गझल

गझल

यातना

सोसतो भारास आहे जीवघेण्या यातनांच्या

जोडतो ठिकर्‍याच आहे भग्न झालेल्या दिसांच्या

 

माळल्या होत्या कधी मी रेशमी केसांत तुझिया

सरकती डोळ्यांपुढूनी त्याच त्या वेण्या फुलांच्या

 

झेलू कुठे मी वार हे? जागाच ना शरिरावरी!

अन बधिरल्या मनात नुरल्या जाणिवाही वेदनांच्या

 

शोधिसी का उत्तरे? केव्हाच मेले प्रश्न हे!

काय अंती

जिंदगानी

वेळ सारा घेत गेली जिंदगानी
जायच्या वेळेत गेली जिंदगानी

माणसे नी माणसे नी माणसे बस
जे नको ते देत गेली जिंदगानी

नेमकी होताच इच्छा पूर्ण काही
लाच घेण्या येत गेली जिंदगानी

मी असावे मद्य किंवा भांगगोळी
हेलकावे घेत गेली जिंदगानी ( मतल्यात आलाय, चालते का? )

आमचे मन आमचा सम्राट आहे
आमची सेवेत गेली

तुझ्या - माझ्यात...

========================

किती होते निराळे ते तुझ्या - माझ्यात झालेले
कुणा नाही कळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

ढगामध्ये, मनामध्ये, कुणाच्या पापण्यामध्ये..
कुठे नाही गळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले

असू दे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची,
नको मोजू उन्हाळे ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

नव्हाळी ती, जिव्हाळे ते, दिलासे ते, खुलासे

समज

मी मनी राखून होतो तप्त गोळा..
पण जगाला भासलो मी फक्त भोळा

चित्र माझे काढुनी ते श्रेष्ठ झाले..
अन् पुन्हा तो फिरविला त्यांनीच बोळा

ते जटायूचे स्मरण करण्यास आले
ठेविला पंखांवरी माझ्याच डोळा

आठवे प्रीती कुणाला सांजवेळी..
नेमका तेंव्हा असे मी विसरभोळा

आसुडे पाठीवरी घेऊन आता..
अश्रु करती साजरा हा

असे करू नये २

शायरांचा काय झाला हाल, "वा वा"
"आणुया घोडा, मिळाला नाल वा वा"

केस ओले ठेवुनी ना लाभ काही
अत्तराचा कारखाना चालवावा

आमच्या जगण्यास आहे वर्ज्य,! कोणी
सूर्य थोडा पश्चिमेला घालवावा

प्रेम वारंवार मोडे ती, म्हणे की
बळकटी येण्यास खुंटा हालवावा

रंजनाला मांडुनी दु:खांस त्यांचा
मीच दर्जा वाढवावा, खालवावा

सावली माझी किती अजुनी दमावी?
जाऊदे

...केव्हातरी !


............................................
...केव्हातरी !
............................................

उगवणारा वाढतो अन् वाढणारा संपतो केव्हातरी !
खेळ हा चालू युगांपासून...का खोळंबतो केव्हा तरी ?

रोज मी कित्येकदा मन मारतो, संतापतो, कातावतो...
- आणि एकांतात माझ्याशीच मग मी तंडतो केव्हातरी !

फेड सारी बंधने; फेकून दे... अन् ये नभाखाली अता...
मेघ एखादा असा माथ्यावरी ओठंगतो केव्हातरी

अशी गोड तू...

अशी गोड तू...

फुलांनी पुन्हा आज लाजून जावे, अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे, अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे, अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी

रूक्मिणी...

रूक्मिणी...

तो मनाला सांजवेळी, भावना देऊन गेला...
आठवांचे स्पंद सारे, जागते ठेवून गेला...

मी कसे सांगू सख्याला, काय या ओठात आहे?
माझिया डोळ्यांतुनी तो, तारका वेचून गेला...

गाजली मैफील त्याची, आज सार्‍या आसमंती;
तो निशेला भारलेली, भैरवी गाऊन गेला...

संयमाचे गंजलेले, बंध मी पाळू कशाला?
आजला श्वासात माझ्या, श्वास तो

औषधाने मी बरा होत नाही.

                                  

                  औषधाने मी बरा होत नाही
                  शब्द वैद्याचा खरा होत नाही

                  नित्य जळते काळीज विस्तवाचे,
                 -की कुणीही सोयरा होत नाही!

                  किती रिचवू मी विष जीवनाचे?
                  अता धावा! शंकरा!..होत नाही!                  

                  असे नाही की, कैकयीच दु:खी,
                  सुखी ती ही मंथरा होत नाही

                 

सोळा...

घेतला तर छान धांडोळा
...अन्यथा सगळाच पाचोळा

सारखे उडते हवेने जे -
तू किती करशील ते गोळा ?

मी खरे तर बेरकी आहे
चेह-याने वाटतो भोळा


काम य़ेथे चांगले झाले
-फिरव आता त्यावरी बोळा

काळजी घे, जप स्वतःला तू
पूर्ण झाले वय तुला सोळा



... सर्व गझलकारांना दस-याच्या शुभेच्छा !