण्या सफरीची त्यांना सांगत होती

वादळ वेशीबाहेरच घोंघावत राहू दे
- मनोदेवता रोज प्रार्थना ऐकत होती

काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती

डोळे दिसले आरश्यामधे लाल सकाळी
एक आठवण पूर्ण रात्रभर बोचत होती

बेत स्वतःचे मनुष्यप्राणी ठरवित होता
एक

गझल

यायचा हाती कसा हा गंध पळता
रानवा-याच्या पुढे मागे न करता

खिन्नता दाटून आली उतरताना
पाहिजे होता तुझा आलेख चढता

अवकळा आली कशाने ह्या घराला
कोण आहे येथला कर्ता सवरता

नाटकामध्ये तसे काहीच नव्हते
वाटला रोमांचकारी मंच हलता

पायरी बदलायची नाही कुणाला
पाहिजे सोपान सा-यांना सरकता

-विजय दिनकर पाटील

क्षण तो सोसाट्याचा होता

क्षण तो सोसाट्याचा होता
वळिव तुझ्या स्पर्शाचा होता

माझ्या हाती फुलल्या बागा
गुण तुझिया पायाचा होता

माझ्या इवल्या आनंदावर
डोळा या विश्वाचा होता

सारे काही वाहुन गेले
पूर अहंकाराचा होता

आता बस इतके आठवते
बार तुझ्या नावाचा होता

बस माझ्या डोळ्यांची होती
घाट तुझ्या देहाचा होता

त्या कविता वा गझला

आपण

--------------------------------

खिन्न अंधारासवे आपण
क्षुद्र काही काजवे आपण

पंख होते आपल्यालाही
पाहिले नुसते थवे आपण

केवढा झाला जुना फोटो
केवढे झालो नवे आपण

वाढली नाही कधी तृष्णा
पीत गेलो आसवे आपण

एक वाहत राहिले पाणी
दोन झालो कालवे आपण

शोधते हे जग कधीपासुन
सापडायाला हवे आपण

-ज्ञानेश.

--------------------------------

बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली...

बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
व्यक्त करण्या प्रेम माझी जीभ ही अडखळत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

बोलण्या जन्मास आली आणि हिंसक बनत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
विखुरली धर्मात गेली, जात

थांग मनाचा कधी गवसला

थांग मनाचा कधी गवसला ?
हा प्रवास तर मृगजळातला

धूळ जांभया देत पसरली
धूळ बघत रस्ता पेंगुळला

एक जुना अलबम उरलो मी
लोखंडाच्या पेटीमधला

सांग तुझ्या आकाशामधला
तुला कोणता तारा हसला ?

ह्या पोटाची सब्बल झाली
जन्म कसा अवघा उचकटला

समूळ आलो येथे मी पण
कोण मूळचा आहे इथला

शेर तुझ्यावर लिहिला आहे

ते होत्याचे नव्हते झाले
दुःख सुखाच्या इतके झाले

बरे बोललो आपण आता
दोघांचे मन हलके झाले

पुढे निघाले काही रस्ते
काही वसले, इथले झाले

बघता बघता जमल्या इच्छा
मन इच्छांचे घरटे झाले

पुन्हा एकदा भुकंप आला
तुकड्यांचेही तुकडे झाले

शेर तुझ्यावर लिहिला आहे
तुझ्यासारखे मिसरे झाले

जयदीप

वाहते चुपचाप आहे खोल पाणी

वाहते चुपचाप आहे खोल पाणी
अनगिनत अंतःप्रवाहांची कहाणी

वेगळे आयुष्यभर संसार केले
एक राजा आणि त्याची एक राणी

सांग, नक्की काय झाले काल रात्री ?
जाग का आली तुला ओशाळवाणी ?

काळ तर आलाय मित्रा प्लॅसटिकचा
वाजवू इतकी नये कलदार नाणी !

संशयालाही जराशी ठेव जागा,
हे कसे असणे तुझे