गझल

गझल

नसतीच आसवे तर....

सजवील वेदनांचा रस्ता कवी
नसतीच आसवे तर नसता कवी

सांगून काल गेली मजला रती
मदनास मात देतो हसता कवी

शोधू नकोस त्याला शब्दात तू
देवास वाटतो गुलदस्ता कवी

सोडून धीर जग हे बसल्यावरी
मी पाहिलाय कंबर कसता कवी

बोले कुबेर सारे दाऊन धन
नसतोच एवढाही सस्ता कवी

- ह. बा

सरळ वागून ती वागली वाकडी

सरळ वागून ती वागली वाकडी
खरंच नाहीत रे माणसे बापडी

''पाठ आई मज, अजून बाराखडी''
विसरलो मी कुठे आजही ती छडी ?

टणक सगळेच इथले मला भासते(वाटते)
हात ही ,पायही, ह्रुदयही लाकडी

रोज जाती बळी माणसे फुकटची
रोज आतून ही पिळवटे आतडी

काढतील कुठला न कुठला मार्ग ते
लोक आहेत

वेदना

कोती असे वेदना कोनाड्यातली
लोभी असे वेदना हो माझ्यातली

ना अर्थ कोलाहलाला मौनात तू
मेलीच संवेदना बोभाट्यातली

स्पर्शेच आकाश माती वा-यातली
का वाहतो वेदना तो नात्यातली?

ना लागतो ठाव हा ऊंची गाठुनी
वाजे वृथा वेदना झोपाळ्यातली

का मारशी तीर जहरी पाठीवरी?
कुरवाळतो वेदना तो भात्यातली

जा, द्ळु नको, गोष्ट आज

तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा

तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा
सुखी जातीत होते ते, सुखी जातीत ते आता

तुझ्या जोडीस घे तिजला अता घनघाव घालूदे
जिच्या नाजूक हाताने जगाचा चालला भाता

बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
पुजेला कोणता नेता हवा रे पंढरीनाथा?

कधी ना वाटले मुकलो भुईला जन्म देणार्‍या
जिथे मी टेकला माथा

ती काळजीत असते...

गार्‍हाण साठल्यावर ती काळजीत असते
आईस भेटल्यावर ती काळजीत असते

भिजवीत अंग नाही पाऊस पाहताना
रस्त्यात गाठल्यावर ती काळजीत असते

पसरून कुंतलाना ज्याच्यावरी सुखी, तो
वारा पिसाटल्यावर ती काळजीत असते

अंधार भोगण्याची नसते सवड चिउला
चोची पहाटल्यावर...? ती काळजीत असते

तुटली कितेक झाडे झाली सवय तरीही
फांद्या तटाटल्यावर ती काळजीत

~ या दिलाचे .... ~

या दिलाचे हाल झाले
जे हवे ते काल झाले

वादळे झेलीत गेलो
ते कसे बेहाल झाले

आर्जवे केली किती मी,
का तयांचे जाल झाले ?

छेडताना स्वर सारे
ताल ते बेताल झाले.

पहिले ईश्कास जेंव्हा
वाटते कि साल झाले.

स्पर्शिले डाळींब जेंव्हा
ओठ का ते लाल झाले ?

- रमेश

तरी हुंदक्यांना गिळावे किती?

तरी हुंदक्यांना गिळावे किती?

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते तुझे
तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती?

जरी देह-काया चिरंजीव नाही, तळे भावनांचे तरी साचते
जरी

बंद दिवसाच्या घराचे दार ...

बंद दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अंधार होताना

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना

सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे

कालचा पाऊस

भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला

आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?

मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून गेला

चातकावरुनी चिडवतो पावसाला -
’पोट भरले अन् तुला विसरून गेला’

ते तुझ्या डोळ्यांतले काजळ असावे
की उगाचच मेघ अंधारून गेला?

त्या

जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे

नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा सांडणे बरे नव्हे
जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे

विटाळ ज्याचा लवण तयाचे चविष्ट ना लागते इथे
कशास चर्चा,तू तर आता मतहि मांडणे बरे नव्हे

तगमग आहे तुझी मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण कांडणे बरे नव्हे

पिकावया शेतात अथक बैल