गझल

गझल

वारुळे

वारुळे निराशांचीच फोडतो मी
देवळे दिलाशांचीच जोडतो मी

बाटले कसे संस्कार खानदानी
पावले विनाशांचीच खोडतो मी

रोज नाचलो गुर्मीत जीवघेण्या
वाट त्या तमाशांचीच सोडतो मी

धावलो जरा वेगेच मी जगाया
दाट लाट श्वासांचीच जोडतो मी

सोडले मला अर्ध्यात आज ज्यांनी
साथ त्या हताशांचीच तोडतो मी

नेहमीच ते सामील कौरवांना
जात

स्वप्नभूमी

ऐक तू माझे जरासे मी कसा साकार झालो
मी तुझा झालो उसासा की तुझा सुस्कार झालो

बोलते सारेच काही हृदयाची लाल स्याही
का मुकया अद्याक्षरांचा मी नवा उच्चार झालो

धुमसल्या होत्या स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन् विस्तवासा गार झालो

चांदण्या शोषून सार्‍या गोठलो होतो स्वताशी
जवळ तू आलीस

कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो

कधी मीच शून्यात आकुंचतो
कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो

तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो

लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?

गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?

स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..

कशाला जगाचीच चर्चा हवी

छान रमल्यासारखे

वागतो आहोत वादळ पूर्ण शमल्यासारखे
भासतो आहोत आपण छान रमल्यासारखे

भांडणे डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर नरमल्यासारखे

एकमेकांच्याविना ताजेतवाने एरवी
भेटतो आलिंगनी नुकतेच दमल्यासारखे

एकमेकांना चुका माहीतही नसतात पण
चेहरे सवयीमुळे होती वरमल्यासारखे

हावभावातून नात्याची शिसारी सांडते
आणि मुद्दे मांडले जातात नमल्यासारखे

मीलनाची सांगता होईल तेव्हा भासणे.......
मी

पाहुनी तुला

पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी

आज ये निवांत भेटण्यास तू
आज मी घरी बरीच मोकळी

ये नि फक्त स्पर्श कर जरा मला
बघ, फुलेल एक एक पाकळी

जर तुझे तळे मला न लाभले
तडफडेल ही तुझीच मासळी

ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...

आभास मीलनाचा..

आभास मीलनाचा..

केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला

तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला

पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची
येता थवे निवासा, मग मेळ खास झाला

विरहात

छल्ला

आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि ’विसरावे’ असा जोडीस सल्ला

अर्थ ’नाही’चा अता ’नाही’च आहे
मारला आहेस तू भलताच पल्ला

माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला

भेटला मद्यालयामध्ये मला यम
मी म्हणालो ’घे’... म्हणाला ’काय मल्ला!’

शायरी हाडात लपते छानपैकी
मारते दुनिया मनावर फ़क्त डल्ला

मित्र परिवारासहित दिसतात

व्यथा

व्यथा

जितके जमेल तितके अडवीन मी व्यथांना
नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना

केला प्रयास जर का त्यांनी लढावयचा...
नक्की क्षणाक्षणाला रडवीन मी व्यथांना

त्यांना हिर्यांप्रमाणे समजेन यापुढे मी
नशिबासवेच माझ्या घडवीन मी व्यथांना

एकेक अपयशाला हटवीन पार मागे...
अन् ठोकरीत एका उडवीन मी व्यथांना

कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा

खोटे असते हळहळणे

खोटे असते हळहळणे
खरे आतले मळमळणे

कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे

सहन कसे मी करू प्रिये..
फुकट कुणाचे सळसळणे ?

मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे

बातमी तशी खोटी, पण...
पाहिले तुझे कळवळणे

तारका जिथे चमचमल्या
दिसे तुझेही घुटमळणे

तुझ्याबरोबर फुलूनही..
जमले नाही फळफळणे

जीवन झिजले पदोपदी
उगाच

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा

तुझ्या माझ्या म्हणे झाल्या कधी गप्पा जिव्हाळ्याच्या
कुठे ती ऊब गेली.. का असा केलास बोभाटा?

फुलांना त्रास मी नाही दिला ना बोललो काही
कशाचा दंश झाला मज? ...कुणी हा टोचला काटा