गझल

गझल

मला सांभाळले आहे..

=========================

कसे घर बांधता येते तुला ह्रदयात हातांनी ?
तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी !

कशाला आंधळा हा चाचपडतो रोज तार्‍यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी

कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी

ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे

गात येथे तू उगा का थांबलेला

गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला !

जाउ दे त्याला किती उंचावरीही -
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला

तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला ?

काल माशी ना उठे नाकावरीची -
आज मिरवी शूर नेता गाजलेला !

शांतिचा नारा घुमे दाही

मी तुझा,तुझा असेन आमरण

संशया करु नकोस आक्रमण
मी तुझा,तुझा असेन आमरण

सांगतो मनास, ”विसरलो तुला”
हीच तर तुझी मुळात आठवण

फ़ुंकणे,पिणे असभ्य वाटले
आजकाल हेच सभ्य आचरण

हासण्यास माझिया फ़सू नका
हासणे मुखावरील आवरण

बोलवे कुणी,तिथे न जायचो
पोचलो तिथे,जिथे न आवतण.

डॉ.कैलास गायकवाड

आले वादळ गेले वादळ...

आले वादळ गेले वादळ कसे न मिटले
आठवणींच्या वाळूवरचे ठसे न मिटले

अंतरातला कोलाहल मी आत कोंडला
या माझ्या पण ओठावरचे हसे न मिटले

जिंकुन गेले दुर्दैवच ती कासव शर्यत
पण मनातल्या इच्छेचे ते ससे न मिटले

डोळ्यादारी प्राण ओतुनी उभी प्रतिक्षा
मिटले होते डोळे क्षणभर जसे न मिटले

जळले

गझल

निरोपाच्या क्षणी डोळ्यात पाणी दाटले होते
मला माझ्याच अश्रूंनी असे गोंजारले होते

वसंता आजही नाही तुला जमले तसे फुलणे
फुले वेचायला जाताच काटे बोचले होते

जमेला घेत गेलो जी सुखाची वाटली नाती
दुखाच्या कारणांना मी खरे धुंडाळले होते

अता पाऊल पडते पावसाचे वाकडे तिकडे
तुझ्या गालावरी त्याचे ॠतू रेंगाळले होते

कशासाठी कुणासाठी...

कशासाठी कुणासाठी झुरायाचे उगा आता
सुगंधाच्या पुन्हा पाठी पळायाचे उगा आता

धरायाची उन्हे हाती कुणाच्या हासण्यासाठी
कुणाला सावली देण्या जळायाचे उगा आता

अता ना तो ऋतू वेडा न वेड्या चांदण्या तैशा
नभाशी खिन्न चंद्राला बघायाचे उगा आता

मनाच्या खोल अंधारी कुणी या ओतल्या तारा
किती आभास मी वेडे जपायाचे उगा

हळूहळू

बघ तुला तुझे छळेल लाजणे हळूहळू
ऊन ही तसे बनेल चांदणे हळूहळू

गाळतेस तू मलाच टाळतेस बोलणे
मी तरी तुझे बनेन मागणे हळूहळू

आरसा नको बघूस तू मला बघून घे
झोप ही तुझी बनेल जागणे हळूहळू

सांग ना तुझ्याविना कसा जगू कसा मरू
आस अंतरात श्वास सांडणे हळूहळू

आत्म सूख

हा आहे खडतर रस्ता..

सुख दु:खांनी भरलेला हा आहे खडतर रस्ता
जगण्याचा मार्ग म्हणावा की आहे अडसर रस्ता

ती एक भेट ही अपुली घडली असती का केंव्हा ?
शहरात तुझ्या अन् माझ्या नसता कुठला जर रस्ता

हा रिवाज सप्तपदीचा पाळूया आपण दोघे
मी धरीन तोलुन तुजला तू माझा सावर रस्ता

मज वचन दिले तू

गाव हा आटपाट स्वप्नांचा

पापणीआड घाट स्वप्नांचा
गाव हा आटपाट स्वप्नांचा

आपली भेट मध्यरात्रीची
बोलबाला पहाटस्वप्नांचा

एकटी रात्र एकटा मीही
आणि रस्ता सुसाट स्वप्नांचा

बंध सोडून रात्र उलगडली
सैल झाला रहाट स्वप्नांचा

रोज काचेपुढे थबकतो मी
पाहतो झगमगाट स्वप्नांचा

ऐकली गोष्ट राजकन्येची
काय हा थाटमाट स्वप्नांचा

नीज मोडू नकोस श्वासांची
तोवरी सार, पाट स्वप्नांचा

वळवळ केवळ

कोण ऐकतो, कोण समजतो? फुकाच अवघी तळमळ केवळ
झोप रात्रिची उडून जाते, होते पोटी जळजळ केवळ

मनास वाटे व्हावी क्रांती, राहु नये ही चळवळ केवळ
टीव्ही आणिक फेसबुकावर हाय उठवते खळबळ केवळ

रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ

सामसुमीच्या खुणा सांगती