-गझल-
माणसे नसतात जेव्हा , भावना असतात का रे ?
सावल्या घनदाट अंधारातही दिसतात का रे ?
करपल्या शेतात विहीरी कोरड्या पडल्या तरिही,
संयमाने ते जमीनी आमुच्या कसतात का रे ?
जीवघेणे दु:ख काही जाहले दिसते तयांना ,
आज वेड्यासारखे ,ते सारखे हसतात का रे ?
तोच मासेमार आणि ओळखीचे तेच