गझल

गझल

पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला...

पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला
पतंग नसताना ज्योतीने जीवन जाळायचे कशाला

सावलीतले भास उशाशी नको नको ते चंद्र चांदणे
पोळुन निघतो चांदण्यात मी ऊनही टाळायचे कशाला

काटेरी नशीबाला घेउन काटा जपतो हळूवार मन
कोमेजुन जाताना कळते कुंपण वाळायचे कशाला

फुटलेल्या काचेत विखुरला प्रेम तुझ्यावर करणारा
आरशात मी मला दिसेना

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले
सावरले मी किती मनाला, जडू नये ते जडून गेले

नाईलाज तरी किती म्हणावा,सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू नये ते सडून गेले

तसे इशारे कळले होते तुला सुधा अन् मला सुधा पण
नाव तुझे ओठातच माझ्या दडू नये ते

पसारा...

प्रेमाचा हा खेळच न्यारा
रक्ताचाही उडतो पारा

म्रुत्यू काही मागत नाही
जगण्यासाठी किती पसारा

एक ओळही समजत नाही
जीवन म्हणजे गूढ उतारा

गुदमरतो हा गंध फुलांचा
देना थोडा उधार वारा

इच्छा कोठे पुर्ण जाहल्या
अनेकवेळा तुटला तारा

प्रा. श्रीधर वैद्य.

माहीत नाही...

फोडला कोणी घडा माहीत नाही...
मारला कोणी खडा माहीत नाही...

शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...

चालणारी मी सरळ नाकापुढे या...
शब्दही मज 'वाकडा' माहीत नाही...

अर्थ जातो आसमंताहून वरती...
भाव साधा, तोकडा माहीत नाही...

घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही

मजकूर

विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही

तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही

जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही

नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही

मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही

गावाला आलो की.....

गावाला आलो की मिळते सावळ कांती गालाला
चुंबन देते बहुदा काळी माती गोर्‍या पोराला

म्हातारा झाल्याने बाबा बोलत नाही मोठ्याने
पण थकलेल्या वाणीचाही धाकच आहे आम्हाला

कष्टाचा पोवाडा बिल्कुल सांगावा लागत नाही
इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला

मुलगा करतो चिंता ह्याची मसणाच्याही वाटेवर
बक्कळ पैसा गेला माझा बाबाच्या ह्या

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा
गुंतलो असाच मी जरा जरा जरा जरा

का असा खुळ्यापरी तुलाच रोज पाहतो
पाहतो मलाच मी जरा जरा जरा जरा

सांग काय टाळतात गूज ओठ बोलके
तू जशी तसाच मी जरा जरा जरा जरा

येतसे कसे मला भरून आज एवढे
वाहता झराच मी जरा

अस्पर्श स्वप्ने

बोललो होतो जरी.... विसरून पाहू
भेटलो... इतके तरी अठवून पाहू

ठेवली आहेत जी अस्पर्श स्वप्ने
ती घडी केव्हातरी मोडून पाहू

मीच लिहिलेला ‘खरा’ इतिहास आहे
कोणत्या रंगामधे बुडवून पाहू ?

मोगरा, चाफा, जुई, गाणी कळ्यांची
वेगळे काहीतरी याहून पाहू

वास्तवाला हात लावूही नको... चल,
रेघ स्वप्नाची जरा आखून पाहू

बोलताना

जन्म देवा...

टांगला जेव्हा वडाला जन्म देवा...
आत्महत्येला मिळाला जन्म देवा...

मी कसे उत्तर तुझ्या प्रश्नास देऊ...
सांग कोणाला कळाला जन्म देवा...?

मुर्त झाली पेटण्याने आग किंतू...
काय आगीने जळाला जन्म देवा...?

राख प्रेताची नको तू सावटू रे...
दे मिळू दे हा धुळीला जन्म देवा...

जर भविष्याची जरा चाहूल असती...
तर दिला

भिंती !!

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!
.
परजून आठवांना....
करतात वार भिंती !!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !!

सोसून पावसाळे...
पडती न 'गार' भिंती !!

पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती !!

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती !!

-सुप्रिया (जोशी) जाधव.