गझल

गझल

खेळणे

येउनी स्वप्नात गप्पा मारते कोणीतरी
एरवी जागा अबोला पाळते कोणीतरी

खेळणे करुनी मनाचे खेळते कोणीतरी
आपले कोणीतरी मग वाटते कोणीतरी

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

मी प्रवासाला निघालो, बोललो नाही कुठे
नीट जा सांगायलाही लागते कोणीतरी

वेगळी अपुली घरे पण साम्य दोन्हीतील हे
झोपती

कविता म्हणू प्रियेला..

कविता म्हणू प्रियेला..

कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी?
साहित्यचोर टपतांना काळजीत मी

अपराध काय माझा ते तूच सांगना
लेखी तुझ्या ठरावा माझा अतीत मी

अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता
जगतो असा फ़ुलावाणी टवटवीत मी

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे जरी

माझ्या कुशीत...

..........................................
माझ्या कुशीत ...!
..........................................

माझ्यासवे निवांत बोलणार आज मी !
माझा नवाच अर्थ शोधणार आज मी !

वेडा, खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी !

आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !

काढू पुन्हा तुझा कशास

देवास ज्ञात आहे (अल्लाह जानता है)

सारे भले-बुरे ते देवास ज्ञात आहे
वसते मनात जे ते देवास ज्ञात आहे

जाऊन जेथ कोणी, परतून येत नाही
स्थळ कोणते असे ते, देवास ज्ञात आहे

लपवून ठेविशी का तू पाप-पुण्य अपुले?
जे ज्ञात व्हायचे ते देवास ज्ञात आहे!

फिरते उषे-निशेचे अन् ऊन-सावल्यांचे
हे चक्र कोणते ते देवास ज्ञात आहे

मोगरा

रंगलास तू खुडून मोगरा
लपविलास तू म्हणून मोगरा

भाळले गुलाब शेकड्यावरी
माळला तुला बघून मोगरा

रंग उधळलेस तू कितीतरी
पांढरा असे अजून मोगरा

घेतला गुलाब, बोचलाच तो
नेमका तिथे हसून मोगरा

पाहतो नभात रंग केवढे
एकटाच सावरून मोगरा

काळजात प्रश्न एवढाच की,
बोचला कसा... असून मोगरा ?

वाट वाकडी किती

नको आणखी

फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच

घराणी

सांगू नको रे माणसा अपुली घराणी
जाते पुन्हा ती माकडांपाशी कहाणी!

ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!

गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!

आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!

मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या

पक्षी

वाटायचे उडणार नाही पण उडाला शेवटी
हा पिंजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी

मी उत्तरे देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा निघाला शेवटी

आल्या क्षणापासून मी रमलो मरेपर्यंत पण
कळलेच नाही मी इथे होतो कशाला शेवटी?

दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते

धोका

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

आपला फासा न यावा आपल्यावर...

कोणती धुंदी चढावी काळजावर ?
ना तसे काळीज उरले धुंदल्यावर..

लढ जसे तू पाहिजे पण काळजी घे..
आपला फासा न यावा... आपल्यावर

'सांगणे त्याने घराणे बंद केले...'
स्वप्न ही पडतात हल्ली जागल्यावर

बोल तूही जे जसे बोलायचे ते
काय कामाची प्रसिद्धी...? झाकल्यावर?

आपले संबंध इतके मोकळे की,
मोकळे वाटून गेले