गझल

गझल

..काय मी

माझे मला ना कळे, केले काय मी?
त्या पायरीशी कसे नेले पाय मी

का चोरला घास माझ्या त्यागातला?
ते ताक होते जळालेले, साय मी!

ना राहिली ओढ, भेटू कोणास मी?
माझ्याकडे ओढले गेले काय मी?

सैतान झालाच जागा माझ्यातला
पापाकडे ह्या जीवा, नेले, हाय! मी

त्यांनीच तो लावला लोभी सापळा

छानपैकी जगून गेलो मी.....

छानपैकी जगून गेलो मी
छान होतो... म्हणून गेलो मी

प्यायलो कोळुनी विषय सारे
फक्त डोक्यावरून गेलो मी

चेहरा खूपसा बदललेला
काल माझ्यापुढून गेलो मी

ती दिसावी म्हणून गेलो.. पण..
वाटले की.. कुठून गेलो मी

पाठलागावरील आनंदा
ये इथे तू...... इथून गेलो मी

शोधले पाहिजे स्वतःलाही
पार डोक्यामधून गेलो मी

वाट

रहस्ये गाडली गेली तळाशी

रहस्ये गाडली गेली तळाशी..

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

*कुठे टिंबे, रिकामी ओळ होती...
कसे हे जोडले नाते तुझ्याशी?

किती लहरी तुझ्या सांभाळल्या मी
(चकित होवून बघती ते खलाशी!)

शिळोप्याच्या सुरू गप्पा कधीच्या
बिचारे पोट बसलेले उपाशी

तिथे

अधाशी....

खात आहे अधाशी किती....?
वेदने तू उपाशी किती....?

काय संकोच गेला कुठे...?
लाजली तू मघाशी किती....?

चारचौघीतही शांत तू....
बोलते पण स्वतःशी किती....!

घातले घास खाऊ मला..
ठेवलेही उपाशी किती...?

"प्रेम केले" तिला बोलता..
काय..? कोणी..? कुणाशी..? किती...?

तुझ्या केसात

मेघ काळे लाघवी प्रिये दाटले केसात तुझ्या
वारियाचे दूत बावरे धावले केसात तुझ्या

संधिकाळी साठतो नभी रोज चाफ्याचा चुरा
फूल होते पीतवर्णी माळले केसात तुझ्या

दाट आभाळातुनी असे होतसे थेंबास कधी
कोसळोनी एकदा जसे झोकले केसात तुझ्या

शुद्ध ना गे राहते मला पांघरोनी केस तुझे
रेशमाचे स्पर्श कोवळे लाभले केसात

वाट पाहे दारावरी

गोठुनी व्यापे निराशेची हवा दारावरी
वाट पाहे सांजवेळी पारवा दारावरी

सैल होता आठवांची गुंफलेली मालती
गीत गाता सांडतो गे मारवा दारावरी

हीच का ती वाट होती हीच का माझी कथा
हीच का ती मागणारी जोगवा दारावरी

पेटला वैशाख येथे पेटवोनी प्राक्तना
कोठुनी आणू सुखाचा गारवा दारावरी

तेज ओले होत जाता

पाहते

पाहते तुज पाहते लाजते मी लाजते
भावगंधित होउनी भाळते मी भाळते

मोहरून शहारती अंगअंगीची पिसे
काननी मयुरासवे नाचते मी नाचते

फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी हासते

चंद्रकोर उजाडुनी रात ना जावो कधी
कोवळ्या किरणांतुनी भारते मी भारते

बासरी कुठुनी बरे सूर छेडी लाघवी
कुंद धुंद सुरावरी

अवेळी अशा..

=================

अवेळी अशा आज कोणाकडे जायचे?
कुठे घेऊनी आपले हे रडे जायचे?

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

मला लाभली कल्पवृक्षा तुझी सावली..
कसे शक्य आहे अता कोरडे जायचे?

कुणाची तरी गाव चाहूल लावायचे
कुणाच्या तरी अंगणाशी सडे जायचे

तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो
तरी

चंद्र झालो

मी वाट चांदण्याची शोधीत चंद्र झालो
माझ्या कलाकलांना माळीत चंद्र झालो

कल्याण आळवीती ओल्या मधाळ राती
गंधार भाववेडा ऐकीत चंद्र झालो

खाणाखुणा तमाच्या शोधून सांगताना
शुक्रास मी ललाटी भाळीत चंद्र झालो

शब्दात झाकलेल्या अर्थास तेज देण्या
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र झालो

होता सभोवताली बेधुंद रोषणाई
रंगीत चंद्र झालो, धुंदीत चंद्र

माणसांना भार होती माणसे

माणसांना भार होती माणसे

माणसांना भार होती माणसे
केवढी लाचार होती माणसे!

सारखा माणूस कोठे सापडे?
आपला आकार होती माणसे

एकट्याने मी दिला माझा लढा
शेवटी येणार होती माणसे

पाहिले ज्याने तुला तो संपला
ना उगा बेजार होती माणसे

ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे

बोलण्याची वेळ