गझल

गझल

दे चार श्वास दे रे ..

दे चार श्वास दे रे अजुनी जगायला
येणार प्रीत आहे मजला बघायला..

शृंगारुनी तरीही येतील लोक ते
लागेल वेळ थोडा त्यांना निघायला..

म्हणतील कैक वेळा "होता भला!",मला
जे पेटवून मजला निघतील जायला..

समजू नको खरी ही सारीच आसवे
रडती कुणी उगाही नजरेत यायला..

ओसंडतील कोणी ह्रदयातुनी इथे
क्षण चार दे

शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?

का सदा माझ्यापुढे ही संकटे 'आ' वासलेली?
काळ आहे माजला की जिंदगी सोकावलेली?

शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?
बोलता आलीच नाही गोष्ट मनि आकारलेली

मुक्त मी व्हावे म्हणोनी आणला आवेश अंगी
भान आले पाहिली अन, पावले ही बांधलेली

भौतिकाचे भाट, ज्यांना बोचला संसार माझा
आज संन्यासात त्यांची का

फडफडतो काळजात माझ्या...

फडफडतो काळजात माझ्या या प्रश्नाचा कागद
स्वच्छ कुण्या रबराने होइल आयुष्याचा कागद

अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद

किती किती होकार घेउनी वेळा आल्या, गेल्या
हाय ! अपूरा पडला माझ्या तळहाताचा कागद

अक्षर अक्षर तिचे तेवते दिवा बनुन वाटेवर
तिच्या जवळ नव्हता कुठलाही ती शिकल्याचा कागद

देवुनी तुझे तुला निघायचे मला..

देवुनी तुझे तुला निघायचे मला
वेगळे तुझ्याविना जगायचे मला..

रावणापरी तुझे कुकर्म पाहिले
चेहरे तुला किती?बघायचे मला..

झेप घ्यायचो पुन्हा पडायचोच मी
लोक आपलेच हे नडायचे मला..

बोललो जसे, तसेच वागलो तरी
'चांगला'कुणीच ना म्हणायचे मला..

माणसेच माणसास जगवितात ना?
फत्तरास अन् तरी पुजायचे मला?..

मैफलीत मी कसे रमायचे इथे

~ शामकांती सांजवेळी ~

शामकांती सांजवेळी, चांदणे माळीत जावे
शारदाच्या यौवनाला, रे दिला टाळीत जावे
..

ना भरोसा चांदराती, भाळलेल्या त्या क्षणांचा
सज्जनांनी सज्जनांचे, वायदे पाळीत जावे
..

चांद आहे साक्षीला, चांदणीही लाजलेली,
मग कश्याला भारलेले, तारुण्य जाळीत जावे ?
..

पौर्णिमेला गर्व होतो, गौरकांती यौवनाचा
चांदव्याने का अताशा, पौर्णिमा न्ह्याळीत जावे

उठ बा रे पांडुरंगा..

संत नाही राहिले ते, राहिले ना भाट आता
उठ बा रे पांडुरंगा दाखवाया वाट आता ..

पेरल्या नोटेस त्यांच्या पीक येते बहुमतांचे
लोकशाहीचा असा बाजार हा सरलाट आता..

सांगतो हा सातबारा आत्महत्येची कहाणी
कर्जमाफीचाच त्याहुन वाढला बोभाट आता..

वाटतो जो मुक्तहस्ते राज्य त्याचे, तोच राजा
तू तुझ्या कोट्यातलेही रोज थोडे

बदनाम..

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

का एवढ्याचसाठी ही साथ सोडली तू?
की ऐनवेळ ओठी माझ्या नकार आला...

हे ही बरेच झाले की बोललास खोटे
आहे कुठे खर्‍याची परवा इथे कुणाला?...

कळले असेल आता रडले पुन्हा पुन्हा का?
जखमा नवीन होत्या नाजूक काळजाला

पाणी थकले, जमीन थकली...

पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

कुठे हरवले तुझे नि माझे घन ते आनंदाचे ?
काय तुझ्या माझ्या जगण्याचा मोरपिसारा झाला ?

आधी होते चंद्र, कळ्या, पक्षांचे येणेजाणे
नको विचारू अता कशाचा मनी निवारा झाला

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर

''भारतीय''

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे निर्लज्ज नेते,
''मीच तारणहार आता'' आणती बघ आव येथे

''धर्म'' हे चलनी इथे नाणेच वाजे खणखणा की,
''झामुमो''च्या ही सदस्यालाच कोटी भाव येथे

ज्या रथाचा सारथी

मी तसा माणूस आहे

याचनेत बनाव माझ्या
अंतरी पण हाव माझ्या

जखम भरली, पण मनावर
खोल झाला घाव माझ्या

आत हरलो, चेहर्‍यावर
जिंकल्याचा भाव माझ्या

नेभळट मी! धाडसाची
काय चर्चा राव माझ्या?

चोरट्यांची काय भीती?
सोबतीला साव माझ्या

ती न यावी हा असे का
प्रीतिचा पाडाव माझ्या?

आज आली ह्या इथे ती
रे मना