गझल

गझल

तिजोरी

यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला भिकारी

करा साजरे सोहळे प्राक्तनाचे
दिवे लावतो घेउनी मी उधारी

तशी मोजकी आसवे 'एकटया' ची
उशाशी सकाळी मुकी वाटणारी

ज़रा चाखली वर्तमानात आशा
कळे ना कधी भूत झाले विषारी

अजूनी दिवा लावतो सांजवेळी
अजूनी उभा वाट पाहीत दारी

तुझे नाव गेले झिजूनी अताशा

अपघात काय घडला?

रिमझिम सुरात धारा अवघा मळा बहरला
बांधावरी उतरल्या माझ्या अनंत गझला

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय घडला?

आई किती मयेची सार्‍याच लेकरांची
वाचून ओळ वरची गालात बाप हसला

अंधार शुभ्र झाला आभाळ सांडताना
भिजती धरा दिसेना, तो सुर्यही तरसला

ये मी रचून आलो माझे

होतीस तू

माझिया प्रेमात राणी,गात होतीस तू
भारलेली ही सुगंधी, रात होतीस तू

वाट वेडी, दाट झाडी, साथ होतीस तू
स्पर्श होतो चोरटा, लाडात होतीस तू

पेटती विझले निखारे, आसवांनी जणू
ह्या मनाच्या सागरी खोलात होतीस तू

वाटते की नित्य, नेमाने रुसावेस तू
जीवघेण्या आर्जवी, नादात होतीस तू

बाभळीचे रान होते, पावलो

ना ते

ह्या जगाशी ना जुळले नाते
ऊंच आकाशी रुळले ना ते

कष्ट मोठे पण यश ते आले
शेवटाला गाभुळले नाते

हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते

संशयाचे बी रुजले होते
दु:ख झाले हुळहुळले नाते

जन्म माझा संकट ते होते
ऊंब-याशी चुळ्बुळले नाते
......
कार ना थांबे भुरटे नाते

किमया

..............................................
किमया
..............................................

एकरूप माझ्याशी व्हावे उदकाने !
आस कोरडी बाळगली ही खडकाने !

आजच का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने बदकाने !

कधीच गेलो मी शब्दाच्या पलीकडे...
देत बसा वेलांट्या, मात्रा अन् काने !!

लयीत एका शांतपणे तेवे ज्योती...
का तापावे, तडकावे मग तबकाने ?

कधी कधी

मी जरा बोलायला गेलो कुठे

वाटले मजला जरी साधेच हे
भोवती होते कठीणच पेच हे

ऐकताना का कुणी गुंगू नये?
बोलणे आहे तुझे दिलखेच हे

घेतलाना आरशाचा गुण कुणी
माणसाला माणसांचे पेच हे

हेच क्रांती घडवतील नवी उद्या
माणसांचे काफिले साधेच हे

ठार केले तू मला तेव्हा तरी
राहिले माझे ठसे मागेच हे

मी जरा

आवाज आसवांचा

हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा

संगीत, रोषणाई दारावरी प्रियेच्या
पाहून पेश केला मी साज आसवांचा

दुष्काळ दाटलेला आनंद आटवोनी
डोळ्यांस पूर आला का आज आसवांचा?

डोळ्यात कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज आसवांचा?"

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

देशील मला तू अश्रू....

देशील मला तू अश्रू.... मज हे ठावुक नव्हते
मी हसतच दु:ख पचवले, तुला हे जमले नसते

मी सजवित होतो स्वप्नं जरी माझ्या भवताली
जे स्वप्नं जयाचे असते, ते तर त्याला मिळते

मी एक-एक टाक्याने विणले, वस्त्र मनाचे
उशीराच कळाले, काळ लोटता रेशीम विरते

तू तुला विसरुनी गेलीस परदेशात युगांच्या
ये

गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...

आल्या तुला अताशा वाटून या सरी
माझ्या कवेत होत्या दाटून या सरी

येईन बोललेला झाडास थेंब तो
नेल्या कुणी नभीच्या लाटून या सरी

त्यांचेच ते बरसणे, त्यांचाच अंतही
का हासल्या तरीही फाटून या सरी

तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...

दावू नका ह

झेलू

आणलेला आव झेलू
झूट सारे डाव झेलू

दूर जाती आप्त आता
वादळी हे घाव झेलू

अर्थ नाही वागण्याला
ठेवले ते नाव झेलू

का पळू मी लांब आता?
राहिलो ते गाव झेलू

लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू