गझल

गझल

एकरूप

जरी सांजवेळी तुज टाळते मी,
उरी आठवांची खुण ठेवते मी.


किती गोड आहे जुलमी सख्या तू,
पहाटे कळ्यांना गुज सांगते मी.


नशा भेटण्याची तुज आकळेना,
मनस्वी तुझा हा छळ सोसते मी.


व्यथा, ठेच कोठे? चटके जिवाला,
मिळाले मला ते वळ मोजते मी.


मला आसरा तू, तुज मी निवारा,
असे छानसे

श्वासात ताल आहे

प्रत्येक शब्द माझा जळती मशाल आहे
प्रत्येक अक्षराचा हेतू कराल आहे

तलवार चालवावी दुसर्‍या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे

भक्ती स्वतःच करता मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता तुमची कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
'परवा' असे 'उद्या' जो, तो आज  'काल' आहे

मदिरा खराब आहे जो सांगण्यास

गझल माझी तसतशी

पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते

फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते

पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते

केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते

काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते

कुठे?

फितुर बोले पापणी डोळ्यास शाकारू कुठे?
पावसा वाचू कसा मी, गाल कौलारू कुठे?

झाडताना बाग माळी फेकतो पाने जुनी
या जुन्या प्रेमातल्या खाणाखुणा सारू कुठे?

हा इथे आलो कुठे ही जाग का आली मला?
मी पुन्हा झोपू कुठे अन स्वप्न साकारू कुठे?

काळ गल्ल्यातून बोळातून नेई जन्म हा
मी विचारत राहतो की सांग ना

जाच

होतो जैसा, तसाच

आहे मी एकटाच!

 

काटा टोचे न आज

झाली ही कठिण टाच!

 

हसशी का मंद मंद

डोळे मिटुनी उगाच?

 

सोड जरा बाहुपाश

घेउन अधराची लाच!

 

येता मी सामोरा

होशी तू आरसाच!

 

का मी हे मान्य करू..

तीन अधिक दोन पाच?

 

मारी सूर्याशी पैज

घे हमी तू.......

मिळेल त्याच्यामधेच राहू खुशाल मी तू
नको नको ते नको विचारूस गौतमी तू

इलाज नाही इथे ऋतू, माणसांस काही
कळी सुगंधास वा दिखाव्यास मौसमी तू

तुझ्यात माता तुझ्यात पत्नी तुझ्यात दासी
तुझ्यात वारांगना जगाची, तुझी कमी तू

कधी कधी सासरास होते तुझीच होळी 
दिलास हुंडा? करून घे रंगपंचमी तू  

कधी कुणाचा न दोष वाटेल

असा श्वासांत येतो प्रास

अताशा चांदण्याशी भांडण्यातच रात्र जाते त्रास होतो त्रास नुसता
पहाटे मात्र जाणवते पुरे आहे जगाया पौर्णिमेचा भास नुसता

तुझा थरकाप नाही होत का पाहून टिकल्यांची अशी रेघाळ नक्षी
मला तर आपला हा आरसा दिसताच दिसतो क्रूर कारावास नुसता

तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची

सोबतीचा आव आहे

भोवती अंधार आहे, रात नाही
सोबतीचा आव आहे, साथ नाही

कोणताही खेळ आता फार सोपा
मोडतो जो नियम तोही बाद नाही

ठेवले मी स्वखुषीने शस्त्र खाली
हारलो मी,पण दिली तू मात नाही

भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही

कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात

किती खाल हो..?

                      किती खाल हो..?
                      मला द्याल हो!

                     मला सोडता...?
                     सुखी व्हाल हो..?

                      दिशा घालिती,
                      मला शाल हो!

                      जगावे असे,
                      किती साल हो?

                      अम्हा आवडे,
                      चिनी माल हो!

                      सुखांना म्हणा,
                      कधी याल हो?

                      स्मरा कासवा!
                      पुढे जाल हो

मान्यवरांची गझल-डॉ.राम पंडित

कोठून ही  पहाटे अलवार साद आली
कोमेजल्या कळ्यांची अलगद फुले ग झाली

छेडून शब्द गेले ,जाणीव पाकळ्यांना
तरळून श्वास गेले,स्वप्ने दवात न्हाली

सुख थांब सांगताही ना थांबले ग दारी
घेऊन त्यास संगे ,आशा पहा निघाली

ऋतु संपले तनाचे कळले मलाच नाही
पण सांज सावल्यांना माझी व्यथा न भ्याली

शिवलेत ओठ