श्वास श्वास उन्मळून यावा अशी विलगता
खूप दूरवर नेते आहे तुझी तुटकता
आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी
तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता
किती दूरवर आलो आपण असे वाटते
वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता..
तुझ्याप्रमाणे जगेन मी ही ,तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वत्व बदलता ..?
विचार करतो
गझल
गझल
तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता
आता !
..................
आता !
..................
जगापासून या दडायचे आता !
मलाही मी न सापडायचे आता !
कुणालाही न व्हायचे हवेसेही...
कुणालाही न आवडायचे आता !
पुन्हा का तेच ते, तसेच ते होई ?
नवे काही न का घडायचे आता ?
मिळेना अर्थ, एकही मनाजोगा...
किती मी शब्द पाखडायचे आता ?
असे
लपंडाव
वसंताचे नव्याने स्वर उमटले
डहाळीवर अचानक फूल फुलले
'नको पाहूस स्वप्ने तू उन्हाची'
दवाला मंद तार्याने विनवले
'नका बुडवू मला' मूर्ती म्हणाली
'पुन्हा या पुढिल वर्षी'बोल घुमले
नसे मजकूर कोरे पत्र त्याचे
न लिहिताही मला सारे उमजले
'़क्षितिज ओलांडले की गाव माझे'
ंम्रुगाने शेवटी वाळूस म्हटले
पुन्हा गुंतायचे नाहीच केव्हा
लाव्हा
वरवर जगास आता मी शांतच भासत असतो
पण हृदयातिल ह्या लाव्हा नेहमी उफाळत असतो
आपुलकी नसते पाण्याची तलावामध्ये डुंबणार्याला
प्रेम तयाचे पाण्यावर, जो काठावरुनी पाहत असतो
कसे कळावे त्या पिल्लाला, "राजहंस मी बदक नव्हे"
पाण्याचा ह्या गढुळ आरसा चित्र वेगळे दावत असतो
नसेल बोलायचे तुला तर, नको
तगमग
श्वास घेतला, जाणवली धग
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग
इथे किती गजर्याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
...दिसत नाही !
...दिसत नाही !
चीडही दिसेना कोठे; राग दिसत नाही !
पेटल्यां मनांची आता आग दिसत नाही !
तेज याज्ञसेनीचे तू आज शोधशी का ?
आज यज्ञ नाही कोठे...याग दिसत नाही !
पाठलाग माझा आता मी कसा करावा ?
मज अजून माझा येथे माग दिसत नाही !
खूण दंशल्याची देते डागण्या
रस्ता
जो सुचला तो धरला रस्ता
माझा नक्की कुठला रस्ता ?
चौकाशी छाटण्यात गप्पा
तो बघ, तिकडे रमला रस्ता
ज्याने तुझियापाशी नेले
मजला तो आवडला रस्ता
टाळ, मृदुंगाच्या नादाने
वारीचा दुमदुमला रस्ता
प्रवास जेव्हा संपुनी गेला
कळले, सारा चुकला रस्ता
राज्य दुःखाचे...
.....................
राज्य दुःखाचे...
.....................
फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !
सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !
सुटे ती...पोचण्याआधीच मी
- अशी माझीच का गाडी हुके ?
पहाटेचीच त्याला ओढ का ?
पहाटेलाच का वेढी धुके ?
तिथे तो...तूच तू आहेस का ?
तिथे जो
माझे कसे म्हणावे....
माझे कसे म्हणावे संबंध मी कुणाचे,
माझे कुणा म्हणू मी, झाले कुणी कुणाचे?
श्वासात गुंगवूनी आश्वासनेच देती
प्राणात ना भिनावे ते वास अत्तराचे....
बेभान होउनीया गातील गोड गाणी
माझ्या कथेव्यथेशी नाते नसे स्वराचे....
शब्दातली खुमारी बांधी प्रबंध येथे
माझे विचार नाही उच्चारलेत वाचे....
स्पर्शात मार्दवाचा रेशीमभास होतो
का त्यात जाणवावे व्यर्थत्व बेगडाचे
बासरी नादावली रे...
भावभोळी भक्ति माझी राधिकेला भावली रे
आज कान्हाच्या कृपेची बासरी नादावली रे...
देव आहे बापआई पोरक्या जीवास माझ्या,
ऐकुनी आकांत वेडा, माउली ती धावली रे...
मानसीच्या शिंपल्याचे मोहमोती साठलेले,
माळ त्यांची अर्पिण्याला त्यागसूत्रे ओवली रे...
या जगाशी झुंजताना ताप होतो अंतरी या,
सर्व कष्टातून काढी आज त्याची सावली रे...
त्यास ठावे काय माझा पुण्यसाठा संचिताचा
तोकडी माझी