गझल

गझल

प्रश्न

-गझल-

माणसे नसतात जेव्हा , भावना असतात का रे ?
सावल्या घनदाट अंधारातही दिसतात का रे ?

करपल्या शेतात विहीरी कोरड्या पडल्या तरिही,
संयमाने ते जमीनी आमुच्या कसतात का रे ?

जीवघेणे दु:ख काही जाहले दिसते तयांना ,
आज वेड्यासारखे ,ते  सारखे हसतात का रे ?

तोच मासेमार आणि ओळखीचे तेच

आई मिळावी लागते

आई मिळावी लागते

वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते
होत जखमी वाट कवितेची मळावी लागते
 

देव का निर्जीव मूर्ती राहतो सांगा बरे
जन्म घेण्याला इथे आई मिळावी लागते


प्रेम नुसते शपथ घेता पूर्ण होते का कुठे
प्रेयसीची बेवफाई फळफळावी लागते


फक्त गुणवत्तेमुळे ना पाझरे दुनिया कधी
अस्मिता लाचार होउन भळभळावी

मी कधी माझ्यात ही असणार नाही

माझिया सोबत कुणी उरणार नाही
मन पुढे माझे कधी हसणार नाही

कोणता आहे ऋतू तू सांग माझा
वाटते माझी कळी फुलणार नाही

खूप आता चिंब झालो मी व्यथांनी
पावसाने अंग हे भिजणार नाही

शेवटी मग घेतली ही शपथ आम्ही
तू मला अन मी तुला बघणार नाही

या जगी हरवून बसलो मी स्वतःला
मी कधी माझ्यात ही असणार नाही
                    
                                          --स्नेहदर्शन                       

निकष

जोडत जावे मोडत जावे सर्व निकष जगण्याचे
दृष्टिकोनही बदलत जाती स्वतःकडे बघण्याचे

कलागुणांनी युक्त आणखी विद्यामंडित व्हावे
ज्ञान नेमके कुठे सापडे राहतेच शिकण्याचे

फक्त नभाची शिवण उसवली कोसळलेले नाही
तिने  खोचुनी पदर ठरविले ठिगळ पुन्हा शिवण्याचे

पोचवणारे पार पाडती चोख आपुली कामे
अपुल्या हाती केवळ उरते वेळेवर निघण्याचे

अब्रू किंवा जीव

नूर

माझ्याच अंतरीचे शोधीत सूर आलो
होते समीप जे, ते शोधीत दूर आलो!

जाऊन पंढरीला ना देखिला विठोबा...
(पाहून मी जनांचा आनंद-पूर आलो!)

हे देव पत्थरांचे, पाहू कशास त्यांना
भेटीस माणसांच्या येथे जरूर आलो

भूभाग जिंकले, पण ना जिंकले मनांना
- मी दाखवून त्यांना त्यांची कसूर आलो

थोडाच वेळ होतो, मी

उपकार

एक जन्म पुरतोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा
खूप तुझे कर्तॄत्व पाहिले नको नवे अवतार पुन्हा

खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हॄदयाशी
सावज असुनी सुसखाअन्त होता कोसळतो प्रतिकार पुन्हा

एके काळी होतो राजा शब्दगणांच्या राज्याचा
कंगालांचा भरतो आहे आजकाल दरबार पुन्हा

सूडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले
हातोहात कसे दसावरले निलाजरे सरकार पुन्हा

दासबोध वाचून उघडले

कावळे घाटावरी...

...गझल...

काय मज होणार  हे त्यांना दिसाया लागले ,
कावळे घाटावरी ते घुटमळाया लागले...

मौनव्रत  धरला तयांनी आत्मशुद्धीला उगा,
काल झोपेतून तेही बडबडाया लागले...

भिन्नतेचा शाप घेऊनी तसा आलो जगी ,
सोडता जग, एकसे सारे दिसाया लागले !

हीन कर्मांनी खरोखर गाठली उंची अशी ,
बिंबही माझे , मला बुटके दिसाया लागले !

नाव मी लिहीता तुझे

.....न ऐकायचे


ठरवले मनाचे न ऐकायचे
            कधीही कुठेही न गुंतायचे

सखी यायची श्रावणासारखी
          रिते मेघही सावळे व्हायचे

किती तळघरे,तळघरामागुनी
         पुन्हा खोल इतके न खोदायचे

कसे प्रेम करतात शिकवेन मी
        उद्या ते धडे फक्त गिरवायचे

नवे ना घडे तेच ते तेच ते
       जुने दिवस झेरॉक्स काढायचे

'कसे चाललंय'जर

चैन

शब्द हल्ली सारखे छळतात मजला
आणि ओळी चार मग  सुचतात मजला

बोलली नाहीस तू काही तरीपण
अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला

चांदण्यांना रोजची का रात्रपाळी?
प्रश्न हे आता असे  पडतात मजला

कायदे काही शहाण्यांचे  असू द्या
फायदे वेडात हे दिसतात मजला

मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला

देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती

तपस्वी

विश्व सारे मोकळे जोडीत जातो,
बंध माझे मी असे तोडीत जातो


लागला तो छंद, त्याला शोधतो मी,
पावलांच्याही खुणा खोडीत जातो
 
शिस्त 'त्याची' फक्त आता यास ठावे,
रीत यांची येथली मोडीत जातो
 
माणके झोळीत आपल्या अशी ती,
नेसली 'वस्त्रे' इथे सोडीत जातो
 
प्रस्थ त्यांचे, पाघळावे ज्ञान त्यांनी!
मी तपस्वी बापडा गोडीत जातो!


-निलेश सकपाळ