पाठीस बाळ आहे, शोधायचा कशाला?
जेवून तृप्त का हो शोधाल पाकशाला...
नाभीतली सुगंधी कस्तूरिच्या मृगाची,
त्यालाच ठाव नाही, पंकात मग्न झाला...
पाठीवरी पिसारा, मोरास जाणवेना,
पाया कुरूप पाही आणून आसवाला...
दौहित्र श्राद्ध घाली, स्वर्गात पोचवीतो,
पुत्राविना कसा रे हा जन्म फोल झाला...
छावा चुकून आला झुंडीत कोकरांच्या,
त्यांच्यासवे चरावा का
गझल
गझल
शोधायचा कशाला?
आरसा
एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा
मी कधीचाच फुटलो अन् बिखरलो
हा नवा कोराच आहे आरसा
ओळखीचे हासला नाही कधी
राहिला परकाच आहे आरसा
दूर ह्याला ठेव तू सखये बरे
हा जरा 'तसलाच' आहे आरसा
धनिक सारे रूपसुंदर देखणे!
काय घेतो लाच आहे आरसा?
हासरा दिसलो कधी मी ज्यामधे
ना असा बनलाच आहे आरसा
(जयन्ता५२)
उ:शाप
मानवाच्या जीवनाला, काय दैवा, शाप आहे?
तो कुणाचा पुत्र आहे वा कुणाचा बाप आहे...
अन्नवस्त्राची शिदोरी पोसते आहे तनूला,
तेवढ्याने होत नाही, भावनांचा व्याप आहे...
कोणत्या नाजूक वेळी तोकड्या शक्तीस याच्या,
धीर देण्या माउलीचा हात देतो थाप आहे...
आपल्या पाठी उभा आहे पिता या भावनेने,
हिंमतीचा जोर येतो, शत्रुची का
चालणे टाळायचे का?
ऊन्ह तापे रे दुपारी, चालणे टाळायचे का,
फूल कोमेजून गेले, ते तरी माळायचे का?
धान्य कोठारात नासे, पोखरूनी कीड लागे,
हाय, पैसा वाचवाया जोंधळे चाळायचे का?
वाघबच्चा अंगणी ये, वाट त्याला सापडेना,
जीव लावाया दयेने पोसुनी पाळायचे का?
चूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,
चंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का?
कोण
पुढेच जात जा...
घडोघडी पडो झडो तरी पुढेच जात जा,
घडो प्रयास आसयुक्त, ध्यासगीत गात जा...
करील वंचना कुणी, नसो विवंचना मनी,
'करीन' हीच जिद्द बाळगून धाडसात जा...
असेल जी तुझ्यात शक्ति, तोच आसरा खरा,
असे उधार वा भिकेत दुष्प्रभाव, चेत जा...
जयांस लाभले सुदैव शक्तिबुद्धिचे भले,
जयात ते तुझ्या प्रसन्न, आदरास देत
हरवला...
हाय, कसा विश्वास हरवला
समर्पणाचा ध्यास हरवला ।
तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।
सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।
जगण्याला धुंदी स्वप्नांची
विस्मृतीत इतिहास हरवला ।
युगाहुनी मोठा असणारा
प्रतीक्षेतला तास हरवला ।
सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।
-सतीश
किंमत
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी
शरपंजर
बाजाराचा ओसरला भर
उजाडले, पदराला सावर
काठ्यांच्या गर्दीत विसरता
गोवर्धन "त्या" करंगळीवर
नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा
मासे तडफडती काठावर
का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
हाय सुखांचे हे शरपंजर
लढणे सरले, उरली घरघर...
सखे
नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता
तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता
जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता
इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता
असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता : बापू दासरी
रस्ता
भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले
मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले
आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
सांग तू कविते मला