गझल

गझल

वाटते बोलायचे राहून गेले

वाटते बोलायचे राहून गेले

आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले

विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया
आंधळे आले ,तिला '' पाहून '' गेले

मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा
आप्त माझे पाठ मज दावून गेले

माफ केले

गझलेत काय सांगू?

गझलेत काय सांगू?..(सांगायचेच होते!)
होता किती जिव्हाळा! (पण जाच तेच होते!)

कां भेटलो तुला मी?...ते आजही कळेना!
आभास ते म्हणू मी? कि ते खरेच होते?

माझा कधीच नव्हता, ताबा मनावरी ह्या..
ते बंध खेचलेले..सारे तुझेच होते!!

सांगू किती कुणाला..मी काय सोसले ते..
तो भूतकाळ होता... ते ही जुनेच होते!!

आता

घट अमृताचा

घट अमृताचा

लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
लपेटून धोंड्यास शेंदूरवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी

किती वाटले छान हे गाव तेंव्हा, जरासा उडालो विमानातुनी
इथे मात्र मेले कुणीही दिसेना, तरी का तजेला दिसेना कुणी?

विषा प्राशणे सर्वथा गैर आहे, तया बोलती लोक समजावुनी
परी कारणांचा जरा

किती सुखाचे असेल

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने अधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, बधीर होणे

घुमे विठूचा

सौदा

फक्त सुखाची किंमत बघून आलो
मी दु:खाशी सौदा करून आलो

उत्तर म्हणजे जबाबदारी असते
म्हणून केवळ प्रश्नच बनून आलो

हळवी वळणे आता विसरत आहे
आज तुझ्याही दारावरून आलो

तूच ठरव मी आवडलो का तुजला?
मी हातांच्या रेषांमधून आलो

आठवणींचा पाउस बरसत होता
अश्रूंमध्ये पुरता भिजून आलो

त्यांच्यापाशी पैसे रग्गड होते

अंगार चित्तवेधी

अंगार चित्तवेधी

दे तू मनास माझ्या आकार चित्तवेधी
नजरेत गुंतणारा आजार चित्तवेधी

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे
मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी

दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले
दु:ख्खा खरेदणारा

पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले...

पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले

पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले

प्राण जाईतो कुणाला लागला नाहीच पत्ता
लोक होते झोपले कि वार हि हळुवार झाले

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले

संधिसाधू दांभिकांची जाहली

प्रश्न हा फिजूल आहे शब्द हे बेचव कसे...

धावताना तोल गेला..ठेचकाळत राहिलो
दूर ती गेली तरीही मी खुणावत राहिलो

प्रश्न हा फिजूल आहे शब्द हे बेचव कसे
पूर्ण चोथा होईतो जर अर्थ चावत राहिलो

दक्षिणेसाठी खरेतर देव त्यांनी पूजिला
जन्मभर त्यालाच पण मी देव समजत राहिलो

प्रश्न हे बोथट जणू कि, तीष्ण आली उत्तरे
बुद्धीच्या निसण्या वरी मग

कळले मलाच नाही

सुचले कसे मनाला कळले मलाच नाही
स्वरगीत भावनांचे जुळले उगाच नाही

मी मद्य आठवांचे ओठास लावले का
ज्याने असे कुणाला छळले उगाच नाही

येते अशी समोरी म्हणते प्रिया मला ती
विरहात ज्योत झाले जळले उगाच नाही

कैफात आसवांच्या पाऊस चिंब झाला
झुरणे असे जीवाचे गळले उगाच नाही

हे डंखस्पर्श सारे

एक उदासी खोलीभर..

====================

एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू
रक्तामध्ये दु:ख तुझे विरघळत राहते जणू

सौजन्याचा रुमाल घेऊन पुसत राहतो गळा
चारित्र्याची धुतली कॉलर मळत राहते जणू

घरात एकाकी म्हातारी रडत राहते अशी
तुडुंब भरली घागर की डचमळत राहते जणू

एक अनामिक हुरहुर आहे शिल्लक कोठेतरी
शेपुटतुटकी पाल कुणी वळवळत राहते जणू