गझल

गझल

चला 'बेफिकिर', जायची वेळ गेली

तुला ते विचारायची वेळ गेली
अता हक्क वाटायची वेळ गेली

तुला कारणे एवढी लाभली की
'तुझी कारणे' व्हायची वेळ गेली

कसा वेळ गेला तुझा आणि त्याचा?
कसे 'भान ठेवायची' वेळ गेली?

अता पाहणे वाट 'त्या' वेळची ... बस
अता वेळही जायची वेळ गेली

तुझी चूक की चूक माझी असावी?
तुला

...फर्मास गप्पा !

...............................
...फर्मास गप्पा !
...............................

नेहमी जो उत्तरांनी टाळलेला !
प्रश्न आहे एक मी रेंगाळलेला !

खूप दिवसांनी मने बहरून आली...
...आणि हा एकांतही गंधाळलेला !

वावरे तो सावली होऊन माझी...
जीव कोणाचा तरी घोटाळलेला !

तू समुद्राच्या नको मारूस बाता...
फेस हा त्याचाच तू लाटाळलेला !

तू कशाला आणशी

जशी रात्र झाली...

जशी रात्र झाली, तुझी याद आली
तुझी याद आली, तुझी याद आली

लयीच्या विना हे सुने शब्द माझे
जरा बांध चाली..तुझी याद आली

इथे ऐकतो मी तुझी श्वासमाला
हवा दूत झाली..तुझी याद आली

पहायास ये झुंबरे तारकांची
सखे ये महाली..तुझी याद आली

अशा शांत वेळी कुठे मी स्वतःचा ?
तुझ्या

मंत्र

जगण्यास मंत्र व्हावा माझेच गान आता
अन् पावलास यावे रस्त्यात भान आता

सत्यास लाटले या लाचार पंडितांनी
लपले कुठे सुखाने संतप्त ज्ञान आता ?

तलवार वा सुऱ्याने मज मारता कशाला ?
शब्दास धार लावा तुटण्यास मान आता.

माझी खरी कहाणी तू ऐकली कशाला ?
दु:खास आसवाचे देशील दान आता

किनारा गाठण्यासाठी

कसाही का..! दिला होता सहारा वाहण्यासाठी
प्रवाहाला कसे सोडू किनारा गाठण्यासाठी?

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
अता लांडोरही मागे पिसारा नाचण्यासाठी

मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा देत जा सोपा, 'इशारा' वाटण्यासाठी

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

पुन्हा जातो जगामध्ये उभारी घेत

अंगार

सोसायचे किती? अंत नाही..आकार नाही,
चालायचे किती? आयुष्यही फार नाही...

माझ्याच रेशमाचे फास माझ्या गळ्याशी,
सापळ्यांमधून कोणी वाचणार नाही...

उगाच रानटी किड्यांनो पालवी खाऊ नका,
अडवून हा वसंत थांबणार नाही...

थोपवू कशा विषारी जिव्हांच्या कट्यारी,
माझिया सत्यास कोणी आज आधार नाही...

उघडून कितेक भोळी आसवेडी लोचने,
स्वप्नेच वाटतो मी हा

एवढे फिरून..

===================
"एवढे फिरून सांग काय तू कमावले?"
थांबताच मी, मला विचारतात पावले

चाललो धरून दाट सावली मनातली,
मी मला उन्हात ना कधीच आजमावले..

मी फुलायची मिजास बाळगू तरी कशी?
रोपटे नवीन मी कुठे अजून लावले?

काय ही रसायने अबोल पापण्यांमधे-
तू भरून पाहता, मला भरून पावले!

खोल ते घड्याळ, आज

शेवटी झोपायचे आहे सदासाठी तुला

जीवनाच्यासारखा तूही लळा लावू नको
जीवनी येऊ नको, आलीस तर जाऊ नको

देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे पाळतो?
माणसा माणूसकीची बंधने पाळू नको

जन्म घेताना प्रवेशाच्या अटी ऐकून घे
आसवे जोपास बाळा, आसवे त्यागू नको

शेवटी झोपायचे आहे सदासाठी तुला
झोपही येणार नाही एवढा जागू नको

एकनाथाने समाधी माउलीची

खुशाली

एकेक स्वप्न मातीतुन उगवत जाते
मी आठवणींचे वावर तुडवत जाते

तू समोर येता गीत नवे रुणझुणते,
शब्दांत तुझ्या स्पर्शांना रुजवत जाते

टाके कधि तुटती, कुठे निसटतो धागा,
नात्यांची विरली वाकळ उसवत जाते

काही न बोलता गुन्हेगार ठरलेली
मी, मान तुकवते; मलाच फसवत जाते

पोटिची भूक चंद्रात भाकरी बघते,
व्याकुळ मन

कधी करावी सकाळ

कधी करावी सकाळ हा कारभार सुर्याकडे नसावा
दिलाच चंद्रास हक्क तो तर प्रकाश चंद्राकडे नसावा

अरुंद वाटेवरून गाडी पुढे पुढे रेट जीवनाची
अजातशत्रू बनायचा राजमार्ग दैवाकडे नसावा

सकाळ होताच वाटते की असा कसा काल वागलो मी
('असेनही मी उद्या' असा दृष्टिकोन माझ्याकडे नसावा)

जगात मंदी असूनही तू नफ्यात येणे अशक्य