गझल

गझल

कुणी न समजुन घेतला...

कुणी न समजुन घेतला तुझा विचार बाबा
अजून घडती इथे... नको ते प्रकार बाबा

समता, ममता, न्याय, बंधुता वचने तुमची
स्वार्थापोटी... होते त्यांची शिकार बाबा

सत्तेची ही भ्रांत कुणा जाणवते तेव्हा...
प्रतिमेवरती होतो.. 'फसवा' प्रहार बाबा

तुझी सावली दूर अशी का अमुच्यापासुन
अजून अमुची टळली नाही.. दुपार बाबा

शिका, संघटित

हा चराया

  मुक्तकः

यातनांना कोण सांगा साद घाली
मी सुखाने कंटकांचा वेश ल्याला

---

हा चराया दांडग्यांना देश झाला
भोग घ्याया लांडग्यांना पेश झाला

चांदण्याचा स्पर्श माझ्या अंगणाला
तेवढ्यानेही तयांना क्लेश झाला

भार म्हणता मी उद्याला आज मेलो
हा उद्याला आजचा संदेश झाला

साथ झाली बांधवांची आजवरती
प्यार तरीही शेवटी परदेश झाला

वर्षे झाली

 

        त्या जागेवर ती दिसण्याला वर्षे झाली
        तिने फक्त माझे असण्याला वर्षे झाली

                       गर्दीतुनही तिथे अचानक तिने स्वतःहुन
                        नांवगांव माझे पुसण्याला वर्षे झाली

        कुठे तुझे गं मावळले ते रुसणे फुगणे
        अशा तुझ्याही मग नसण्याला वर्षे झाली

                          ओळख देऊन पुन्हा चौकशी हसता हसता
                          ठरलेल्या माझ्याही फसण्याला

जीव....

वेदना जपून मी उरात ठेवतो...
हासराच चेहरा घरात ठेवतो...

तू मनात बैसली म्हणून साजणे..
आज ईश्वरास मंदिरात ठेवतो...

चंद्र जागतो अता पहावया तुला..
तो म्हणून रोज रोज रात ठेवतो...

आठवून कंठ दाटतो पुन्हा तुला..
मी तरी न हुंदका स्वरात ठेवतो...

प्रश्न तू करू नको उगाच साजणे..
मी अनेक प्रश्न उत्तरात ठेवतो

लढाई

जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मला मग खूप भारी

का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी

पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेंव्हा भरारी

आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी

साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते

गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन...

गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन
वाहियले तुजसाठी मी... जीवन

जगण्याचा अर्थ खरा लावलास
प्रतिभेचे फुलविलेस.. नंदनवन

घेवुन सल काळजात मी फिरतो
अन माझ्या दु:खाचे.. तू सांत्वन

तेज असे तुझियातच.. विश्वाचे
तार्‍यासम झळके माझे प्राक्तन

शालिनता आणलीस जीवनात
नम्र किती झाले... माझे वर्तन

हा प्रभाव माझ्यावर गझलेचा
फक्त तिचे बोल ऐकते

गुलाम केले आम्हाला...

गुलाम केले आम्हाला... हे मालक झाले
गनीम रयतेच्या राज्याचे शासक झाले

विकास अमुच्या दारी सांगा आला का हो ?
हजारवेळा निवडणुकींचे...  नाटक झाले

गरीब  हटले, हटली नाही  अमर गरीबी
गरीब, जन्मा आलो, कसले पातक झाले

पहा पुन्हा या टोळ्या आल्या, लुटले आम्हा
लुटीत... तारणहार, ठग्यांचे हस्तक झाले

कमावता येते धन

आज फुलांची भाषा.....


                     आज फुलांची भाषा.....            

                आज फुलांची भाषा मजला कळते आहे
                फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे

                उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
                कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?

               शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?         

ना ठावुक तुजला...

ना ठावुक तुजला कितीक कळतो आहे
जो दाह तुझा मज अविरत छळतो आहे

चालली जणू ही... माझी अग्निपरीक्षा
मी काय सिद्ध करण्याला जळतो आहे

तू समजुन घे ना.. माझ्याही शब्दांना
जे तुला वाटती... उगा बरळतो आहे

थांबवू कसा हा.. आठवणींचा ओघळ
जो डोळ्यांमधुनी घळघळ गळतो आहे

हा अथांग सागर माझे

जे कधी न जमले मजला

               जे कधी न जमले मजला                    

     जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
     मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !

     मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
     प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !

     त्या घेराव्यातच मजला, जी झाली