गझल

गझल

थवा

कशाला पुन्हा वेगळाला हवा
तुलाही थवा अन मलाही थवा?

तुझे गीत भासे जसा सापळा
तुलाही हवा अन मलाही हवा!

चला घेउया ग्लास भरुनी पुन्हा
तुलाही दवा अन मलाही दवा!

कसा काय हा उभ्याने शहारा?
तुलाही नवा अन मलाही नवा?

चल लाच घे अन कंत्राट दे रे
तुलाही खवा अन मलाही

तरी समुद्रा तुझ्या किनारी

लाटांनी येऊन शरण लोटांगण घेणे संपत नाही
तरी समुद्रा तुझ्या किनारी पुर्वीइतके करमत नाही

सोसाट्याचा वारा हिरव्या पानांनाही घेउन जातो
असे वाटल्याने दबलेली नवी पालवी उमलत नाही

चौकामध्ये गाडी पुसुनी टकटक करते पोर भिकारी
खिशातून रुपया काढेतो लाल बावटा राहत नाही

अजून बसते तिथेच अमुच्या लहानपणची भाजीवाली
मुलगा पिऊन मेला

पाय ओढायला जडतात ती!

साठवा आसवे सडतात ती
प्यायला स्वस्तही पडतात ती!

पाखरांची घरे जळल्यावरी
पाहिले का कशी रडतात ती?

मी कुठे मांजरे कुरवाळली,
नेहमी माणसे नडतात ती?

टाळ तू मैफिली... व्यसनेच ती
पाय ओढायला जडतात ती

ठेवली लेकरे कवळून जी
का मला पाहुनी दडतात ती?

उधाणलेला समुद्र....

उधाणलेला समुद्र, आपण पाहत असतो
खोल-खोल दु:खाने तो फेसाळत असतो

मोजत असशील तू ही लाटांमागुन लाटा
संथ किनारा असा न केव्हा जागत असतो

सोसुन दु:खे युगां-युगांची विसावण्यास्तव
किनार्‍याकडे एकसारखा धावत असतो

भीषण वादळ क्षणात देतो उठवुन तरिही
क्षितिजाशी तो किती दयेने वागत असतो

माझ्यामध्ये सुद्धा... एक समुद्रच आहे
वादळ घेवुन

दुःखे

का निरागस सोबत्यांना मी दिली दुःखे?
जन्मभर एका चुकीतुन भोगली दुःखे

दुःख विसराया जरी मी प्यायलो थोडा...
प्यायला माझ्याच संगे बैसली दुःखे

मज सुना एकांत माझा आज आवडला
जी तुझ्या संगाहुनी मज भावली दुःखे

जो कधी जगती सुखांच्या जीव हा रमला
आठवण माझीच काढू लागली दुःखे

हा वसंताचा बहर आला

निखारे

नालायकांस कोणी द्यावे किती इशारे
उडवून झोप त्यांची जाती पहाटवारे!

छिद्रामुळे बुडाली त्यांची अजस्र नौका
आता तरींमधूनी ते शोधती किनारे!

मैत्रीस जागुनी मी त्यांच्या मिठीत गेलो
पाठीमधेच त्यांनी सरकाविली कट्यारे

खुर्चीतुनीच आज्ञा देती भिकार राजे
होते न जे कधीही युद्धात झुंजणारे!

उरले उरी न आता आवाज चांदण्यांचे
आता कवेत माझ्या

दूरचा किनारा

करण्यास पार क्षितिजे पाउल मी उचलले
रस्ते निघून गेले, मागे मला विसरले

भर श्रावणात जेव्हा दुष्काळ पाहिला मी
या भूतलास माझ्या अश्रूंत मी भिजवले

येणार ना कधीही माझा वसंत आता
बागांमध्ये फुलांच्या वणवेच मी उठवले

स्मरलो तुलाच जेव्हा मी वेदानांत माझ्या
ते दुःख रोज ताज्या जखमांत मी भुलवले

गाठायला निघालो

तुकारामा..

किती आले किती गेले महाज्ञानी तुकारामा..
कुणीही पोचला नाही तुझ्या स्थानी तुकारामा..

जरी हे लाभले आम्हा विचारांचे करंटेपण..
करी श्रीमंत जगण्याला तुझी वाणी तुकारामा..

फुकाचा गर्व थोडाही तुला का स्पर्शला नाही...
शहाणे थोर आताचे किती मानी तुकारामा..

दिले तू दान अर्थाचे , खरोखर धन्य ते झाले..
किती केलीस शब्दांवर मेहरबानी

त्यांनी.....

काढता घेतला पाय त्यांनी...
शोधला छान पर्याय त्यांनी...

दूध नावास मी राहिलेलो...
काढली एवढी साय त्यांनी...

वाढवुन आपल्यातील गुंता...
मोकळा मार्ग केलाय त्यांनी...

हाय लागेल तुमची तुम्हाला...
लावली एवढी हाय त्यांनी...

अर्जुना प्राण सांभाळ अपुला...
सुर्य यंदा लपवलाय त्यांनी...

पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

काठभरल्या घागरीतुन गाळलेल्या वेदना
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना

पीठ आहे अडकुनी जात्यात आरीभर जरी
पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना

तीच ती भांडी घरी आहेत तुटकी आजही
वाहिल्या कृष्णेत पण खंगाळलेल्या वेदना

मंदिराच्या पायरीवर काल त्याला पाहिले
का बरे मी टाळल्या कुरवाळलेल्या वेदना

प्रेमदात्या पाढरीची काय ही जादूगरी
कोंभ हिरवा प्रसवती