गझल

गझल

विदूषक

हा बंद ही, यशस्वी, छापा पुन्हा रकाने
आम्हास ही जगू द्या, का बंद कारखाने ?

वेडे कसे तुम्ही हो, अर्धाच वार केला
शोधीन मी तुम्हाला, आता कसा दमाने

आधी मला कळू दे, जे प्राक्तनात आहे
करतोस तू  कशी रे,  ओली सुकी मुक्याने ?

व्हा दूर कुडमुड्यांनो, सांगू नका जराही
काढून ठेवलेले

मी मला बजावत होतो...

मी मला बजावत होतो! मी तुला विचारत होतो!

मी निघणार्‍या शंकांना वेळीच सोडवत होतो!

 

नियतीने माझी इतकी फरपट लिहिलेली होती..

जी माझी नव्हती, मी त्या, वाटेवर चालत होतो!

 

हा गुंता इतका झाला, ना वीण मला उलगडली

मी जोडुन माझी ठिगळे,मग मलाच उसवत होतो!

 

"तळपून दीसभर अंती, तव

रेंगाळणे


पुन्हा त्याच दृष्यांवरी भाळणे
पुन्हा त्याच  रस्त्यात रेंगाळणे

जशी फाटते तप्त धरणी तसे
तुझे आतल्या आत भेगाळणे

कशाला कुणाची हवी सांत्वना
मला तू, तुला मीच सांभाळणे

धृवा सांगते खूप काही मला
तुझे एकट्यानेच तेजाळणे

कुणाच्या वधाची असे बातमी
नभाचे असे रोज रक्ताळणे *

 

अनंत ढवळे

( पानगळीतून..   * मीर

संध्याकाळ झाली

लक्ष माझे वेधण्याला तारकांची माळ झाली
एक होती चांदणी, माझे अता आभाळ झाली

रोज रात्री तीच स्वप्ने नाचली माझ्यासवे, अन
आज ती दिवसा उजेडीही मनाचा चाळ झाली

आस भलती ह्या मना, ते आजही वेडावलेले
सावरावे मी जरी, त्याची किती आबाळ झाली

आज रस्ता सापडेना, मी तसा बेहोश नाही
काल येथे

तुझा चेहरा

तुझा चेहरा
आस लागली जिवास माझ्या केव्हा दिसेल तुझा चेहरा
विरहाचा  दुष्काळ  संपता कसा  उमलेल तुझा चेहरा..

ऋतू आगळे, फुले वेगळी , गंध तयांचा नवीन भासे......
मनात माझ्या आहे तैसा अजून असेल- तुझा चेहरा..?

कशास करतो तू ही चर्चा व्यर्थ हवापाण्याची आता?
टाळशील तू  काही  ..तेही  मला कळवेल तुझा चेहरा...

अपूर्ण आहे कविता म्हणून तुला

तू कशी जाशील...?

................................
तू कशी जाशील... ?
.................................

तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?

मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?

फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !

नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या

ओळख

 

       सखे तुला मी वाटत नाही आज नेहमीचा?

       खरखुरा माझ्याच कुठेसा मीच ओळखीचा?

            अजून थोडा शिल्लक आहे श्वास एकट्याला

            कशास मी अर्ध्यातच सोडू मार्ग सावलीचा?

       पिसाटलेले वादळवारे साद घालणारे

       जपून जा तू जोवर मागे प्रश्न काळजीचा

            दशावतारी खेळ कशाला राजकारण्यांचे?

            विकून टाका एकमुखाने देश वाटणीचा

नवीन नाही

 

        मला आजचे तुझे वागणे नवीन नाही

        तुझे बहाणे,तुझी कारणे नवीन नाही

              भरू लागले कसे काय एवढ्यात डोळे?

              मुक्या वेदना अशा पोचणे नवीन नाही

        लिहिलेस ना विचारून तू मलाच सारे? 

        तुझे नेमके मला गाळणे नवीन नाही

               पुढे वाढवू कशी सांग मी उगाच नाती

               स्वतःशीच हे पुन्हा

आणखी एक सपाट गझल

इये उल्हासनगरी होइ काफिर पीर एखादा
इथे वर्षात केवळ पाच होतो 'मीर' एखादा

सहा महिन्यात अडचण एक, पण ती वर्षभर चाले
रसिक हातात बारामास धरतो धीर एखादा

लवंगी माळ उडल्यावर फुसुक्कन वाजते काही
लढाई संपल्यावर येत राही तीर एखादा

हजारो वर्ष गेल्यावर सपाटीचा गिरी होतो
परंतू येथला नसणार तेथे वीर एखादा

सफाई यायला

मला बोलायचे असते

तुला भावेल ते सारे मला बोलायचे असते
असे मी बोलते त्यातून तू समजायचे असते

पुरे आता पुरे आता म्हणे याच्याचसाठी मी
तुझे माझे सुखाचे शिखर अजुनी यायचे असते

तुझ्यामाझ्यात राती वाद होतो एवढ्यासाठी
मला झोपायचे नसते तुला जागायचे असते

तुला मी वाढते जेवायला घाईत थोडेसे
तुलाही नेमके जेवण कसे उरकायचे असते?

जिथे काही कमी