गझल

गझल

... स्मरण असावे

विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'

भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'

एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे

पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?

आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज

''वाटतो जरी प्रसन्न मी वरुन''

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन

झाकले उघड कसे करायचे?
ठेवले बरेच आज आवरुन

जिंकली असंख्य सौख्यसाधने
डाव जीवनात सारखे हरुन

धूम वारु दौडते मनातले
मी तसाच बांधतो पुन्हा धरुन

पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन

शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का

आवेग दाटलेला !!!

आवेग दाटलेला !!!

.
*

वाहून काल गेला , राहून साचलेला !
वाही मढे मनाचे , हा जीव वाचलेला !!

*

रंगात रंगण्या त्या राधा बनून आले ,
का रे प्रतारणेचा तू रंग फ़ासलेला ?

*

मागून प्रेम येथे भेटे कधी कुणा का ?
गाठून तू विषाचा प्यालाच पाजलेला

सांजवेळी आठवांचा मेघ हा दाटे पुन्हा..

सांजवेळी आठवांचा मेघ हा दाटे पुन्हा
अन् झरावे, आसवांना सारखे वाटे पुन्हा...

मी नसे नुसता प्रवासी, मी दिशांचे खेळणे
पायवाटा या तरीही जोडती फाटे पुन्हा...

प्राक्तनाने अमृताचा घोटही मज लाभला
खोड ही आहे जुनी की चित्त हे बाटे पुन्हा...

लाविली आहेत रोपे आस कुसुमांची मनी
कुंपणासाठी जपावे लागले काटे पुन्हा

मनाला किती अन् कसे आवरावे?

मनाला किती अन् कसे आवरावे?
कधी मेघ होई कधी रानरावे..

घराला घराचे न उरलेच काही
कसे वादळाला अता घाबरावे?

नसे आत जागा नव्या वेदनांना
तरी घाव कोणी नव्याने करावे?

रिते आज सारे झरे आसवांचे
कसे लोचनांनी अता पाझरावे?

नभाला तसे रोज मी पांघरीतो
कधी त्या नभाने मला पांघरावे...

जरा शांत

छडा लागला रे

वृत्त - भुजंगप्रयात

तुझ्या सोबतीचा नशा लागला रे
असा जीवनाचा लळा लागला रे

मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे

अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे

फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे

तुझ्या बासुरीचा झणत्कार होता
अता भैरवीला गळा लागला

....सारे मला मिळाले !!! (गझल).

....सारे मला मिळाले !!! (गझल).
.
*

काही न मागताही सारे मला मिळाले ,
केसात माळले मी , तारे मला मिळाले !

*

मोडून मांडला तू मांडून मोडलाही ,
नेत्रात दोन अश्रू खारे मला मिळाले !

*

वाटेतल्या फ़ुलांचे काटेच बोचलेले ,
एकेक घांव ताजे कारे मला मिळाले ?

*

वाढती का अंतरे?

शून्य, भाकड प्रश्न माझा, व्यर्थ त्याची उत्तरे
साधण्या जवळीक जाता, वाढती का अंतरे?

काल वैराची सुपारी, आज मैत्रीचे हसू,
वागणे या जीवनाचे कोणते मानू खरे?

कोण तो? त्याच्या नि माझ्या वेगळ्या होत्या दिशा,
पाडली त्याच्या स्मृतींनी काळजाला का घरे?

मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!
वाचता आली कुणाला गूढ

भरावे शेत वात्सल्यात...

भरावे शेत वात्सल्यात पाटांनी जुन्या
पडे पाणी नवे जेथे रहाटांनी जुन्या

अता बोलेन तैसा जग मला स्वीकारते
तसे वैतागले होतेच भाटांनी जुन्या

नवा आजार येतो; राहतो बेवारशी...
दवाखाने पहा भरलेत खाटांनी जुन्या

बरे झाले कि झाल्या बंदशा वाटा नव्या..
तसे बोलावले होतेच वाटांनी जुन्या

पहा; मोठ्या महाली आज मीही राहतो

साचला अंधार आहे...

साचला अंधार आहे युगभराचा
अन दिवा हातामधे काही पळाचा

कोण राबुन जात असते रोज येथे
दव म्हणू की घाम असतो हा कुणाचा

मी कधीचा नांगरुन बसलो स्वताला
पण अजुन पत्ताच नाही पावसाचा

मीच माझ्या जीवनी कुंद्याप्रमाणे
मीच दुश्मन जाहलो माझ्या पिकाचा

जीवनाचा मी तुझ्या आनंद आहे
तू कधी आनंद हो