गझल

गझल

शिखर त्यांनी गाठलेले -

शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो
चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१|

देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो
माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२|

शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी
कालच्या सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो |३|

फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू झाकतो
अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो |४|

मी डाव मांडलेला........

मी डाव मांडलेला........

जिंकून हारण्या तो... मी डाव मांडलेला
तो खेळवून गेला... हा जीव बांधलेला

चालून आज आले...त्या दूरच्याच वाटा
भेटेल का किनारा....वाराच थांबलेला

टांगून रात गेली....सूर्यास आज दारी
अंधार दाटलेला.... तो चांद भांडलेला

कोणास हाक मारू.. तो गाव दूर गेला
हुंकार वेदनेचा .....कंठात सांडलेला

पोळून रान गेले ..ग्रीष्मात तो

मरण्यात अर्थ नाही

मरण्यात अर्थ नाही

संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

हो

पुन्हा पुन्हा !!

तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा पुन्हा पुन्हा !
तुझ्या स्म्रृतीत चांदवा जळेल हा पुन्हा पुन्हा !!

उनाडतो, पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा पुन्हा पुन्हा !!

न सावरुन आवरे, ग स्वार हा हवेवरी,
तुझ्या समीप राहण्या, ढळेल हा पुन्हा पुन्हा !!

तुझाच गंध माळुनी ग मत्त

आज भारंभार झाली आसवे !!!

आज भारंभार झाली आसवे !!!
.
*

पापण्यांना भार झाली आसवे,
कैकदा ’गद्दार’ झाली आसवे !

*

साजणाचे ओठ गाली टेकता,
लाजरा शृंगार झाली आसवे !

*

झोंबरे होते तडाखे वादळी,
मिट्ट्सा अंधार झाली आसवे !

*

लाळघोट्या भेकडांच्या मैफ़िली,
पेटता अंगार झाली आसवे !

*

आपुल्यांचे घाव पाठी झेलता

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!

जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती

प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती

केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती

पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती

तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!

बघ तुझ्या येण्यामधे हे केवढे मांगल्य आहे

भाकरीची भ्रांत नाही, भूक मेली...शल्य आहे
रंगलेल्या जीवनाचे हे खरे वैफल्य आहे

वाजती कानात माझ्या प्रार्थनेचे सूर मंजुळ
बघ तुझ्या येण्यामधे हे केवढे मांगल्य आहे

गंधवेडया भावनांची अंतरी हो झुंडशाही
दुश्मनांचे पण फुलांवर नेमके प्राबल्य आहे

जायचे नाही कधीही दु:ख आयुष्यातले जर
कोणता उद्देश करते साध्य व्रत-वैकल्य आहे?

ऐहिकाची जी

''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते''

एक ओठी,एक पोटी,जाणल्यागत वाटते
हात ते फैलावणे,आता न स्वागत वाटते

गोड वाणी मागचे अनुभव कडू आल्यावरी,
बोलणे सामोपचाराचे ''कलागत'' वाटते.

दाब दु:खाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते )

सावली माझी मला मोठी दिसाया लागली
जीवनाची सांज आता जाहल्यागत वाटते

भांडला ''कैलास'' इतुका कडकडा सार्‍यांसवे,
मूक माझे राहणेही

भाष्य

प्रेम आता मी स्वतः वर करत नाही
श्वास घेतो, हे खरे; पण जगत नाही...

भ्रमर इतके भोवती फिरती तरीही
फूल त्याच्या पाकळ्यांना मिटत नाही

प्रेम जुळल्यावर कशाला बोलशी हे -
'प्रेम आपोआप काही जुळत नाही!'

अंतरे ही वेगळी केव्हाच झाली
पण जुनी ती शपथ काही सुटत नाही

मार्ग माझा कोणता

तू .....

तू .....
.
*

कधी, कशी, कुठे सखे, नभा मिळे धरा इथे?
न सावलीस लाभणार चेहरा खरा इथे !

*

पहाट पारिजात हा जरी लुभावि अंगणा ,
तुझाच गंध माळुनी सलज्ज मोगरा इथे !

*

उठायचे निजायचे सुरू रहाटगाडगे,
अजून ’याद’ कोवळी सतावते जरा इथे !

*

तुझी ’अदा’ तुझी