गझल

गझल

ताटाखालची मांजरे

वेगवेगळ्या धर्मांचे वेगळे रंग झाले
सारख्याच माणसांचे आगळे ढंग झाले

आज राहिला न गाभा-यात माझा विठोबा
मोजण्यात नोट सारे मंदिरी दंग झाले

काय बोलणार ताटाखालची मांजरे ही?
बोललो जरा कुठे मी आणि वादंग झाले!

भाकरी न भेटली त्यांना कुणा काय वाटे?
ती रिती जरी तिजोरी, 'हे' खिसे तंग झाले

शोधतो अजूनही

'आहे 'खरेच का मी ..(एक नवीन शेर)

'आहे 'खरेच का मी ..जोखावयास आले
निश्वास एकदाचा टाकावयास आले


होतो जिवंत तेव्हा, साधे न बोलणारे
पश्चात भाषणेही ठोकावयास आले


संभावितांपुढे मी वाचू कशास गीता...
साधेच लोक गझला वाचावयास आले


शेजारखेळ त्यांनी केला असा इमानी..!
लावून आग, पाणी टाकावयास आले


भाषा मराठमोळी, आहे म्हणून माझी
शब्दांपुढ्यात माझ्या वाकावयास आले

दु:खात

तसा वेदनेला ही मी आवडलो नाही

मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही
तसा वेदनेला ही मी आवडलो नाही

अता किनारे आणि बंधने कशास मजला
पापण्यांत जर कधी कुणाच्या अडलो नाही

मान्य मला मी इथे यायला नकोच  होते
उजाड स्वप्ने बघून ही गडबडलो नाही

मी सूर्याचे वार झेलले छाती वरती
कधी सावलीआड स्वतःच्या दडलो नाही

दूर तुला जाताना येथे पहात होतो
निघून गेले प्राण तरी

खंत

प्रत्येक चेहरा आता विंगेत रंगतो आहे
प्रत्येक नर्मदी गोटा गंधात माखतो आहे

"मी बोलणार ना खोटे" ही शपथ वाहतो आहे
सोयिस्कर मज वाटे जो - तो अर्थ काढतो आहे

गुंडाळला रिळाला जो कोराच पाहिला होता -
-तो आज बातम्या खोट्या रंगीत दावतो आहे

चंद्रास भाकरीच्या ना मोताद राहिला कोणी
प्रत्येक

'आहॅ 'खरेच का मी ...

'आहॅ 'खरेच का मी ..जोखावयास आले
निश्वास एकदाचा टाकावयास आले

होतो जिवंत तेव्हा, साधे न बोलणारे
पश्चात भाषणेही ठोकावयास आले

संभावितांपुढे मी वाचू कशास गीता...
साधेच लोक गझला वाचावयास आले

शेजारखेळ त्यांनी केला असा इमानी..!
लावून आग, पाणी टाकावयास आले

भाषा मराठमोळी, आहे म्हणून माझी
शब्दांपुढ्यात माझ्या वाकावयास आले

                                         -संतोष कुलकर्णी, उदगीर

...काय करू मी ?

...काय करू मी ?

सांग जगू की सांग मरू मी...काय करू मी ?
काय करू मी...काय करू मी...काय करू मी ?

एकच सांगावेस कराया...शक्य मला जे -
बोल, स्मरू की तुज विसरू मी... काय करू मी  ?

झेप कशी घेऊ...? गगनाची सक्त मनाई... !
पंख अता कोठे पसरू मी...काय करू

असे प्रेम देवा

सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

किती छाटले झाड फुटती धुमारे, किती मेघ  आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे

जशी भेटते ती नदी सागराला, जशी लाट शोधून गाठे

मिळेल का दोन घोट पाणी.....


जुळेल का भग्नता जराशी
भरेल का रिक्तता जराशी......

विचारतो जीव शीणलेला
मिळेल का शांतता जराशी

मिळेल का दोन घोट पाणी
निवेल का दग्धता जराशी

थकून गेलेत नेत्र माझे
हसेल का खिन्नता जराशी

नभात होईल भेट जेंव्हा
निघेल का  भिन्नता जराशी....


 


...काळजी नको !

...काळजी नको !

कोण काय ओरडेल...काळजी नको !
जे घडेल, ते घडेल...काळजी नको !

चार आसवे निदान लाभतील ना...?
कोण शेवटी रडेल...काळजी नको !

प्राण द्यायला तयार सोबती किती...
जीव कोण पाखडेल...काळजी नको !

वाग तू मना तुला जसा हवा तसा...
ते कुणास आवडेल...काळजी नको !

मेघ आज कोरडाच, मात्र

ना उन्हाळा भोगला मी फारसा

ना उन्हाळा भोगला मी फारसा...
तू नको इतक्यात येऊ पावसा...

दु:ख आहे नेहमीचा सोबती
सांग का ठेवू सुखावर भरवसा?

हरवले गर्दीत सारे चेहरे
पारखा माणूस येथे माणसा...

सोडुनी गेला पुढे तो एकटा
(पावलाचा पुसटसा आहे ठसा)

दाटला अंधार सारा भोवती
चांदण्याचा एक आहे कवडसा...

लोकहो, इतके करा आता तरी
दु:ख