गझल

गझल

प्रवासी

आरशालाही स्वत:चा अर्थ कळला पाहिजे
चेहरा माझा खरा मज त्यात दिसला पाहिजे

पावलांना वाट कळते, एवढे नाही पुरे
त्या धुळीला हा प्रवासीही उमगला पाहिजे

पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे

वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)

वाट दु:खाची कितीही, संपुनी

''चेहरा''

''चेहरा''

चेहर्‍याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही

साहिल्या इतक्या झळा या जीवनाच्या
हाय ! आता आगही जाळीत नाही

वाटण्या आलो जगाला मोद किंतू
सौख्य इतुके माझिया झोळीत नाही

चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ते सरळ ओळीत नाही

सौख्य अज्ञाना मधे ही गोष्ट सच्ची
का तुला

भीती

नेत्र हे दाटण्याची वाटते भीती
टोमणे ऐकण्याची वाटते भीती

सारखी माणसाची बाटते नीती
एकटा राहण्याची वाटते भीती

भ्रष्ट, खोटारड्यांची राजनीती ती
हो! खरे बोलण्याची वाटते भीती

चोचले जास्त झाले, व्हायची फजिती
कायदा मोडण्याची वाटते भीती

सोसले फार आता बास ही प्रीती
मीच तो आज ज्याची वाटते भीती

जगून घे

आता जरासे हसून घे
श्वासांस थोडे जगून घे

जाता निघोनी लवाजमा
मागून त्यांच्या रडून घे

मारे कुणीही फुशारक्या
कानास दारे करून घे

क्रांती जिथे पेटुनी उठे
ज्वालांत तेथे जळून घे

जाशी करायास सांत्वना
थोडे स्वत:चे करून घे

स्पर्धा कुणाची कुणासवे
मधल्या मध्ये सावरून घे

आता कितीसे जगायचे
पुन्हा नव्याने मरून

... या नभी अंधारवेना

सांजले ! पण सूर्य कलती दाखवेना...
ती दिसेना ! या नभी अंधारवेना ...

पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना

एवढी नव्हती सवय कुठल्या सुखाची
दूरदेशी, बघ, मलाही राहवेना

मी तिचा नाही असे वाटून गेले..
आणि नंतर वाटले ते बोलवेना

ते तिचे जाणे नि येणे याच हृदयी...
सोसले पूर्वी

हे खेळ संचिताचे .....!

हे खेळ संचिताचे ...!

काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला

सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला

तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी

'' प्रश्न''

'' प्रश्न''

का नको त्याला मला मोठे म्हणावे लागले?
फ़ासुनी शेंदूर दगडाला पुजावे लागले

त्यागण्याला राजवैभव सिद्ध व्हावे लागले,
का असे त्या गौतमाला बुद्ध व्हावे लागले?

तो जरी नव्हताच दोषी कोणत्या खटल्यातला,
हाय ! येसूला क्रुसावरतीच जावे लागले

लीन होती खास मीरा कृष्ण भक्तीतच सदा
का तिला कडवे विषाचे घॊट

वंचना

इथला पहिलाच प्रयत्न! शिकतेय अजून!

--वंचना --
काय मी द्यावे कुणाला? मीच मोठी याचना
ओंजळी उरले न काही, ना असोशी जीवना

कोणिही यावे लुटावे, हेच नशिबी वाढले
कशि कळावी अंतराला? खरिखुरी संवेदना

शोभते जखमांत जी, ती वेदना मी पोशिली
बाळसे भोगांस आले, लोपुनी हर भावना

शोषणारे लेउनी आले ललाटी उत्तरे

नास्तिक...!

नास्तिक...!
-----------------------------------------------------------------------------------------------
देव होता कसा कोण पाहीला नाही,
आज माझ्यातही देव राहीला नाही...

रेखिली ही ललाटे अशी गूढ सारी,
भोग भोगायचा कोण राहीला नाही...

आसवांचे किती पूर वाहून गेले,
एक अश्रुसुद्धा आज वाहीला नाही...

देव पाण्यात मी सोडलेले जरीही,
मी कुणालाच पाण्यात पाहीला नाही...

आयुष्य हे सोस सोसून मेले,
शेवटाचा

बंडखोरी

रुढींची भिंत त्याने पाडली
मनाची बंडखोरी वाढली

उरे माझे अभागी झोपडे
पुरी वस्ती जरी ओसाडली

चला, बोली करा, भगवंत घ्या
इथे श्रद्धा विकाया काढली

जरासे स्वच्छ, हलके वाटले,
मनाची ओसरी मी झाडली

जगाचे ऐकले अन् वागले,
तरी तोंडे किती वेंगाडली!

व्यथे, आता तरी तू हो सुखी,
तुझ्यासाठी सुखे लाथाडली

विठू