दिवाळी अंक २००८

माणुसकीही मरण्याच्या बेतात जणूं

माणुसकीही मरण्याच्या बेतात जणूं
जीवन इथले सरण्याच्या बेतात जणूं...

वाहत जातो घटिकांचा हा ओघ असा..,
घागर वाटे भरण्याच्या बेतात जणूं.....

धावत असतो जो तो मिथ्याच्या मागे,
..सत्य भयानक धरण्याच्या बेतात जणूं...

आजवरी मी लढलेला जोशात किती..!
आज कसा पण हरण्याच्या बेतात जणूं...

ती जाताना सोबत नेते सर्व ॠतू..
...श्रावण उरतो

तयारी...



करा माणसे जोडण्याची तयारी
दुरावे पुन्हा तोडण्याची तयारी

यशाची असे भूक त्यांची निराळी
खरे बोलणे सोडण्याची तयारी...!

दिसे नाव यादीत पहिलेच माझे..;
तरी चालली खोडण्याची तयारी...!

कुणाच्या पुढे वाकण्याचा न बाणा
मनाची जरी मोडण्याची तयारी..!

गरीबीमुळे एक वरदान लाभे..,
पहाडासही फोडण्याची तयारी..

कशाची करी रोज घरदार घाई..?
जणू गावही सोडण्याची तयारी...!

सदा राखतो मी मनी दांभिकांना..
पुराव्यानिशी झोडण्याची तयारी...

-- संतोष कुलकर्णी


एवढीही आठवण येऊ नये




एवढीही आठवण येऊ नये
एवढे कोणामधे गुंतू नये

हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये, बोलू नये

जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये

-- अनंत ढवळे


उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो

उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो
नको तिथे मग स्वभाववश मी गुंतत गेलो
प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो

प्रेम तुझ्यावर असे अम्ही बेसुमार केले
दिसेल त्यावर तुझ्या कल्पना लादत गेलो

तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो

सरता सरता

तोडले संबंध इतके जाहले



तोडले संबंध इतके जाहले
आणखी डोकयातले तण वाढले

काळ हा इतिहास हा की दु:ख हे
आपल्या वर्षांमधे जे तुंबले

व्हायचे जे तेच झाले शेवटी
केवढे जन्मावरी घण घातले

येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले

रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले

सावल्यांनो संपवा आतातरी
वैर जे आजन्म होते पाळले....

-- अनंत ढवळे

तसा कुठे मी....


तसा कुठे मी धर्माच्या चौकटीत बसतो
कधी तरी देवळात जातो पाया पडतो

काही तू, काही मी ठरलेले होते पण
अनेकदा मी, मीच मला बोलावत असतो

थेट तुझ्याशी बोलून काही साधत नाही
अनुत्तरित प्रश्नांचा गठ्ठा मागे उरतो

मला पाहिजे काय मला हे कुठे उमगले
मागी बनुनी दिशा दिशा धुंडाळत फिरतो

माणुस

तेंव्हाही


मनात माझ्या काहिच नव्हते पण तेंव्हाही
उगाच होते केले मी भांडण तेंव्हाही!

तुझा शोध घेण्यासाठी मी फिरून थकलो
निवांत मिटले डोळे... वणवण तेंव्हाही...

मिठीत येता सर्व गुन्ह्यांना माफी असते
मिळे कसे तुज रुसण्याचे कारण तेंव्हाही!

उगाच वाटे काळ थांबला कालच्यापरी
उडून गेले होते सारे क्षण तेंव्हाही...

तुझ्या नि माझ्या मधली

आसवे


आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे

लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे

जाहलो मी अता आसवांची कबरमी
मला खोडुनी गाडली आसवे

ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे

-- वैभव देशमुख

प्राणात तुला जपले....

प्राणात तुला जपले मी डोळ्यात न येऊ देता
गुणगुणतो गीत तुझे मी ओठात न येऊ देता

रडलो तर रडलो ऐसा कळलेच कुणाला नाही
हसलो तर हसलो हासू गालात न येऊ देता

(यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाटे त्यांना
देवाला पुजता येते हृदयात न येऊ देता)

पाजावे जहर कुणाला हातून तुझ्या पाजावे

मी पाहिले उजळूनही...


मी पाहिले उजळूनही अन पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू लांबूनही , जवळूनही

मग शेवटी कळले मला होतो किती पाण्यात मी
पाणीच होतो शेवटी दर्यापरी उसळूनही

ह्या आसवांना एकदा शिक्षाच केली पाहिजे
उरतात का ओल्या स्मृती सा-या व्यथा निथळूनही

आयुष्यभर जगलो तुझ्या त्या मस्त बेतासारखा
होतो तुझ्या लक्षात मी कित्येकदा