गझल

गझल

शुन्य शुन्यातुन वजा

मारल्या गप्पा स्मशानी अन निघाली माणसे
शुन्य शुन्यातुन वजा झाले म्हणाली माणसे

एक पुटपुटला म्हणे गेलाय का नक्की बघा...
चांगली सुस्तावता अस्वस्थ झाली माणसे

'गझल, मदिरा, आसवे, अनुपस्थिती नशिबी तिची'
द्यायला खांदा मला ही चार आली माणसे

"या न पिंडाला शिवा", पिल्लांस बोले कावळा
"शिवत होती बाटग्याला काल साली माणसे"

जन्मभर

ओळ्खीचे


देऊन गेले झळा ओळ्खीचे
कापून गेले गळा ओळ्खीचे

भिरकावला दगड गर्दीत जेव्हा
ये , रक्त ये भळ्भळा ओळ्खीचे

आक्रोशतो भ्रूण  वाटेवरी तो (वृत्तात आहे का ?)
फेकून गेले लळा ओळखीचे

वार्‍यासही राख सांगे धरूनी
जाळून गेले मळा ओळ्खीचे

या, गाव साक्षर करू, बोललो अन
मोडून गेले फळा ओळ्खीचे

हे दु:ख

रक्तातल्या रसांनो

वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो

कोणीच जन्म घेण्या केला न अर्ज येथे
रागावता कशाला विक्षिप्त माणसांनो?

मी तर तयार होतो सोडायला जगाला
ना एकजूट झाली तुमचीच साहसांनो

आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो

मी ओसरी भटाला देऊन चूक केली
फोफावता किती रे

सांग ना

रोज रोज मज हवेत भास का तुझे
सांग ना तरंगतात श्वास का तुझे?

बोललो कुठे? अनंत काळ लोटला
अजूनही कणाकणात भास का तुझे

सांग काय माखलेस पाकळीत तू
जाळती मरंदही फुलास का तुझे

येउनी समोर आज मौन तू जरी
बोलतात शब्द-शब्द श्वास का तुझे

लावता सुगंध तूच घेरतो मला
गंधही

र॑ग अपुले मिसळले नाही.....

र॑ग अपुले मिसळले नाही
जीवना रे हे बरे नाही


एक पुस्तक मी कवीतेचे
जे कधी तू वाचले नाही


सा॑गतो आहे कुणी वेडा
प्रेम केले पाहिजे नाही


वाग दुनियेशी जपूनी तू
लोक माझ्यासारखे नाही


शेवटी माणूस आहे मी
रक्त माझे पा॑ढरे नाही.......


                       -वैभव देशमुख


 


 


 

जाणीव

आभास होत मजला आवाज येत होता
जो तो खुल्या दिलाने मज दोष देत होता

रेंगाळल्या नभाला पाहून समजले.. तो -
बरसून मजसि त्याचे अस्तित्व देत होता

करण्यास नाव पुढती अनमोल देह झिजला
नावासहीत अंती तोही चितेत होता

कंटाळल्या जिवांनी घरटेच लांब नेता..
ती ही खुशाल होती, तो ही मजेत होता

उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे

सवयीने मज प्राण वाटला 'बधीर झालेला आहे'
उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे

तिला वाटतो बहुरंगी मी विदुषक, वेडा, नर्तकही
आज म्हणाली पहा सख्यांनो फकीर झालेला आहे

द्वारपाल, संरक्षक, कुत्रा, सेवक, रंजक, भोईपण
कष्ट काढले मी अन  भलता वजीर झालेला आहे

रोज रोज आळीपाळीने सूर्यचंद्र येउन जाती
थट्टा माझी करण्या जो तो

शापीत

 तो घाव हृदयातला,नाही दुखावणारा
थोडाच त्रासणारा,भलता लुभावणारा.

काही न सांगता तू ,मज समजली कहाणी
होता तुझा उसासा,सारेच सांगणारा.

त्याचा नको करु तु,छाती पिटुन धावा
शापीत देव इथला,कोणा न पावणारा.


शोकात फार इतका,परिवार तो बुडाला
 त्यांच्या घरात मेला,कोणी कमावणारा.


होण्यास राख मी ही,भलता अतुर होता
जळले स्मशान,उरलो, मी फक्त पाहणारा.

हे

नवरे

द्यूतात लावणारे धर्मात याच नवरे
एकाच बायकोच्या भोगात पाच नवरे

भरली मनात कोणी लावण्यखाण परकी
पत्नीस टाळण्याची देतात लाच नवरे

संसार जोडताना मरतात बायका अन
पाहून बारबाला करतात नाच नवरे

विश्वास बायकोचा रामासही न होता
शंकेत देत जाती ज्वालात आच नवरे

हुंडा लगाम यांचा, चाबूक पौरुषाचा
मारी विवाह-घोड्या पोटात टाच

रद्दी

न्हाऊनि येता अशी,ती  केस झटके रेशमी.
बदलती वारे अचानक "मतलबी" बेमौसमी..


गोड होती फार म्हणुनि काल कौटाळिलि जीला.
फेकली रद्दीमध्ये मी कालची ती बातमी..


चालुनी गेलो कुठे मी..लागला चकवा असा.
पावलांचा हाय माझ्या..काढतो रे माग मी..



वेदनांची रांग मोठी पाहिली मी अंगणी
पाळणारा कोण ऐसा भेटतो का नेहमी?



मी चितेवरि