गझल

गझल

चाललो निघून मी

बंद घे करून दार...चाललो निघून मी
पावले न थांबणार..चाललो निघून मी

सारखा कसा फसेन हासण्यास त्या तुझ्या ?
मी बये तसा हुषार..चाललो निघून मी

हा तुझ्यामुळेच घोळ, तूच निस्तरून जा
फक्त तू जबाबदार --- चाललो निघून मी

राहिलीस तू अजिंक्य एवढे करुनही
चल, मला कबूल हार..चाललो निघून मी

मी पुन्हा

हास आयुष्या

सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या
अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या !

कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फ़ुलणे
दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या !

तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या

जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी
तसे माझे तरी

आहे मीही...

आहे मीही ओढा साधा ओसरणारा!
वरवर केवळ अथांग सागर भासवणारा!

रोजच पडतो प्रश्न अताशा निजताना, का..
दूर राहिला हात मलाही जोजवणारा?

अजून मजला समजत नाही समोरचेही
जणू आंधळा हत्तीला मी चाचपणारा!

अबोल अश्रू म्हणजे निव्वळ खारट पाणी
आक्रोश हवा काळिज अवघे पिळवटणारा!

प्राणीमात्रांच्या हव्यासा अंत कोठला?
उडण्याचीही इच्छा धरतो सरपटणारा

गातो तुझेच गाणे

माझे न हे तराणे! गातो तुझेच गाणे
लांगूलचालनाचे हेही नवे बहाणे

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ओकून टाक सारी मळमळ तुझ्या मनीची
पचनी मला पडेना बसणे मुक्याप्रमाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी

मी मोकळा

आसवांच्या साखळ्या ओवायला मी मोकळा
भावनांना मोकळे सोडायला मी मोकळा

स्वैर शब्दांनी मने उध्वस्त केली केवढी
वादळाशी वारसा जोडायला मी मोकळा

चेहर्‍याने झाकल्या कित्येक नाती जोडली
आरशाशी बोलणे तोडायला मी मोकळा

गीत गाताना सुरांनी काळजाशी टाकले
शब्द सारे पोरके पोसायला मी मोकळा

चाकरीला ठेवलेले सूर्य सारे पांगले
आज माझी सावली

हवे मधे किती छान गारवा होता.....

हवे मधे किती छान गारवा होता
मना मधे किती शांत पारवा होता !.....१.

पळो पळी कशी सारखी मजा येते
तसा विस्तव नी आत गारवा होता !.....२.

कसे मला भिजवतात गार हे वारे !
मना मधे पक्षी गात मारवा होता.....३.

कुठे तरी विषादात सावली शोधू
जिथे बघू तिथे आज रानवा होता

दवबिंदू

तू जीवनात नाही आता कळून गेले.
वरदान आसवांचे मजला मिळून गेले.

दिसती नभात काही घन कृष्ण पावसाचे,
हे नेत्र वर्षले अन् ते घन निघून गेले!

शोधीत तेच धागे फिरतो अजून मीही...
ते बंध रेशमांचे सारे तुटून गेले.

आता किती मी आणि उजळू तुझ्या स्मृतींना...
साठ्यांत शून्य आता आठव उरून गेले

कुठे तरी काही तरी जळत होते .....

कुठे तरी काही तरी जळत होते
मना मधे काही तरी सलत होते.....१.

नवी नवी नावे मला दिली त्यानीं
कधी मलम, ज़ख्म़ जुनी , हसत होते !.....२.

जरा कुठे बागे मधे बहर आला !
उन्हा मधे कोणी तरी रडत होते.....३.

चला जरा काही तरी नवे पाहू
नवे , जुने, स्वप्नात ही

तुझी ही बेफिकीरी 'बेफिकिर' थांबेल त्यावेळी

मला समजायचे केव्हा तुझा मी कोण आहे ते?
कधी समजायचे की नेमका मी कोण आहे ते?

स्वतःच्या वर्णनांमध्ये हयाती चालल्या तुमच्या
कुणी सांगाल का यारो मला मी कोण आहे ते?

अशासाठीच माझा जीव मीही सोडला होता
कळावे संपताना हे, तुला मी कोण आहे ते

अशासाठीच माझा जीव मी सांभाळला होता

झालास 'बेफिकिर' तू काहीतरीच आता

एकंदरीत तीही कंटाळलीच आता
अन वाटते मलाही व्हावे कवीच आता

माझा न एक दमडा, ना नाइलाज माझा
नाही तिथे कशाला बोला उगीच आता?

हेही करून झाले, तेही करून झाले
मी कोण नेमका ते सांगा तुम्हीच आता

केलेस काय तू ते कळले अता तुलाही
मीही असाच आता, तूही तशीच आता

असतात