गझल

गझल

यज्ञपर्व ...( गझल )

यज्ञपर्व ... ( गझल )

डोळ्यांत सांजवेळी, आभास पेटलेले...
ओल्या उरात माझ्या, निश्वास गोठलेले...

वेड्या मनास माझ्या, चाहूल लागलेली;
येणार आजला तू, काळीज बोललेले...

झाली सखे तयारी, संपूर्ण स्वागताची;
मी मुग्ध 'केतकी'ला, श्वासात माळलेले...

आरास भावनेची, नैवेद्य आठवांचा;
मंदीर 'अमृता'चे, ह्रदयात रेखलेले...

नैमित्यमात्र होते, हे पादक्षालनाचे;
पाण्यात त्या जणू होते, तीर्थ

मदार... ( गझल )

मदार... ( गझल )

आरक्त लोचनांची, भाषा सुमार आहे...
माझ्याच हुंदक्यावर, माझी मदार आहे...

आश्वासने मिळाली, मजला जरी खुन्यांची;
निश्चीत आज होणे, माझी शिकार आहे...

मी हारलो तुझ्याशी, जाणून डाव सारा;
माझ्या पराजयाला, हसरी किनार आहे...

का घाव खोल केला, या लाघवी सुखाने?
पाहून 'हर्ष' आता, होतो थरार आहे!

'हे

'गोष्टी '

--------------------------------
आधीच  मी  मनाशी, केल्या  तयार  गोष्टी
तू  भेटशील  तेव्हा, बोलू  हजार  गोष्टी...

बोलू  जरा  मनाचे, बोलू  कुणा-कुणाचे..
संपून  शब्द  जाता, आणू उधार  गोष्टी !

राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..

समजू  नका  मला  रे, इतका  निरूपयोगी
सांगू  शकेन  मी ही,  युक्तीत  चार  गोष्टी

गोष्टीत  शेवटाला, सारेच 

असे करू नये १.

कोणी ना  बसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
मी जेव्हा नसतो  तिच्याजवळ ती आगीपरी भासते

जाळो शायर ती पतंग जैसा, भासे गझल जादुई
जातो वापस तो तिच्याजवळ ती  आगीपरी भासते

दुनिये मत्सर तंत्र, मंत्र यांचा, प्रत्यक्ष ही कारणे
दाह असा  असतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते

सूर्याला चटका बसेल ऐशी, गझलेतली उष्णता
लाव्हा रसरसतो  तिच्याजवळ ती आगीपरी

मी खरे बोललो तेव्हा

मी खरे बोललो तेव्हा कुणास पटले नव्हते
मी बरे बोलल्यानेही भांडण मिटले नव्हते...

मी तुला म्हणाले होतो, "ऐकू नकोस माझे"
आता नकोस सांगू की मी हे म्हटले नव्हते...

बेसावध मी होतो, माझ्यावर हल्ला झाला
जे हृदयाला भिडले ते तीर 'निसटले' नव्हते...

जगता जगता माणुस कर्जात बुडूनच जातो!
माझे  गतजन्माचेही कर्जच

आगी लावणारे

शब्द आता संपले ओलावणारे
जे उरे, शब्दात ते ना मावणारे

वागणे वेड्यापरी ना रम्य वाटे
पाहिजे होते कुणी रागावणारे

अन्यथा मृत्यू कसा येणार सांगा?
शौक होवो प्रकृती खालावणारे

दे जरा संजीवनी, ये, घेउदेना
गंध त्या वक्षातले नादावणारे

दोन जाती माणसांच्या भूतली या
घालणारे घाव, कोणी चावणारे

धाडकन पडताच गर्दी काय झाली!
तेच खड्डे खोदती

दुष्काळ....

फसव्या तुला शब्दांचा, कैसा विटाळ आहे?,
सांभाळुनी रहा तू, जग हे कुचाळ आहे,

आलास का परतुनी? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.

रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.

शोधू कुठे तुला मी? का काळजात माझ्या?,
रे अंतरी तुझ्या मी

फुलासारखी...

-----------------------
रहावी  सदा  तू  फुलासारखी,
घरंदाज, मोठ्या कुलासारखी..

मला  जोडशी  तूच  माझ्यासवे,
मला  भासते  तू पुलासारखी..

वटारून  डोळे  पहावेस  तू,
अशी  चूक  व्हावी, मुलासारखी !

जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  राहते  का तुला, सारखी?

अकस्मात  ये  तू  मला  भेटण्या-
सुखासारखी  वा  शुलासारखी...

------------------------

लाघवीशी वाटते आहे

सुरांची रागदारी लाघवीशी वाटते आहे
छटा ही जीवनाची भैरवीशी वाटते आहे

तिची ही गाठ केसांची सुटावी एकदापुरती
मनाला आज विश्रांती हवीशी वाटते आहे

कसे इच्छेस हाताळू ,हिला दाबू, तिला सोडू
निघे जी जी मनातुन ती नवीशी वाटते आहे    ( सुचले - हजारो ख्वाहिशे वरून- गालिब )

'सुचावे ना चुकीनेही तिला मी यापुढे

ध्यास मला (काही शेर...)

नवाच लागे ध्यास मला
हवा सुखाचा घास मला

असो कसेही जीवन हे
जगण्याचा हव्यास मला

जगावया श्वासापुरते,
पुरे तुझा विश्वास मला

गुलाब आणिक गंध जिथे
तुझाच होई भास मला

अधांतरी हा जीव फसे
मनोरथांचा फास मला

अनोळखी आहोत जणू..
नको असा सहवास मला

निघून मी गेल्यावर तू..
खुशाल दुनिये हास