गझल

गझल

...वेड पांघरावे मी !

................................
...वेड पांघरावे मी !
................................

यायचे तुझ्यापाशी़; काय पण करावे मी ?
- की असेच कायमचे सांग अंतरावे मी ?

प्रश्न हा न, कोणाला हे पटेल की नाही...
प्रश्न हा - कशासाठी, काय उत्तरावे मी !

चेहरा तुझा आता आठवे न थोडाही...
आठवे, तुला तेव्हा सारखे स्मरावे मी !

भणंग ४

लाकडे पोचली काल, तोही चळे
वासना पाहुनी काळ मागे वळे

लाथ मी मारतो तेथ पाणी निघे
पापणीला कधी लागली ना कळे

वागणे बोलणे दोष सारे तिचे
पण सुके बाजुला आणि ओले जळे

पेरले बी जगाने नको ते तरी
झाड देऊ करी जी हवी ती फळे

देव जे पाहिजे तेच लंपासतो
जिंदगी

तुझ्याच अंतरी विसावलो

विचारतेस का मला कुठून त्रासलो ?
तुझ्याच काळजातुनी हताश परतलो

उडायला नवीन पंख जोड भोवती..
असे म्हणू नयेस तू म्हणून थांबलो

सुखासवे अता कुठे जुळून यायचे..
तरी तुझ्यासवेच अंतरी सुखावलो

जशी मनात वेदना तहानली जरा..
तुझ्याच आसवातले हिशेब प्यायलो

'म्हणून मोकळीच हो ...उशीर का अता?'
तरी 'उशीर होवु दे' मनात बोललो

कारण कधीच नव्हते

टाळ्या हजार पडुनी कशास पाणावलेत डोळे ?
नाहीस तूच हे आठवून ओठांत अश्रु फुटले

चंद्रास चांदणी का असेच बोलून काल गेली...?
'सारेच तेज होते तुझेच सूर्यास जे मिळाले'

माझ्या-तुझ्या यशाचेच गोडवे गात बोलताना...
तूही असे म्हणावे कि, 'आज तूही तुझे बघावे' ?

हकनाक लाविले तू मला सुखाचे व्यसन कराया...
कळताच

आम्ही तहात गेलो!

                         आम्ही भयात गेलो,
                         पुन्हा तहात गेलो

                         पडलो गरीब आम्ही!
                         त्याच्या खिशात गेलो

                         कंटाळुनी नशेला,
                         मग मी मठात गेलो

                         का प्रीत ही मिळाली?
                        ..मी विस्तवात गेलो!                

                          होती स्वतंत्र वाणी..
                         ..कारागृहात गेलो.

                         वा!..धैर्य शोधण्याला,
                        

सफाई पाहिजे अजुनी

जरा नक्की ठरव आहे हवा की मी नको आहे
नको असलो तुला मी तर मलाही मी नको आहे

'सुगंधी केस वाळावे तिचे नाहून आली की'
सदिच्छा पाहिजे आहे तरीही मी नको आहे

मला होते हवे, मीही हवा होतो मनाला पण
अता ती पाहिजे त्याला जिला की मी नको आहे

कसा माझा

तू ...

पुरे जाहले चांदणे पाहणे..
असे रोज एकेकटे जागणे


उले फूल पानातुनी गोजिरे..
तसे ओठ उमलुन तुझे हासणे


जसा सूर्य संध्येस रेंगाळतो..
मनाचे मनाशी तुझे बोलणे


कशाला हवी व्यर्थ मद्यालये ?
तुला पाहणे अन् नशा साधणे


पुरे जाणतो मी, मला पाहुनी..
तुझे आतल्या आत ओशाळणे


नभी तारकांना चमकण्या अता..
मिळे ताल बघुनी तुझे चालणे

शब्दार्थ

ओठातुन माझ्या शब्द सांडतो आहे..
अन् अर्थ तयाचा माग काढतो आहे


हृदयावर विणुनी जाळे शब्दार्थांचे..
तक्रार नसावी - ' श्वास कोंडतो आहे '


बोजड शब्दां आकार लाभण्या काही..
बुद्धीची ऐरण रोज ठोकतो आहे


सोप्या शब्दांना समजुन घेण्या मीही
फेरीवाल्यांना रोज भेटतो आहे


सार्‍या शब्दांना खंत एवढी वाटे..
की, मी नसलेले अर्थ बोलतो आहे

विचाराधीन मन

तुंबले आहेत साठे खालच्या हृदयाकडे
आसवांनो व्हा पुढे व्हा अन वळा डोळ्याकडे

हात होतो मोकळा दीवान रचुनी सारखा
पाहते बुद्धी भयाने आपल्या हाताकडे

माहिती नाहीत पृथ्वीची गुरुत्वाकर्षणे
तीच येते सारखी चिकटायला माझ्याकडे

मी उभा की आडवा पाहून ते ठरवे दिशा
त्याहुनी काही न तरणोपाय अवकाशाकडे

काय ही आकाशगंगा फाटलेली, दे नवी
तो म्हणे की हीच आहे एवढी त्याच्याकडे

धाक

वाटतो सार्‍या सुखांचा धाक आता
सुख म्हणाले की रगडतो नाक आता

प्रेम,माणुसकी,दया ,शांती ,अहिंसा
पाक गोष्टी कालच्या नापाक आता

स्वार्थ दिसता माणसाचे तत्व बदले
रोज येथे जन्मती चार्वाक आता

का असा हटवाद पाठीच्या कण्याचा?
विनवले कित्येकदा की वाक आता

दृष्ट ना लागो किती नाजूक,सुंदर
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता

जर