गझल

गझल

गझल

माळले केसात तुझिया गंध ज्यांचे
कोण जाणे काय झाले त्या फुलांचे

काल फुललो बहर झालो बहाव्याचा
आज आहे झाड वठले आसवांचे

भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?

झगमगाटाला भुलूनी धावले जे
मागचे हरवून गेले गाव त्यांचे

त्याच त्या कुरवाळुनी कंटाळलो मी
दे  अता   पत्ते  

मला मनाचे पटले नाही

मला मनाचे पटले नाही
वाद आमचे मिटले  नाही

मला नेहमी ऐकू येते
मनातही जे म्हटले नाही

राग तुला याचाच असावा
नाव तुझे पुटपुटले नाही

मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?

अभिलाषेचे वादळ आले
पाय काधी लटपटले नाही

फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

शब्द आणले उधार

मजबुरीने

खूप काही सहन करतो मजबुरीने....
मजबुरीचा राग येतो मजबुरीने....

तेच जगणे तेच मरणे जीवनाचे
हेच गाणे रोज गातो मजबुरीने

प्रेम करतो मी तुझ्यावर एवढे की,
की , तुझा मग राग येतो मजबुरीने

जिंकलो कित्येक मी  मोठ्या लढाया
पण तुझ्याशी सहज हरतो मजबुरीने

हौस मृत्यूची  इथे आहे कुणाला
शेवटी माणूस मरतो

मी अहल्येसारखी... !

.........................................
मी अहल्येसारखी...!
.........................................

शेवटी गेलास ना निखळून तू ?
जायचे  ना जग जरा उजळून तू !

आंच  दुःखाची जराशी लागता...
का असा जातोस रे वितळून तू ?

वेळ  भरतीची तुझ्या समजेचना...
ये अवेळी आजही उसळून तू !

संपलो मी ! वैर माझे संपले...
जा फुले माझ्यावरी उधळून तू !

दुःख

सुरकुत्या

भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही

मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"

बघा जरा काळवेळ मग राग आळवा रे
रखरखलेली दुपार ही; चांदरात नाही

किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!

उदार धोरण

आलीस पावसाची...

आलीस पावसाची, भिजवीत पावसाला
आली मशाल कैसी , जाळीत पावसाला !

भर पावसात पडले उन कोवळे जरासे
आले जसे किरण हे माळीत पावसाला ।

पदरात झाकले तू लावण्य मुक्त जैसे
हळुवारश्या रुपेरी कल्हईत पावसाला ।

घोटात राख वाटा तू कोरड्या गळ्यांचा
कवितेत काय बसला पोशीत पावसाला !

चिक्कार झाली झाडे,चिक्कार झाली शहरे
प्रगतीस

जपून ठेवले

इथे अनंत घाव मी जपून ठेवले
प्रचंड आज दाह मी जपून ठेवले ।

विखुरलेस चांदणे इथे कसे तुझे?
इथेच चंद्र हाय मी जपून ठेवले ।

मागतेस काय आज मागची फूले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?

काल तू जिथे हळूच ओठ टेकले
अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले ।

आपुलेच

जाग आली


आटुनी गेले जिव्हाळे,जाग आली
कातडीवर आळ आले,जाग आली ।


वास्तवाशी तह नव्याने काल केला
आणि पुन्हा युद्ध झाले,जाग आली ।


का नव्याने शोधिली कृष्णात भक्ती
का मिरेचे विष प्याले,जाग आली ।


वाटले मज तू कुणी नाही निराळा
पण तुझे सारे निराळे! जाग आली ।


भावनेच्या मखमली गुंगीत जाता
स्वप्न कासावीस झाले,जाग

मनात आले

मनात आले गैर कुठे?
ही सत्याची सैर कुठे?

चल ये फिरुनी मिठीत ये
हे जन्माचे वैर कुठे?

ठरवुन घे तू पंथ तुझा
फिरशिल सैर न भैर कुठे?

मी जर पुसले ठसे तुझे
जाशिल मग तू खैर कुठे?

ठेवू म्हणतो भ्रष्ट युगी
चौथा 'वामन पैर'कुठे?

                        मनीषा साधू

कशाला ?


ओळींचे जंजाळ कशाला..?
शब्दांची आबाळ कशाला..?

निर्मळ पाणी डोळ्यांमधले
अभिव्यक्तीचा गाळ कशाला..?

शांती ह्रदयातच शोधावी..,
फिरतो रानोमाळ कशाला...?

या भजनातच भक्ती नाही..!
..ढोलक आणिक टाळ कशाला..?

तो त्याच्या मरणाने मरतो..
यावा लागे काळ कशाला ?

बदफैली ही जातच ज्याची,
त्याला कुठली नाळ कशाला .?

सहवासाने फुलवू ह्रदयी,
चंद्राला आभाळ कशाला