गझल

गझल

...घट एकांतात झरावा !

.......................................................
...घट एकांतात झरावा !
.......................................................

सोईने ज्याने-त्याने जगण्याचा पट पसरावा !
दिवसाची रात्र करावी; रात्रीचा दिवस करावा !

कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

जिंकावे दोघांपैकी कोणीही; हरकत नाही...
माझी अट इतकी आहे, खेळाला रंग भरावा !

मी माझ्या सोबत आहे

दिसू लागले स्पष्ट जेवढे

माती

उधळले चांदणे त्यांनी तरी भेगाळली माती
कुणाचे सांडले अश्रू?... कशाने तापली माती?

इथे जो तो सुखाचे पीक घेई नित्यनेमाने
कशी राहील उपजाऊ अशाने येथली माती?

तुम्ही तर बोलला होतात रुजवू बीज ऐक्याचे
तरीही काल रक्ताने कुणाच्या... माखली माती?

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली

भेटाया आल्या गझला, त्याच्या नंतर.

आला काल निरोप तिला, त्याच्या नंतर
भेटाया आल्या गझला त्याच्या नंतर

हासत गेली सारी स्वप्ने पैलतिरी
गाव दिला हा मदिरेला त्याच्या नंतर

थांब जरा होईल इशारा काळाचा
येणार्‍या ये उदयाला त्याच्या नंतर

झोळी भरली इतके जमले ना ना ना
शिकलो ना देणे ना ला त्याच्या नंतर

शब्दाळुंचे वारुळ पिंजुन दमलो

बाकी तसा कैदेत काही त्रास नसतो 'बेफिकिर'

गाठायचे असते स्वतःला..... गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर... थांबले की जाहले

तू ये, नको येऊस तू..... मी आपला असतो इथे
कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले की जाहले

सध्या कशी आहेस तू ही काळजी नाही मला
तेव्हा कशी होतीस तू हे चाळले की जाहले

दारूत पाणी घालण्याची सोय नाही राहिली
पाणी

... वंशातल्यांचे

मी पुरावे शोधले त्यांच्यातल्यांचे
अन् दुरावे रोखले माझ्यातल्यांचे

चालली कसरत अशी अर्थासभोती
नाच नंगे खेळती शब्दातल्यांचे

एकही शत्रूस नाही सोडले मी
काय मग होईल या हृदयातल्यांचे ?

येर बसती सज्जनांच्या पंगतीला
बेत काहीसे फसावे आतल्यांचे

सत्य कोठे माहिती आहे कुणाला ?
नाव होते आजही पेल्यातल्यांचे

सोडती घरटे... तरी सोडा म्हणावे

माणसाला म्हणे मारते भाकरी!

पीक हे घेतले कोणत्या वावरी?
माणसाला म्हणे मारते भाकरी!

मायची आजही सांडते पापणी
गोजिरी केवढी दंगली सासरी

चालला कोण तो? राधिका बावरी
गोकुळी एकटी वाजते बासरी

लोकशाही तुझे लेकरू बाटके
नोकरा आज ते माग ते चाकरी

काल सत्ते घरी खेळ मी पाहिला
भाउजी भोंगळा मेहुणी लाजरी

झाड मी वाढलो कातळाच्या

चालताना ........

चालताना...

चालताना हा किती बघ घाम येतो
होतहोता शेवटी मुक्काम येतो

ठाम ज्याचे बोलणे आहे तयाचा
बोलताना शब्द ही मग ठाम येतो

वाटते जे व्यर्थ तेही बाळगावे
व्यर्थ जाता मोहराही काम येतो

सार्‍यांस निरोप त्याचा पोचतो पण,
ना इथे पत्र ,ना कुणास सलाम येतो

सापडेना राधिका आता कुठे ती
ना

छोट्या बहराची गझल

(कमीत कमी बहराची गझल करावी असा विचार एकदा डोक्यात आला आणि एक प्रयत्न केलाय...)

चोर आहे?
थोर आहे!

पूर्ण होता -
कोर आहे

बस जिभेतच
जोर आहे!

ओठ - पिकले
बोर आहे!

शांततेचा
शोर आहे

प्रेत आणि
दोर आहे

ही गझल ना?
घोर आहे!

नचिकेत जोशी

चढलेल्यांना निम्मा करतो

सांगत फिरतो जो सूर्याचा चुम्मा करतो
जरा भाजल्यावर का इतके यम्मा करतो ?

नाव ओळखीचे दिसता लपलेले येती
एक नाचतो, दुसरा छम्मा छम्मा करतो

ऐकवली बैलास गझल अन् बरे वाटले
कळो ना कळो, निदान थोडे 'हम्मा' करतो

वात्सल्याचा अर्थ एक, उच्चार वेगळे
कोणी मम्मी, आई, कोणी अम्मा करतो

सहकार्याचे किती