गझल

गझल

तुझ्या येण्यामुळे

तुझ्या येण्यामुळे घडावे सारखे
तुझ्यावरतीच मी मरावे सारखे

तुझा नव्हतो तशी फकीरी घेतली
अताशा वाटते सजावे सारखे

कुणाचे नावही नकोसे वाटते
तरी हृदयांत का उरावे सारखे ?

तुला भेटून मी किती आनंदलो
असेही वाटले निघावे सारखे

'मिळावी भाकरी' कुणी आक्रोशतो
मरण जगण्यातुनी दिसावे सारखे

चघळतो भाकरी,नसे पाणी तरी..
असे जीवन

संताप

संताप
-----------------------------------------------------------------
हा नसे अभ्यास आणि हा नसे आनंदही,
गीत हा संताप माझा आतला आवाजही....

कैकदा प्रत्येकवेळा मी जरी नाकारले,
गीत आहे प्राण माझा घेतलेला श्वासही...

भोगलेले शाप सारे मोजले नाही कधी,
लेखणी उ:शाप आहे आसरा आधारही...

का सुखाला हाक देण्या शब्द होते धावले,
दूर गेले स्वप्न झाले पोरके आभासही

पेटतो सोहळा...

पेटतो सोहळा आता कुठे ?
जागतो 'मी' तसा आता कुठे ?

का मनीं दाटल्या सार्‍या व्यथा ?
[बोलतो चेहरा आता कुठे..?]

जन्म झाला ! मिळाला चेहरा..!
हा हवा, तो हवा.. आता कुठे ?

भीक मागायला लोंढे किती..
एकही चोर ना आता कुठे..!

आस नाही तुला भेटायची
राहतो मोकळा आता कुठे

खुशाली

खुले चेहरा अन् खुळी लाज गाली
समजली जगाला गुलाबी खुशाली

जसे वेगळे भास नजरेतले अन्
तशा वेगळ्या आतल्या हालचाली

विडा रंगुनी जायचा रात्र सरता
नभी उमटुनी जायची शुद्ध लाली

पुन्हा लागला एक चकवाच बहुधा
खरी वेगळी वाट केव्हाच झाली

तुझ्या आसवांचे निराळेच दावे
तुझे वागणे काढती ते निकाली

अभागी सुखाचा

प्राक्तन फ़िदाच झाले

प्राक्तन फ़िदाच झाले

प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना

हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना

पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना

द्रव्यापुढे द्रवीतो का

मॄत्यू अर्धविरामावस्था

अनेकदा मग असे वाटते
हे होणे आवश्यक नव्हते

यात्री बनतो प्रवास अवघा
किंबहुना मग वाटच सरते

हे कोणी केले वोडंबर
माझी तृष्णा जळते विझते

मॄत्यू अर्धविरामावस्था
रेषा रेषा जेथे जुळते

माये भिक्षा वाढुन देजो
कल्पांतीचे आले भरते....

काव्य जगावे

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न. सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल शिफाई यांच्या 'अपने होटोंपर सजाना चाहता हूं' या गझलचा स्वैर भावानुवाद.

ओठांवरती तुज सजवावे
गीतापरि गुणगुणत रहावे

लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे

या विश्वाचे तम मिटवाया,
मी माझे घरटे जाळावे

तुला पुरेसे स्मरून झाले,
अता तरी तू मला

रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते

रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते
जहरील्या फुत्कारांनी हे विश्वच तापत असते

ही ओळख नको कुणाशी मैत्रीही नकोच आता
दे इमेल, फोन व पत्ता ती नुसती बोलत असते

तो तसाच बोलत असतो मी केवळ ऐकत असते
बाहेर बर्फ अन् मागे आधणही वाजत असते

नेहमीच कसे विरोधी येतात विचार मनी

बघ तुझे माझे बिनसले शेवटी

फार ते चिकटून बसले शेवटी
सर्व काटे मी उपसले शेवटी

मी तरी सांगायचो.... माझीच हो
बघ तुझे माझे बिनसले शेवटी

साधले नाही चुका काढायला
प्रेमही ठरवून रुसले शेवटी

ओळखी रस्त्यातल्या रस्त्यामधे
पण मनापासून हसले शेवटी

जे स्वतःलाही कधी टाळायचे
ते मलासुद्धा तरसले शेवटी

केवढी विरहामधे क्षमता तरी...
केवढे श्रावण बरसले

कधीच नाही

का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही

त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही

बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही

डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही

जखमा दिल्या