गझल

गझल

खून केले...

खून केले...

या तुझ्या लाघवी हासण्याने खून केले...
लोचनी साठल्या अमृताने खून केले...

का उगा दावला, चेहरा तू दर्पणाला?
तुज पुन्हा पाहण्या, आरशाने खून केले...

रंग तू माळला, पौर्णिमेच्या मैफलीला...
आर्जवी छेडल्या, मारव्याने खून केले...

गंध आता सखे, का फुलांना आकळावा?
धुंद श्वासातल्या, मोगर्‍याने खून केले...

नेत्रबाणी तुझ्या अर्जुनाने बद्ध

तू

तू

बोलशी खोटे जरी तू
दे दिलासे मज तरी तू

छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू

चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू

यातने गोंजारले मी
मागल्यापेक्षा बरी तू

भाग्य भाळी, रेघ हाती
हे खरे का ही खरी तू ?


वेदना, चिंता हजारो
जीवना शरपंजरी तू

प्रश्न...

मायबोली संकेतस्थळावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत लिहिलेली गझल.

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही

पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना

नाही

मायबोली ह्या संकेतस्थळावर नुकतीच एक गझल कार्यशाळा घेण्यात आली.. त्यासाठी 'नाही' हे अंत्ययमक दिलेले होते... त्या कार्यशाळेसाठी लिहिलेली ही गझल

"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही

जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही

वृक्ष आहे का असा बागेमधे - जो
पश्चिमी वाऱ्यांपुढे झुकणार नाही?

माणसे

गप्प २

जरूरी आमची इतकी जगालाही कुठे आहे?
जगाची गरज तितकीशी अम्हालाही कुठे आहे?

दहाव्याला स्वतःच्या भोजनाला माणसे येती
मिळावा मोक्ष ही इच्छा शवालाही कुठे आहे?

अरे वर्षानुवर्षे जगत आलो जन्म आपण जो
निवड 'तो घ्यायचा कोठे' कुणालाही कुठे आहे?

न देवाने दिली बुद्धी पशूला ऐकले होते
इथे लक्षात आले माणसालाही कुठे

माझा खून

तुझे उपकार देशी दु:ख! इतका शूर होतो मी
तुझ्या विरहात होते काय? चिंतातूर होतो मी

शहर सोडायची नाही गरज तू हुकुम कर नुसता
सुखामध्ये तुझ्या आनंद माझा, दूर होतो मी

तुझे अस्तित्व असताना जगाचा नूर होतो मी
अता या मौसमांचा कापरा काहूर होतो मी

पुन्हा भेटायचे नाहीच का आयुष्यभर आता?
'शिरावर

कधीतरी चांदण्यात दोघे....

............................................... 
 कधीतरी चांदण्यात दोघे....
...............................................

कधीतरी चांदण्यात दोघे फिरायला जाऊ !
पुन्हा जुना काळ आपला तो स्मरायला जाऊ !

निघू चला साचलेपणाच्या पलीकडे आता...
चला कपारीत डोंगराच्या झरायला जाऊ !

खरेच रेखाटलेस हे चित्र तू कुणासाठी ?  
उगीच का  रंग त्यात माझे भरायला जाऊ ?

तुझ्या हिशेबी तरी

आरसा

पाण्यातल्या रंगासम असा,
लागे कशाला मग आरसा ?


या जीवनाची ही पद्धती..
कासव पळे अन् झोपे ससा


सांभाळले मी दु:खा असे...
उचलून घेतो बालक जसा


अर्जून राही मागे उभा..
चाले शिखंडीचा वारसा


कंसात कोणी आले जसे...
बनलोच मीही कान्हा तसा


करतो अताशा मीही चुका
नित जिंकतो दुर्गम साहसा


फुकटात दु:खे मिळती जगां..
कापून गेले सा-या नसा

गप्प १

मी खेळलो जिथे तो वाडा पडून गेला
कोर्‍या इमारतींना थोडा नडून गेला

आता खुली न दारे, नाही कळे कुणाचे
एकांत माणसाला का आवडून गेला?

डोकावया न होती दारात लाज, आता
बोलावले जयाला तो आखडून गेला

राखी दिवाळि दसरा, श्रावण अता न हसरा
प्रत्येक सण अताशा आला, रडून गेला

आजी म्हणे मुलांनो

आस जागी..

भंगली स्वप्ने तरी का आस जागी?
शांत झाली  भूक, का ही प्यास जागी?


कोण झाला वेदनेचा प्रेमरोगी?
आसवांची अंतरी  आरास जागी..

भोग का भोगून झाले भोगवाद्या-
जाहली का विठ्ठलाची आस जागी?


टाळला संसार अन् संन्यस्त झाला..
कृष्णलीलेची तरीही रास जागी..


आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!


"सुर्य तो  फेडेल माझे पांग सारे,"
ही 'निशा' ठेवून हा विश्वास, जागी...