गझल

गझल

मागचे जाती पुढे

मागचे जाती पुढे मग खालचे येती वरी
आपली कोणीच आता ओळखे ना पायरी

झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी

मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
मित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी

वेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी
कोणते भय घेतले त्यांनी जपायाला

का हवी असतात तेव्हा नेमकी रुसतात नाती?

का हवी असतात तेव्हा नेमकी रुसतात नाती?
का सुरू होतात तेव्हा स्वप्न दाखवतात नाती?

ते जिथे भेटायचे ती बाग ते विसरून गेले
गंध बेसावध क्षणी तेथील आठवतात नाती

आपले ते आपल्याला नेमके माहीत असते
दाखवायाला जगाला वेगळी असतात नाती

असुन आरक्षीत जागाही, जशी गाडीच चुकते
पाहिजे असतात तेव्हा नेमकी नसतात

ते पाखरू दिवाणे

ते पाखरू दिवाणे दिनरात गीत गाते
नेतील पंख तेथे घेऊन सूर जाते

ते एकटेच फिरते, ते बांधते न घरटे
ते गुंतते न कोठे, ते जोडते न नाते

दिसला कधी न त्याच्या चोचीत एक दाणा
बळ आणते कुठोनी,पोटास काय खाते?

कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणा
प्राशून आसवे ते मग

यातूनच माझे दैव सदा घडलेले

यातूनच माझे दैव सदा घडलेले
जे रस्त्यावरती ओवाळुन पडलेले

सुखशय्येची का नीज मला भावेना?
हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले?

ही आयुष्याची गाडी लागत आहे
या वासाने अस्तित्वच भडभडलेले

ही पिढ्यापिढ्यांची कमाल आहे मित्रा
की रडणार्‍यांना सावरती रडलेले

तू पूर्णपणे गेलास विसरुनी की मग
मिळते तेव्हा... केव्हाचे आवडलेले

का दगडांवरती भक्ती

अलिप्तता

मनामनामधे दडून राहिली अलिप्तता
मिठीत देह गोठले तरी उरी अलिप्तता!

मिठासदार चार अक्षरे वदून, अंतरी
कशी अभिन्न भावशून्य राहिली अलिप्तता?

धुमार पावसातही भिजून अंग कोरडे
अशी जडून कातडीस राहिली अलिप्तता!

अफाट ज्ञान सागरासमान लोटले तरी
इथे दडून शिंपल्यात राहिली अलिप्तता!

कुणी जगा सुखाविण्या अरण्यवास भोगतो
अशी कुठेतरी दिसून ये खरी

मनाला

धरू कसे बेबंद मनाला?
नकोच होते पंख मनाला!

इथे-तिथे फिरते, भरकटते
कसा नसे निर्बंध मनाला?

दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला

सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला

तिथे तुझी लाटांवर होडी,
इथे छळे आतंक मनाला

कसे, कधी तू सांग वाचले
खळाळत्या स्वच्छंद मनाला?

अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख

----पुन्हा का----

फुका का हसावे उगा का हसावे
असे हे हसू पुन्हा का हसावे ..

जमिनीत रोवून आभाळात जावे
पाण्यात न्हावुन पुन्हा का रुसावे

चिखलात कमळ फुलवित आहे
आपलीच भ्रांत पुन्हा का पुसावे

कोकिळिचा आवाज दूर गात जावे
कावळ्याला त्या पुन्हा का कुसावे

चोरीच्या जाळ्यात चोरानेच जावे
आपुलेच ठसे पुन्हा का ठसावे

नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे

नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे

नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नकोच तेच लाजणे नकोच दूर सारणे

इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे

तनामनात आजही तुझाच श्वास राहतो
फिरून आठवे मला तुझेच छेड काढणे

जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला

मी मोरपीस व्हावे -

मी मोरपीस व्हावे
गालावरी फिरावे,

मी एक फूल व्हावे
केसात नित रहावे,

मी एक झुळुक व्हावे
पदरास झुळझुळावे,

मी एक बोट व्हावे
दातामध्ये रुतावे,

काही जरी मि व्हावे
मजसाठि तू असावे !

बहुधा

त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे

शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे

भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे

मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा