गझल

गझल

केवढे छान दिवस होते ते

मी तुला पाहताच तू बघणे, केवढे छान दिवस होते ते
आणि कोणास ते न जाणवणे, केवढे छान दिवस होते ते

तू दिसावीस एवढी इच्छा, वाट माझीच पाहणे तूही
आणि दिसताच मी, तुझे लपणे, केवढे छान दिवस होते ते

खूप गर्दी सभोवती असणे, एकमेकात गुंफणे डोळे
मान फिरवून तू हळू हसणे

|| मुखवटा ||

|| मुखवटा ||
.

वृत्त : आनंदकंद ( गागालगा लगागा गागालगा लगागा )

|| मुखवटा ||
---------------

ग्रीष्मात थाटलेला, खोटा वसंत आहे
हा साज चेहर्‍याचा, कावा निरंत आहे

मी पाप काय केले, नक्कीच जाण त्याची
आतून मी हरामी, बाहेर संत आहे

हे काम क्रोध माझे, आहेत मित्र पक्के
मोहात रंगतांना

कुपी

वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची
भावनांना कैद आहे रोखलेल्या आसवांची

यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा
सोसवेना धग अताशा कोवळ्या या चांदण्याची

एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची

वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची
नेम धरुनी सज्ज आहे नजर तिरकी वारियाची

हे जीवना तुझी टपरी चालते मला

वेळेस ही नशा दुखरी चालते मला
हे जीवना तुझी टपरी चालते मला

ही सूट माहिती नव्हती, आज जाणली
केव्हातरी छटा हसरी चालते मला

वाकून वाट आठवते, एवढे पुरे
माझ्या-तुझ्यात खोल दरी चालते मला

रजकापुढे नमून म्हणे 'चाचणी करू'
'बोरास चालते शबरी', चालते मला

गजलेत हारणे जमले, एवढे पुरे
काही असो

ठराव नक्की मिळेल अंतर

सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर

तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर

तया जनाची न ती मनाची
निलाजर्‍यांचा बने सिकंदर

उगाच तुमचे हिशेब झाले
कुठे तुम्ही अन कुठे कलंदर

हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर

चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे

नकार गर्भरेशमी

जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी

कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी

कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?

कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय

सोडले तेंव्हा तुला...

सोडले तेंव्हा तुला रागात आम्ही..!
आज नाही कोणत्या वादात आम्ही..!

बिंग फुटले आमच्यावर हासण्याने;
मोजले तुमचे दुधाचे दात आम्ही..!

नेहमी येते गळ्याशी का कळेना...
पाडली होती कुठे बरसात आम्ही..!

प्रेम हे समजेल का त्या काळजाला?
की तसे समजायचे प्रेमात आम्ही..?

जा तुलाही पाहिजे ते ते करुन घे!
ठेवली आहे जरा

काळजावर वेदनांची चाल आहे

काळजावर वेदनांची चाल आहे
'हासणे' माझी पुराणी ढाल आहे

काल ज्याची मागणी संपून गेली
आणला मी नेमका तो माल आहे

ते म्हणाले 'खा हवा अन् आसवे प्या'
'बांधवानो, हे सुगीचे साल आहे!'

द्या मते,लक्षात ठेवा की निशाणी
'पाच बोटे उमटलेला गाल आहे!'

सम जुळेना कां सुखाशी एकदाही?
जीवनाचा, हाय! चुकला

पहा, शांत झाला..

किती खाज होती, किती खुमखुमी
पहा, शांत झाला अबू आझमी

अता हाच संदेश देशामधे...
...मराठी कुठे राहिली संयमी?

'महाराष्ट्र देशी नुरे सभ्यता'
--अशी वाहिन्यांवर मिळे बातमी

जुना बाप जर्जर मराठी तुझा
नवा बाप देतो हिताची हमी

कसे काय पत्ते कुणाचे पुढे...?
खरे मात्र हे, राजची ही रमी !

क्षणांची मीलने

क्षणांची मीलने देतात 'कालातीत' संतुष्टी
मला जाणायची नाही तुझी माया, तुझी सृष्टी

नवे काहीच नाही का तुझ्या विश्वामधे देवा?
तिथे आधीच असते मन जिथे पोचेल ही दृष्टी

दिसेना पंच डोळ्यांना, कसोटी चालली आहे
पुन्हा मागायची खेळी, पुन्हा सोडायची यष्टी

म्हणाले जानवे 'पेला जरा थोडा भरा माझा'
तशी जाणीव झाली की