गझल

गझल

शब्दांमधुनी जगण्याशी

शब्दांमधुनी जगण्याशी मी भांडत जाता
कोंडा उरतो जगण्याला या कांडत जाता

थोर जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले
फोटोंमधुनी नुस्ती तत्त्वे टांगत जाता

पंख गळोनी धरतीवर मी पडेन तेव्हा
फक्त थांब तू, जन हे सगळे पांगत जाता

पूर होउनी कशा माती वाहुन न्यावी?
झिरपत जावे थेंब थेंब अन् सांडत जाता

देव नव्हता तरी...

देव नव्हता तरी भाकून गेले
स्वार्थ आपापले हाकून गेले

तोतयांची जशी बरसात झाली ...
शब्द माझे मला टाकून गेले

शिंकली ना तशी माशी कुठेही...
दैव कोठेतरी खाकून गेले

आज आपापले हिस्से मिळाले
आज संबंधही फाकून गेले

काय देऊ तुला दर्शन मनाचे !
तेज माझे मला झाकून गेले

जाणले आजही त्यांचे

घुटमळते मन अधांतरी

घुटमळते मन अधांतरी

अधांतरी घुटमळण्यामध्ये जन्म उरकला सारा
खूप उभारी उडण्याची पण असुया धरतो वारा

पुसतो सदा आसवांना तो पदर भूमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो "आली जाग शिवारा?"

रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो
पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?

मोरपिसाचे रंग लेवुनी, ढगांस

पालखी

'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!

दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला

आयुष्यात रचेन एक कविता

पेटवणार मनातले धुमसते वैफ़ल्य केव्हातरी
आयुष्यात रचेन एक कविता जाज्वल्य केव्हातरी

एकच तास कुठे समोर असतो दिवसात तू आणि मी
याहीहून प्रदीर्घ काळ टिकवू हे शल्य केव्हातरी

घडवा रोज प्रसंग जे शिकवती श्वासास थांबायला
आवश्यक इतकेच फ़क्त असते कौशल्य केव्हातरी

पोटार्थी भरतात पोट गणिका निर्वस्त्र झाल्यावरी
कामार्थी उठतात घेत अपुले

करा साजरे वनवास काही ....

******************
******************

तसा ना सुखाचा त्रास काही
उसवती नवनवे भास काही

कशाला मनाचा कोंडमारा
कशाला हवे पथ्यास काही

सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही

कसा इभ्रतीचा तोल गेला
मिळाले असे फर्मास काही

जगण्या अपात्रच जे तयांच्या
तिजोरीत भरपुर खास काही

जुळावी मनें..ओठी जुळावे
मिटावे मुके संन्यास काही

रिताच पेला

पाऊस वादळाचा सारे कुटून गेला,
भा॑बावल्या जिवाला वारा लुटून गेला !.....१

हाती अखेर माझ्या आला रिताच पेला
खोटेच झि॑गताना तोही फुटून गेला !.......२

सोडून मोह सारे, केली तुझीच इच्छा
तेव्हाच नेमकासा तारा तुटून गेला !........३

त्या मैफिलीत, साधा ऐकून शेर माझा
शेजारचा कवी का रागे उठून गेला ?......४

कारागॄहात, आम्ही

ऋतुंची ऐकली कुजबूज मी

ऋतुंची ऐकली कुजबूज मी... लावण्य आल्यावर
मला कळवायचे नाहीस का तारुण्य आल्यावर?

जगामध्ये मला धाडायचे होतेस देवा तू......
हवा तो चेहरा धारायचे नैपुण्य आल्यावर

सुखे येतात कुठलाही इतर पर्याय नसला की
उजवती लेक कोठेही जशी वैगुण्य आल्यावर

अता वाल्मीकि वाल्या जाहला,..... हसली मुले बाळे
कुणी वाटेकरी नव्हता नशीबी पुण्य आल्यावर

रांगले होते

शिकलेल्या मेंदूला बाजारी मांडले होते
परदेशी पैशासाठी ज्ञानी भांडले होते

सुख पाण्या पोराने नातेही लांघले होते
थकलेल्या बापाने जीवाला सांडले होते

गरिबीच्या शापाने दैवाला गांजले होते
भलत्या हावेला स्वार्थाने ओलांडले होते

बघणारे वेडी स्वप्ने सारे आंधळे होते
नसत्या आशेला त्या काळाने कांडले होते

परक्या देशाच्या त्या मीठाने बांधले होते
फसव्या

कवी

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू
पहा पुन्हा हे नभांग सारे उजाडताहे!

असाच जातो जिथे दिशा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी विसावताहे!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून