गझल

गझल

राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे


राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे
भेटतो भेटावयाला पण चुकाऱ्यासारखे

लागला मौनातल्या वाटेवरी वाडा तुझा
आणि काही शब्द मातीच्या ढिगाऱ्यासारखे

याद आली श्रावणाची त्या तुझ्यामाझ्या पुन्हा
जाहले काळीज मोराच्या पिसाऱ्यासारखे

या तुझ्या शहरात सारी माणसांची जंगले
रात इथली पारधी, दिनही शिकाऱ्यासारखे

लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे

मी कधी

...आहेस कुठे तू ?

...आहेस कुठे तू ? 

तुझी काहीच खबर नाही...आहेस कुठे तू ?
तुझे ठावे न कुशल काही...आहेस कुठे तू ?

किती मी जाचक मज झालो...ये मुक्त कराया...
किती हा धाक... दडपशाही...आहेस कुठे तू ?
 
कुठेही जीव रमत नाही...मी काय करावे ? 
तुला जाणीव नच जराही...आहेस कुठे तू ?

किती मी

निराधार

 

लोकशाही सरकार येथे
अन् सरंजामी फार येथे

प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)

सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे

ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे

लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे 

भेट झाली नाही वसंता   
(होतसे का  झंकार येथे?)

सूर्य गेला अस्तास पण हा
 काजवा का बेजार येथे ?    

-सोनाली जोशी

हे खरे ना?

स्वप्न होते आपलेही - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
बोलणे फिरले तुझेही - हे खरे ना?

वाळली आतून वेली स्पंदनांची
बेगडी आता फुलेही - हे खरे

दे


दान देताना सदा ते झाकून दे
झाक डोळे पाहणे ही सोडून दे

विसर जे होऊन गेले पूर्वी कधी
ती मने तू, मोडलेली जुळवून दे

हट्ट रीतींचा फुका का व्हावा असा
जे सुखाच्या आड येते, सोडून दे

आठवांची आज का ही छळती भुते
त्या भुतांना भूतकाळी गाडून दे

पांघरायाही इथे ज्यां

बोलण्याने बोलणे वाढेल आता

बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोललो नाही तरी चालेल आता

देव सत्संगांमध्ये बंदिस्त झाला,
तो कसा दीनाघरी धावेल आता?

हातघाईने पुन्हा भांडून घेऊ,
काय चर्चेने गड्या साधेल आता

या नदीला पार केले पापण्यांनी,
वेदनेचा घाटही लागेल आता

पोरके याहून भीषण दुःख नाही
- कोण मज समजेल, समजावेल आता

नीज कविते, जागण्याची 

...नकोशा रात्री !

...नकोशा रात्री !

टाळून कुठे टळतात नकोशा रात्री... ?
अंगावर कोसळतात नकोशा रात्री... !

दिसतात तशा या शांत जरी वरकरणी
आतूनच खळबळतात नकोशा रात्री !

बेहोष, सुगंधी, धुंद, हवीशी स्वप्ने...
वाऱ्यावर दरवळतात नकोशा रात्री !

मी हाकलतो...पण लोचट जाती कोठे...? 
दारातच घुटमळतात नकोशा रात्री !

डोळ्यांत व्यथा दडवून कितीही ठेवा

घोळ


कोरडे ओहोळ आता
मधु विना मोहोळ आता


एक भाकर,लाख तोंडे
रोजचा हा घोळ आता


थाप दारावर कुणाची?
गप्प गल्लीबोळ आता


देश काळोखी बुडाला
थंड का 'दाभोळ' आता?

'ते' हजारो जहर प्याले
'सदनि' गदारोळ आता!


'चूक ह्याची ,चूक त्याची'
 कागदी हिंदोळ आता



(जयन्ता५२)



आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

...देऊ नये !

आसवांना ओघळू देऊ नये !
दुःख दुनियेला कळू देऊ नये !

तोल जातानाच का हे जाणवे...
...तोल केव्हाही ढळू देऊ नये !

एकटी सोडू नये संधी कधी
दूर संधीला पळू देऊ नये !

खूप झाले एवढे केले तरी - 
फूल फांदीचे गळू देऊ नये !

शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र