गझल

गझल

टाळीबाज

काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?

शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?

बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?

पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?

दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?

प्राण जोवर, कर्ज उरते

...शांत समईसारखा !

...............................
...शांत समईसारखा !
...............................

वाट माझी संपता, येतील मागे मग किती ?
जीव देणारे जिवाला राहिले जिवलग किती ?

कैद मी भोगून आलो कैक वर्षांची जणू...
- आणि हे बदलून गेले भोवतीचे जग किती !

झुंज माझ्याशीच माझी चाललेली हारलो...
शेवटी मीही तसा धरणार होतो तग किती ?

वागणे

चूक........ अमित वाघ.

ईश्वरा तू खूप मोठी चूक केली...
का अशी निर्माण तू ही भूक केली...

व्यर्थ येथे सर्व माझ्या प्रेमलीला...
बासरीची शेवटी बंदूक केली...

दूर चाबी फेकली होती मनाची...
तू कशी उघडी पुन्हा संदूक केली..

शेवटीही खंत दु:खा हीच होती...
ऐनवेळी तूच वाचा मूक केली...

जीवनाची तेवती ठेवून देवा...
ज्योत डोळ्यांचीच का

नार ही...!

..........................
नार ही...!
..........................

राम आयुष्यात नाही; जानकी नाही !
तेवढी नाहीच; माझी लायकी नाही !

दान दैवाने दिले भरपूर दुःखांचे...
नेमकी माझीच झोळी फाटकी नाही !

जाहली शहरांपरी नखरेल गावेही...
राहिली गावांत आता गावकी नाही !

चारचौघांच्यात कोठे ढाळता येती ?
आपुली अश्रूंवरीही मालकी नाही !

चार शब्दांनी तुझ्या

...अंदाज आगळा आहे!

देऊन कोहळा येथे मिळवला आवळा आहे

असा हा माझ्या जगण्याचा अंदाज आगळा आहे

 

तोडले कुणी कळले ना, ते पाश जखडणारे

जरासा बावरलो क्शणभर, पण अता मोकळा आहे

 

मोह तू पाडलास कितिही, 'विदेशी ' घेणारच नाही

लागते फक्त मला 'देशी' ....तसा मी सोवळा आहे

 

नसे आता पराक्रम तो, नसे उरली विजीगीषा

येथे...


पाखरांना पिंजऱ्याचा सोस येथे
मोकळे आभाळ पडले ओस येथे

रिक्त प्याल्यांच्या अशा कां आज रांगा?
काल होते अंगुराचे घोस येथे

कागदाची  नाव ती ही  भीत नाही!
व्यर्थ आहे, वादळा, हैदोस येथे

मानली तर अंतरे असतात येथे
मोजली तर 'मैल' किंवा 'कोस' येथे

पाहिजे ते,पाहिजे त्याला मिळेना
हाच आहे, नेहमी अफसोस येथे


 



(जयन्ता५२)

'वस्ती'

वागणे माझे खरे होते;
हे जगासाठी बरे होते.

भाळलो मी फक्त पाण्यावर;
भोवताली भोवरे होते.

सांगणे मी सोडले देवा;
देव सारे घाबरे होते.

जाळली ज्यांनी उभी वस्ती;
शांत त्यांचे चेहरे होते.

पाळली नाही कधी साधे;
श्वान घरचे चावरे होते.

वारही केले असे त्यांनी;
हात दोन्ही पांढरे होते.

कोरडे जमले न

...थकलास तू किती !

............................................
...थकलास तू किती !
............................................

आलो तुझ्यासमोर ! दचकलास तू किती !
मी तूच ! व्यर्थ दूर सरकलास तू किती !

आहे तुझ्याच आसपास...जे तुला हवे....
शोधात दूर दूर भटकलास तू किती !

नव्हतेच जे कधीच...सापडेल  ते कसे ?
साराच भूतकाळ उचकलास तू किती !

आहे तुझ्या मनात चांदणे

सोशीक

संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !

आत लाव्हा घुसळतो
वरुन सारे ठीक ना !

फावले त्यांचे कसे ?
भेकडांचे पीक ना !

काय दुःखाला हवे ?
आसवांची भीक ना !

भाव आहे चांगला
वेदनेला वीक ना !

कान का किटले असे ?
तेच ते बौद्धीक ना !

रांग

नको

पारख मला, भाळू नको
सोडून जा, टाळू नको


गात्रात शिशिराचा ऋतू
गजरा अता माळू नको

मी मोडल्या शपथा तुझ्या
तूही वचन पाळू नको

ना शक्य काही त्यातले
पत्रे जुनी चाळू नको

मी विझवले आहे मला
तूही जिवा जाळू नको



--जयन्ता५२