गझल

गझल

हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

वाटेत भेटतो रोज मला धमकावून जातो
हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावून जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो

मी देतो शिक्षा माझ्यामधल्या अपराध्याला
जो आरोप नेहमी माझ्यावरती ठेवून जातो

वाटे कधी कधी

वाटे कधी कधी

हातात हात घ्यावा,वाटे कधी कधी
तेव्हाच प्राण जावा,वाटे कधी कधी

दुबळा जरी असे मी,परि संकटात ती
माझा करेल धावा,वाटे कधी कधी

दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी कधी

मृत्यू अटळ जरी हा,येणार ''काळ'' तो
वेळीच ज्ञात व्हावा,वाटे कधी कधी

गेले निघोनी सारे, '' कैल्या''

किती सोपे मला हे प्रेम करणे वाटले होते...

किती सोपे मला हे प्रेम करणे वाटले होते..
सुखाचे स्वर्ग छोट्याशा सुताने गाठले होते!!

नशा, धुंदी, खुमारीने किती सांगू मला छळले..
मनाच्या अंगणी वादळ तुझे सोसाटले होते!!

मनाच्या ह्या कुरापाती स्वभावाला करू शिक्षा??
नको!..तेही तुझ्या हळव्या स्मृतींनी दाटले होते!!

तुझ्या "निष्काम" प्रेमाच्या वदंता ऐकल्या जेव्हा...
तुझे "ते" शब्द कुचकामीपणाचे वाटले

खुळा साज आहे..

कुणी का पुसावे?.. कसा आज आहे?
जसा काल होता.. तसा माज आहे!!

किती टाळले नियतीचे इशारे..
("तुझा" आजही आंत आवाज आहे!!)

नसे आजच्या बोलण्या अर्थ काही..
मौनासही हया "मुका" बाज आहे!!

उमलतांच मी, ती कळी कां मिटावी?
कसा मोगराही दगाबाज आहे!!

सत्यास कवडी, असत्यास रुपया!!
नसावी जगाला... मला लाज आहे

पाणपोई

रात्र सारी नशीला बाण होई
तोल जाताच का हैराण होई?

टाळते बोलणे माझ्यासवे ती
जीवनाचेच आज मचाण होई

आटले मृगजळांचे स्वप्नसाठे
रिक्त होती मनीची पाणपोई

नाव माझेच आता राहिले ते
कापली मान त्यांनी जाण होई

तोकडे ज्ञान माझे व्यर्थ वाही
तंग संस्कार, ओढा ताण होई

वेळ थोडाच आहे, सांगती ते

शक्य नाही

तुला मी भेटणेही शक्य नाही
असे मी राहणेही शक्य नाही

मनातिल स्वप्न माझे व्यर्थ आहे
तिला मी पाहणेही शक्य नाही

असा मी कायदा केला स्वतःशी
मला तो तोडणेही शक्य नाही

कुणी मज ओळखावे वाटते पण
मला, मी वाचणेही शक्य नाही

कुठे शोधू मला मी सापडेना
तिला मी मागणेही शक्य नाही

असे नव्हे

चंद्र दुपारी दिसतच नाही... असे नव्हे
मनासारखे घडतच नाही... असे नव्हे

जरी जगाला सदैव मी हसरा दिसतो
मला जिंदगी छळतच नाही... असे नव्हे

तशी तर मला रोजच कविता सुचते... पण -
तिला कधी मी सुचतच नाही... असे नव्हे

नको बाळगू गर्व फुका तारुण्याचा
नवी पालवी झडतच नाही... असे नव्हे

चुकलो

आसवे आता न केवळ गाळती माझे नयन

आसवे आता न केवळ गाळती माझे नयन

आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन

तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
तेच विभ्रम्,नी कटाक्षे टाळती माझे नयन

बंधनी मज ठेवण्या केले कितीही कायदे,
फक्त माझ्या कायद्यांना पाळती माझे नयन

शुष्क झाले दु:ख इतके

आता जरा मी लबाड झालो

जरी उभा चांदण्यात आहे
तरी उन्हाळा उरात आहे

लग्न मोडते ज्याचे नेहमी
त्याच्या दारी वरात आहे

सरकारी नोकर ओरडला
शासन माझ्या खिशात आहे

स्वातंत्र्याने जी मोहरली
शेळी ती कुंपणात आहे

ते आता घडणारच आहे
जे काळाच्या मनात आहे

आता जरा मी लबाड झालो
पुरी सचोटी कुणात आहे

विकणे होते कधीच

सोसले ना लाड ते कंगाल झाले

संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

गाव मी माझा जरी सोडून आलो
वेस ना ओलांडली तू उंबऱ्याची

लावण्या