गझल

गझल

स्वप्न एखादे जणू...

चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले

दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले

मी किती

तुझी आठवण आली

तुझी आठवण आली

श्रावणधारा.. धरणी भिजली तुझी आठवण आली
खट्याळ वारा पाने हसली तुझी आठवण आली

हिरवळ सजली  तुरे लागले  आनंदाने नाचू
अन् भ्रमराला कळी बोलली तुझी आठवण आली

हत्या, दंगे, जाळपोळ  या  नेहमीच्या बातम्या 
अवचित कानी येता मुरली   ... तुझी आठवण आली

निघून गेला  दिवस  कसा  ते कळले नाही मजला

मनात चांदणे तुझ्या

मला जसे दिसेल, मानतो तसे असेलही
प्रिये मनात चांदणे तुझ्या तसे नसेलही

कबूल, पाहतेस तू मला सदा जिथे तिथे
अवश्य जीव बोलण्यास या तुझ्या फसेलही

तिच्याच भावना तिच्या नियंत्रणात राहिना (त)
हसेल आज गोडशी, उद्यास आकसेलही

तुझाच चाहता असूनही न जाणलेस तू
तुला कळेल तोवरी हयात आळसेल ही

तुझ्या खुणा बघून चालतात त्यातला

पुढारी

आता मीही थोडा थोडा घडू लागलो
उगाच अपुले क्षणाक्षणाला हसू लागलो

सवाल कोणी उपेक्षितांचा विचारला तर...
'मीही आहे त्यातलाच' हे म्हणू लागलो

खेळ भावनांचा असतो हे कळल्यावरती..
मनात हसलो, जनात थोडे रडू लागलो

माकड म्हटले, 'कुणी मलाही टोपी देण्या -
थोडा आता खुर्चीवरती बसू लागलो'

नेता होता की होता कोणी अभिनेता

थोडासा

तसा लगेच संपलो जगून थोडासा
तरी जिवंत राहिलो मरून थोडासा

तिला कळेल प्रेम काय चीज आहे ते
तिचा सराव होउदे अजून थोडासा

प्रवेशतो, सुहागरातची वधू जैशी
हळूच श्वास देह चाचपून थोडासा

कुणास मुफ्त मीठ लागल्यास मी आहे
निघे बरेच, गाल वाळवून थोडासा

तुझा सुगंध लाभला तरी पुरे झाले
तुझा रुमाल

जाळशील का तू?

अश्रु तुझे मनावर या ढाळशील का तू?
माझ्या मनास नाहीतर जाळशील का तू?

तक्रार मोगरा करतो, 'स्वस्त हा किती मी!'
किंमत तयास देण्या, तो माळशील का तू?

देणार ना तुला मी स्वप्नात त्रासही पण
रात्रीस झोपणे आधी टाळशील का तू?

तू नावं भेटलेल्यांची सांगशील जेव्हा
माझेच नाव तेव्हाही गाळशील का

पूजा

तन  मन  वचने  आवर  सखये
ती  राधेची  घागर  सखये

तुझे  उमलणे  माझे  असता
जळू  कशाला  तुजवर  सखये ?

जेथे  पूजा  तिथेच  असतो
कळ्याफुलांचा  वावर  सखये

कुणी  गुरू  ना  कुणी  लघू  ही
तयातून  घे  सुन्दर  सखये

संस्कृतीतले   प्राकृत  शोधू
जरी  जाहलो  नागर  सखये

तापव  लोणी  घृत  मिळवाया
तपावीन  ना  अम्बर  सखये

क्ळू लागले

कळू लागले


निसटलेले  दिवस आता छळू  लागले
जीवन माझे मला  आता कळू लागले

थकून गेल्या  बघा जुनाट  वाटा
पाय पुन्हा घराकडे  वळू  लागले

खरेपणाने वागलो,  डाग ना लागला कधी
शुभ्र कपड्यातील ... मनही मळू लागले 

पावसाळा कोरडा गेला, शेती  ओसाडली
भर उन्हाळ्यात आता आभाळ गळू लागले

उमगले मला जेव्हा, मह्त्व  आयुष्याचे

आयुष्याला अमुच्या.......

आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले

त्यांच्या तत्वांच्याच नेमके उलटे केले
ज्यांचे ज्यांचे आम्ही येथे पुतळे केले

सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले

पैसा, सत्ता, देहवासना या सार्‍यांनी
नाती प्रीती माणुसकीला कुजके केले

तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो
मी माझ्या

आभास

जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?

साधनेची प्रेरणा तो अश्रु होता
म्हणुन वाल्या पात्र वाल्मीकांस झाला

चार पैसे बांधण्या गाठीस कोणी
श्वापदांचा रोजचा मुखवास झाला

आळणी होते तरी केलीच वा! व्वा!!
लंपटांचा बेतही फर्मास झाला

श्वास त्याचे अंतरी रेंगाळले अन्
केवड्याला तेरड्याचा भास झाला