गझल

गझल

बस जराशा मी पणाने....

तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने....

वाहवा करुनी तुझी बघ काम त्यांनी काढले अन्
तू फुगवली फक्त छाती बस जराशा मी पणाने....

लोक आता त्रासले, कंटाळले दुर्लक्षिण्याला..
एकदा घडणार क्रांती बस जराशा मी पणाने....

आसमंती पोचली असली तुझी किर्ती जरीही

दरवळ

कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ.

असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?

कुठून आणू उसने मागुन
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ.

कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक   आपण काढावा पळ ?

तुला भेटुनी खरेच पटले ....
उगीच नव्हती माझी तळमळ .

तुला बिलगुनी आला वारा

...थांब की जरा !

...थांब की जरा !


थांब की जरा तू बाई....थांब की जरा !
एवढी कशाला घाई...थांब की जरा !

मज खुणावते केव्हाची तेथली जुई...
येथली म्हणे ही जाई...`थांब की जरा` !
 
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !

राहशील मागे आता तू तरी कसा...?
द्यायची

...मन माझे !

...मन माझे !

का उगीच तळमळते मन माझे ?
सारखेच मज छळते मन माझे !

दूर दूर पुनव फुले अवकाशी...
चांदण्यात दरवळते मन माझे !

ऐकशील सहजपणे जर केव्हा...
शांत शांत सळसळते मन माझे !

घाव घाव स्मरत बसे दिन-राती
एकटेच भळभळते मन माझे !

हे खरेच, दगड कधी बनतेही

प्रश्न ऐसे..


प्रश्न ऐसे जीवनाने फेकले
पुस्तकांनी हात पुरते टेकले


चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यात ही कां हात माझे शेकले?


पाहुनी आसू तुझे, कळले मला
यापुढे आसू न माझे एकले


"काजव्यांना लाभली सत्ता कशी?"
हारलेले 'सूर्य' रडले, भेकले


गायली बेसूर जेंव्हा माणसे
गर्दभांनी सूर सच्चे रेकले


-------------------जयन्ता५२


सोबत

(स्थळावर प्रकाशित केलेल्या या गझलेत नवा शेर नुकताच लिहिला (जांभळ्या रंगातील )) 

नको सत्ता, नको दौलत
हवी  केवळ तुझी सोबत

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...

नको तो मोह स्पर्शाचा
पुढे जाऊ चुका टाळत 

कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली  'गंमत'

कधी होणार तू माझी ?
-- कळू दे ना तुझेही

कळेना

मुलांना कसे वाढवावे कळेना
नव्याने कसे मी घडावे कळेना

जमाना असा, सर्व चालून जाते
स्वत:ला कसे पारखावे - कळेना

किती माहिती ही, किती तज्ञ सल्ले
कसे नेमके पाखडावे - कळेना

विजेसारखा आज उत्साह आला!
तरी मी पुन्हा का गळावे - कळेना

विचारी नभा चिंब ही चंद्रमौळी
"कुठे केवढे कोसळावे कळेना?"

स्वीकारले

जीवनाला मी कुठे नाकारले ?
ते जसे आले तसे स्वीकारले

मैफलींवर जीव होता टाकला
एकटेपणही कुठे झिडकारले ?

स्वाभिमानी मी तयांना बोचलो
हाय ! सर्वांनी मला धिक्कारले

येत नव्हती कुंचल्याची मज कला
चित्र मी शब्दांतुनी साकारले

खीर जितक्या आवडीने चाटली
चाखले तितक्या चवीने कारले

कौल, माती, गवत-नाही घेतले
सदन स्वप्नांनीच

अजूनही

खट्याळ, गोड, लाजरा..अजूनही
तुझा मनात चेहरा..अजूनही

अजाणताच मी सुगंध प्राशला
मनात तोच मोगरा..अजूनही

तहान भागली कुठे जिवातली?
मला हवा तुझा झरा..अजूनही

मनास कैद जो करून ठेवतो
नसे जगात पिंजरा..अजूनही

तुझ्याच स्वागतास सज्ज साजणे
पहा, तयार उंबरा..अजूनही

इथे तनू शहारते अजूनही
इथे समीर बोचरा..अजूनही

कसा करावा या भयगंडाचा निचरा

कसा करावा या भयगंडाचा निचरा
माझ्या या गावातच झालो मी उपरा

या वेळी पाहु ,कुणाचा नंबर येतो
घात लावुनी बसल्या शहराच्या नजरा

कधी कधी जीवन बनते कचराकुंडी
आपण बनतो त्या कुंडीमधला कचरा

निव्वळ डोकी हवीत येथे हे समजा
नाव गाव ओळख शिक्का सगळे विसरा

वस्तूंनी गजबजलेल्या हाटी आपण
वस्तू बनतो