गझल

गझल

बोलणे माझे ...

बोलणे माझे निखार्‍यातून आहे
सावली तितकीच हृदयातून आहे

भाग्य मिळवायास आहे फार सोपे
फक्त तिथला मार्ग काट्यातून आहे

घेतली आहे कुठे मी आजसुद्धा..?
ही नशा माझ्याच जगण्यातून आहे

भेट होते रोजची , पण प्रश्न उरतो...
आजही संवाद दारातून आहे

भय कुणाला वाटले इतके कधी ? जे -
आपल्या एकत्र येण्यातून

गप्प नसती लोक काही नेमके पाहूनही

गप्प नसती लोक काही नेमके पाहूनही
शोधती खोली जळाची ते दगड टाकूनही..

तापते ,भेगाळते ती , ठेचली जाते कधी
ही धरा फुलते परंतू एवढे सोसूनही

वादळाची एवढी का वाटते भीती तुला
बदलले ना सत्य कोणी फार घोंघावूनही..

झोत वार्‍याचा जसा येतो तशी उडती फुले..
तू जिथे जातो तिथे पोचेन मी

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी

न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी

..... पुन्हा पुन्हा !

दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा

हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा

चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा

आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा

माज ही

मी क्धी ना अड्वले

घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

पूल ना भिंती बांधल्या तू कशाला?
माज ते सारे, मी कधी ना अडवले

आवडाया मी लागलो आज तूला
प्रेम ते सारे, मी कधी ना

हात माझे फुलांनी ही पोळले होते.....

हात माझे फुलांनी ही पोळले होते
पावसाचे फुवारे ही बोचले होते.....

रेशमी बंधने ही फासा परी झाली
केवड्याला भुजंगानी वेढले होते....

रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?
मी च स्वप्ना मधे त्याला चोरले होते.....

दुखः का एवढे भारी वाटते आता ?
केशराच्या परागानी तोलले होते.....

घेत आहे मद्यपींची

भक्तीविभोर....!!

भक्तीविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला

आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला

दूधादह्यास आता कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

प्रेमात वारसांच्या स्वहिता भुलून गेला

भेटत राहू

वसंत येवो, येवो श्रावण..भेटत राहू
मनातले सांगण्यास आपण भेटत राहू

थोडा थोडा दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत राहू

ठिकाण बदलू, वेळा बदलू, मुद्दे बदलू
करु बदल पाहिजे तसा पण भेटत राहू

भेटायाचे हेच खरे तर वय आहे ना?
घालवू नको सोनेरी क्षण..भेटत राहू

बोलायाला हवेच काही, असे न

काही वेळा.....

काही वेळा कोणीही नसणे
काही वेळा कोणीही असणे

शाळेची मधली सुट्टी..... जीवन
डबा खायला कोठेही बसणे

संसाराचे हैंडल एक धरे
अन दुसऱ्याने पैंडल हापसणे

बोलण्यासही वेळ नसे... त्यांच्या
आनंदासाठी कंबर कसणे

एक जुनाबाजार मनांचा हा
भाव कमी... वापरलेली असणे

मुद्देसुद चर्चा म्हणजे केवळ
एकाने दुसऱ्यावरती ठसणे

वैवाहिक आयुष्य असावे हे

इथे असतीस तर तू.....

किती बर्फाळलेला क्षण... इथे असतीस तर तू?
उबेला आपले आपण... इथे असतीस तर तू...

हिमाच्छादीत शिखरांनी स्वतःला रमवतो मी
मला नसतेच हे कारण... इथे असतीस तर तू

ऋतूंनी ग्रीष्म बेमालूम गोठवलाच असता
वसंताच्या पुढे श्रावण... इथे असतीस तर तू

तुझी पूजा, गुलामी, प्रार्थना, वरदान, शिक्षा
इथे नसतीस निष्कारण..... इथे असतीस