गझल

गझल

वरून शांत शांत वाटते किती...

वरून शांत शांत वाटते किती...
मनातल्या मनात वादळे किती !

तुझी अजून वाट पाहणे किती....
क्षणाक्षणामधील ही युगे किती...

कसे कळेल काय पाहिजे तुला?
तुझे तुला खरेच समजले किती?

विरून संपतात 'शब्द' शेवटी
हवेत बोलतात माणसे किती !

बरेच सोडवून प्रश्न टाकले !
अजून या 'भ्रमात' उत्तरे किती ...

कसा

तुझी आभाळपुण्याई तुकोबा

नको टांगूस माझी लक्तरे ही
जगाला सांगतिल सगळे खरे ही

सयी सांभाळणारे पूर होते
'तशी'.. काठावरी काही घरेही

पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही

जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही

जरासे मौन घे आकाशगंगे
(किती वाचाळ आहे बापरे ही !)

निघू शतपावलीला सोबतीने
पहा

हा स्वत्वाचा तपास मानू आता

गझल - हा स्वत्वाचा तपास मानू आता

हा स्वत्वाचा तपास मानू आता
चल देहाला लिबास मानू आता

जेथे तेथे 'मी'च आडवा येतो
हे कळणेही विकास मानू आता

लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता

टोल फक्त मरणाचा द्यावा लागे
जन्माला बायपास मानू आता

केव्हाची आनंदी वाटत आहे
मनस्थितीला

अमल

खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल
पसरला गावावरी पिवळा अमल

हात एकच मार स्थित्यंतर घडव
फार झाले तेच ते छुटपुट बदल

सर्व पुंजी फुंकुनी आलास पण
वाटली कोठे तुला खर्चिक सहल

आक्रमण कर आणि हो की मोकळा
युद्धनीतीवर किती करतोस खल

जिंकला कोणी कसा शिकणे नको
तो कसा स्पर्धेत ह्याचे कर

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो
वा कुणी ना पोचते जेथे असे आभाळ हो

जाणत्यांच्या संस्कृतीला राहिलेला गर्भ तू
संपण्याची आणखी आरंभण्याची नाळ हो

तू नको खर्चूस ही माणूसकी जेथे तिथे
बस् कधी पडणार नाही जो असा दुष्काळ हो

येथले अस्तित्व कठपुतळीप्रमाणे मान तू
काळ आला आपला की आपला तू

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे

एकदा शून्यास माझ्या तू वजा कर...

सांग तू... शंका तुला छळते किती ते
मोकळे आकाशही भरते किती ते...

एकदा स्वप्नातुनी सत्यातले बघ....
एकटे हे चांदणे सलते किती ते

सांग तू...समजाव तू आता स्वतः ला...
पाहतो आता तुला कळते किती ते !

एकदा शून्यास माझ्या तू वजा कर...
अन पहा ... बाकी तुझी उरते किती ते

तू

इरेला पेटला आहे पिसारा

सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा

तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा

तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा

तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा

किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा

अजुन तुडवीत आहे पाय काटे

खुल्या मनाने

खुल्या मनाने हसून घे
हवे तसे तू जगून घे

झुगार संकेत, बंधनांना
हवे तसे बागडून घे

सभोवतीच्या मनामनांना
दवाप्रमाणे टिपून घे

उद्या कदाचित् नसेन मी
भरून डोळे बघून घे

करीत जा मेहनत गड्या
पगारही वाढवून घे

नेहमी गर्दी तुला जी लागते

वर्षभर दुथडी भरूनी वाहते....
ही नदी कोठून पाणी आणते?

वाळवंटावर मनाच्या वाढते
आठवांचे रोप कोणी लावते...

कुंपणावरतीच आहे बहरते
वेलही लाचार झाली वाटते

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
अन् ढगाला कोसळावे लागते!

नेहमी गर्दी तुला जी लागते
केवढी माणूसघाणी वागते!

जयदीप