गझल

गझल

मोजके

आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके

रडवून कोण गेले, हिशोब ना कधी
जपले मनात ओले रुमाल मोजके

अलवार आठवांची अबोल पावले
पिंगा भरात घाली टपाल मोजके

मी टाळतो कितीदा तरी पुन्हा पुन्हा
ये बोलण्यात माझ्या जहाल मोजके

देती मनूकथांचे सदैव दाखले
आहे अजून त्याचे हमाल मोजके

कमळ नव्हे पण गुलाब तू तर - सुनेत्रा सुभाष

कमळ नव्हे पण गुलाब तू तर
बेगम कसली? नवाब तू तर

 

डोळ्यामध्ये विरघळतो मी
नाजुक माझी बाब तू तर

 

क्षीर पिणार्‍या हंसाला का
बदके म्हणती खराब तू तर?

 

ह्रदयी माझ्या हळूच शिरते
मम श्वासांचा रूबाब तू तर

 

मूग गिळोनी बसले सारे
विचार 'सुनेत्रा' जाब तू तर

 

आता पुरे टवाळी - सुनेत्रा सुभाष

आता पुरे टवाळी इतुकी न स्वस्त बाई
जोडेल शुद्ध नाती लावेल शिस्त बाई

 

अबला कशास म्हणता? आहे बला खरी ही
लपले बिळात त्यांना करणार ध्वस्त बाई

 

उमला मुक्या कळ्यांनो उधळीत गंध अपुला
जपण्यास आत्म निष्ठा घालेल गस्त बाई

 

गर्भातल्या कळीला जर मारशील माते
जननी जरी जगाची होशील फस्त

जीवन विनोद आहे

आलेय मूल्य माझ्या येथे नसायलाही
शोधायचो सबब मी तेव्हा असायलाही

सारे हुषार आता बेरोजगार झाले
माणूस पाहिजे ना कोणी फसायलाही

ढकला उद्यावरी जो संकल्प सोडला तो
'मदिरागृहात जाऊ नुसते बसायलाही'

माझी जरूर लागे "वा, वा" म्हणायलाही
मैफील संपली की फरश्या पुसायलाही

बिलगे हवा तशी ती, जगवे हवा तशी ती
आणी

स्वप्नं मोहरणार...

स्वप्नं मोहरणार.. बघ आता पुन्हा
ही फुले फुलणार बघ आता पुन्हा

मज वसंताने दिला आवाज हा..
पालवी फुटणार बघ आता पुन्हा

काय होते त्या क्षणांचे मागणे ?
प्रश्न हा पडणार बघ आता पुन्हा

दशदिशांना गुंजती ताना तुझ्या
चंद्र गुणगुणणार बघ आता पुन्हा

मिसळुनी जाईल... अपुले गीत हे
स्वर असे जुळणार

मनात काही


आहे मनात काही
नाही खिशात काही!


नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?


आषाढ हा कसा रे?
नाही नभात काही


नेईल काय कोणी?
नाही घरात काही


दे दुःख, आसवांची
नाही ददात काही


माझे असेच आहे
नाही कशात काही



(जयन्ता५२)

 

किती दिवस मी रदीफ व्हावे

किती दिवस मी  रदीफ व्हावे बोल सख्या रे
मीच काफिया ओळख माझे मोल सख्या रे

 

कशी  अवेळी  अशी  टपकते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे

 

ते   तेव्हांचे  गीत  गुलाबी  अता  कशाला?
जरी  हवेसे  बुडवी  मज  ते खोल सख्या रे

 

मम ह्रदयाची सतार सुंदर वाजत

जाहला बराच वेळ...

==========================
जाहला  बराच  वेळ, हात आपले  अता  सुटायला  हवे,
थांबले  असेल  दु:ख  एकटे  घरी, मला  निघायला  हवे..

जाणवेल  रे  कशी  घरास  त्याशिवाय  पावसातली  मजा?
दु:ख  कोठलेतरी  छतामधून  सारखे  गळायला  हवे...

केवढ्या  बधीर  होत  चालल्यात  जाणिवा  सुखामुळे  अता,
शल्य टोकदार  कोणतेतरी  कुठेतरी  रुतायला  हवे..

या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे 

आता


मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता

काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता

पेच माझी  मी’पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!

साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता

सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता

जन्मत

ओठी तुझ्या..

ओठी तुझ्या गझल माझी
बघ कुठवरी मजल माझी


ही काळजाच्या किनारी
शब्दासवे सहल माझी


हल्ले किती त्या सुखाचे
दु:खे परी अचल माझी


सुकले जरी ओठ माझे
ही लोचने सजल माझी


दुनियेस ह्या का न समजे?
ही वेदना सरल माझी


नजरेस तू नजर देता
झाली सफल गझल माझी


(जयन्ता५२)