गझल

गझल

उसवित बसले बूड कवी हे ज्या झोळ्यांचे

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे

लाकुड तोड्याने सोने लाथाडुन जावे,
इतके का गरजेचे खपणे त्या मोळ्यांचे?

बंक्यासाठी ज्ञान्याने भरलेल्या तेव्हा
उसवित बसले बूड कवी हे ज्या झोळ्यांचे

परदेशाहुन आल्यापासुन 'तसली' फडकी
भाव किती खाली गेले बघ ना चोळ्यांचे

कोण्या काळी जो गरुडांची काशी

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये
त्या क्षणी हृदय तुला मी वाहिले प्रिये

दु:ख ते कुठे कधी मला न लाभले
गाठण्या तुला बरेच साहिले प्रिये

तू कठोर बोलते तुला विसर पडे
खोल घाव मन्मनात राहिले प्रिये

संकटे तुझ्या विना असंख्य ग्रासती
संकटास

ऐकत नाही आता हे मन...

ऐकत नाही आता हे मन
रात्रंदिन केवळ आक्रंदन

कधीतरी मग संयम सुटतो
अवेळीच होते उद्दीपन

भूक लागते शरीरास, मग
कसली सीमा? कसले बंधन?

झाले बघ दोघेही मोठे
परस्परांचे करुनी खंडन!

सूट बूट अन टाय गळ्याला
तोंडावर कृत्रिम अभिवादन

जिकडेतिकडे मोठ्या वेण्या
स्वस्त जाहले का गंगावन?

आधी घालू शिव्या जगाला
नंतर

कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...

कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...

जुन्याच घटना कुणी कधीचे ,इथे तपासत बसले आहे
जुन्याप्रमाणे नवीन येथे ,कधी तरी का घडले आहे?

तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया ,शहर नव्याने वसले आहे

खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे

नव्हतो

मी कधीही पेटलेली आग नव्हतो
मी कधीही बहरलेली बाग नव्हतो

भूक होती, झोप होती, श्वास होते
मीच देहाचा कधीही भाग नव्हतो

कोण होतो ते मला कळलेच नाही
कमळ नव्हतो, फणस नव्हतो, साग नव्हतो

माळरानी छेडलेली शीळ होतो
मैफलीमधला कधी मी राग नव्हतो

लागला माझा कसा तुजला सुगावा?
ठेवुनी जावा असा

तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे
हे मला पावलो पावली पाहिजे

मी भले राहिलो ऊष्ण ऊन्हामध्ये
तुजवरी हरघडी सावली पाहिजे

मी कुणा आवडो,नावडो मी कुणा
मात्र सर्वांस तू भावली पाहिजे

चक्र पायात मी घेवुनी हिंडतो
तू कुठे ना कधी धावली पाहिजे

आज ''कैलास'' आहेस

दु:ख माझे सोबती !

दु:ख माझे सोबती !

तू बिलोरी वेदनांची लालसा आहे !
मी नकोशा चेहर्‍यांचा आरसा आहे !

सज्जनांना लाभलाहो न्याय हा अंती
मी भिकारी लक्तरांचा वारसा आहे !

पुंडलीका वीट देवा तू नको मांडू
विठ्ठलाची आस कोठे माणसा आहे ?

फास घ्याया लागले ते वीर जे होते
का निखारा थंड आता

हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा

कृष्णधवल गोपिका पहाण्याचा गोडवा
हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा

भाळावर घामाच्या चमचमत्या चांदण्या
सापटीत घुंगुरत्या गाण्याचा गोडवा

जांभळाच्या चविलाही आलाय साजणी
जांभळीच्या आड त्या... बहाण्याचा गोडवा

शिकलेल्या माणसाना शिकवावा मी कसा
रस्सा भुरकीत भात खाण्याचा गोडवा!

रापलेल्या शब्दानो या तुम्हा मिळेल, या
काळजात कृष्णेच्या पाण्याचा गोडवा.

धन्यवाद. राम कृष्ण हरी!!!

हा जुगार

खेळणार आज हा जुगार मी
मांडणार वेगळा विचार मी

पाय वाजले जसे तुझे तिथे
ठेवले खुलेच एक दार मी

बोट लागता नवे शहारते
वाजवू कशी तुझी सतार मी

नवल काय जर कुणा न समजलो
एक खूप वेगळा प्रकार मी

पुसट आकृती मला न भावते
ठसठशीत चित्र काढणार मी

हेच असावे सत्य...

दि. २३ मे च्या मुशायर्‍यात मी सादर केलेली गझल....

हेच असावे सत्य जे कुणी मानत नाही
[ छोटा-मोठा वाद कधीही संपत नाही ]

खरेच आहे दुनिया असते आपलीच, पण...
कुणीच येथे कुणाचसाठी थांबत नाही

संधीसाठी चेला बनला, पाया पडला
आता तर तो ओळखसुद्धा ठेवत नाही

कुणास मिळतो स्वर्ग, कुणाला दुनिया