प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे
चेह-यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे
धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे
दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे
बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे
--डॉ.कैलास गायकवाड
गझल
प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे
चेह-यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे
धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे
दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे
बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे
--डॉ.कैलास गायकवाड
हसवणारे, खिदळणारे इथे कोणीच नाही
रिते अंगण, मुकी दारे.. इथे कोणीच नाही
मनाला त्रास देणारे हजारो भेटलेले
मनाला शांत करणारे इथे कोणीच नाही
कुणावरती लिहावे मी ? कुणाचे गीत गावे ?
फुले, पाने, नदी, वारे..इथे कोणीच नाही
कुठे गेला जुना कट्टा ? कुठे गप्पा हरवल्या?
गड्यांनो, या, पुन्हा या रे...इथे
वाटते मोठी जगाला भूक माझी
चव बदलली हीच झाली चूक माझी
शेर दूरच एकही मिसरा न सुचतो
वेदना भलतीच झाली मूक माझी
एक पश्चाताप बघतो अंत आहे -
का तुला होती दिली बंदूक माझी!
ऎकले आहे तुला ती साथ देते...
आठवण येते जरी अंधूक माझी
शेवटी निर्ढावलेले प्रश्न रडले
उत्तरे
जागरण डोळ्यांमधे आता लमाण्यासारखे नाही
स्वप्न आता एकही उरले पहाण्यासारखे नाही
हे म्हणत आम्ही किती अगतिक सुखाने राहतो येथे,
"राहिले आहे शहर आता रहाण्यासारखे नाही"
पाहता दिसते कुठे प्रतिबिंबही कोठे पिता येते
राहिले पाण्यामधे काहीच पाण्यासारखे नाही
मेंढरू प्रत्येक दुसऱ्या मेंढराला सांगते आहे,
"मी अलग, माझे अलाण्या वा फलाण्यासारखे नाही"
अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !
सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो
वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो
रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो
त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो
मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो
तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो
मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय
दगडामध्ये थोडे पाणी असते
बाबामध्ये थोडी आई असते
तो लिहितो ते समजत नाही आता
अश्रू हल्ली त्याची शाई असते
रस्ता देतो ....त्याला अडवत नाही
ज्याला माझ्यापेक्षा घाई असते
स्वप्न तुझे मी पाहत असतो तेव्हा
झोप उगाचच माझी जागी असते
जीव अडकल्यावरती सोडत नाही
आठवणींची असली जाळी असते
.....जयदीप
वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही
हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही
झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही
म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही
घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही
संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही
दुःखे
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
का प्रपातासारखी ती आज कोसळली तिथे
ज्या क्षणाला जायला ती घ्यायची कित्येक क्षण
हेच अभ्यासायचे राहून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण
तेवढे सोडून सारे साजरे केलेत मी
श्रावणापासून येथे जे सुरू होतात सण
सोबतीला ठेव
ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली
सावलीने साथ नाही सोडली
स्वप्न माझे जागलेले रात्रभर
अन् पहाटे झोप येऊ लागली
लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली
लागुदे जर ऊन आहे लागते
सावलीमध्ये हरवते सावली
रोज आकाशात तारा जन्मतो
काजव्याने कात असते टाकली
जयदीप
का विश्वासच उरला नाही छातीवरती
सवलत मागत उठतो जो तो जातीवरती
इंद्रधनूचे रंग तुझ्या जर हातामध्ये
कशी दिसेना हिरवी नक्षी मातीवरती
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती
चला जरा ही सुंदरतेची व्याख्या बदलू
ठरवायाचे कुठवर नुसत्या कातीवरती
इथेच सारे दिले-घेतले वसूल कर तू
मला नको