गझल

गझल

चालतो ऐसा जणू ....

मी धरा झालो सुखे अन जाहली अंबर
'मी तुझ्या डावात नाही' ती म्हणाल्यावर

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर

भात झाला तिखट फिश्टीचा कदर नव्हती
यारिचा चवदार थर होताच की त्यावर

पोर शूद्राचे न शकले वाजवू घंटा
बामणाने घेतले उचलून खांद्यावर!

बांधुनी गेलीस पाया ताजमहलाचा

'' कैलास ''

'' कैलास ''

जखडू पाहे हर श्वास मला
जीवन वाटे गळफास मला

का जपतो मी हर क्षण आता?
सोडुन गेले दिन-मास मला

नावडले जे कधिच्या काळी
लागे त्याचाही ध्यास मला

जोखुन आता मम पाणी 'ते'
छळतील उद्या बिंदास मला

उपदेश दुज्यास विरक्तीचा
हर गोष्टीचा हव्यास मला

'' संयत्,शिक्षित नेते असतिल

'' शेवटी ''

वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी

लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी

भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी
लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी

देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी,
पाहिले

माझ्या मनात थोडे...

माझ्या मनात थोडे सांडून चांदणे
गेले कुणीतरी हे देऊन चांदणे

जेव्हा पुन्हा नव्याने उगवेल चंद्र तो
घेईन मी नव्याने वेचून चांदणे

करतो विचार आहे केवळ तुझाच मी
आहे जणू मला ते वेढून चांदणे

मी ऊब चांदण्याला देऊन पाहिली
गेले हळूच होते पेटून चांदणे

लोभस बरीच भासे माझी जुनी व्यथा
येते

ती स्वप्नसुंदरी

ती स्वप्नसुंदरी

सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

ते चित्र पाहतांना दिसते समानता(?)
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच

टोचले होते..

टोचले होते जगाने; खंत नाही
बोचले होते तुझेपण शब्द काही

घे, तुला सारेच माझे मोकळे घर..
पण मला ठेवायची आहे नशाही

काळजी घेतो जशी माझ्या मुलीची
अन् तशी सांभाळतो मी वेदनाही

लेकरे नव्हती तरी सांभाळले जग
अन् कुणी नुसतेच बनते वंशवाही

थांबले नाहीत डोळ्यातून अश्रू
केवढे होते तिचे जीवन प्रवाही

प्रदेश...

............................
प्रदेश...
............................

द्यायचा किती स्वतःस त्रास आणखी ?
व्हायचे कसे, किती उदास आणखी ?

एवढ्यात थांबली कशी तुझी कथा ?
तू लिहायला हवेस खास आणखी !

शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?

ये अजून, ये अजून, ये, समीप ये...
अंतराय फक्त एक श्वास

कधी स्वतःच्या ...

कधी स्वतःच्या जगण्यालाही विटलो
कधी अचानक श्वास कुणाचा ठरलो

किती, काय अन् कशाकशाचे सांगू...
कुणाकुणासाठी मी दाने हरलो

कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो

जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो

धरती इतकी चिंब कशाने झाली ?
कसा? कुठे? मी... केंव्हा? कधी बरसलो

गोचिडांची मौजमस्ती

गोचिडांची मौजमस्ती
.

चौखूर उधळे दाहीदिशा, गवसणी मग घालणार कशी?
नसते नाकही या मनाला, वेसण तरी टोचणार कशी?

खूप करती निश्चय-इरादे, मुक्त होण्यास जोखडातुनी
चूल-तव्याने बंधक केले, कंबर आता कसणार कशी?

जग बदलले, नाणे बदलले, बदलले ते सारे शिरस्ते
नाणी रुप्याची राणीछाप, पण ती इथे चालणार कशी?

उकर तू तुला

इतकी सुंदर ढाल?

मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल

मी रागाला गेल्यावरती तिने चुंबिला गाल
इतक्या कच्च्या वैर्‍यासाठी इतकी सुंदर ढाल?

लुटतो गाभा रसिक खरा अन होतो मालामाल
ज्ञानी आत्मा गांभिर्याने चघळत बसतो साल

स्वातंत्र्याच्या तबल्यावरती धरला कोणी ताल?
कानावरती येतच नाही का समतेची चाल