गझल

गझल

असाच विस्कळीत मी

जरा कुठे सरावलो स्वत:त मी रमायला
लगेच पोचला तुझा सुगंध घमघमायला

कसे जगायचे कळून काय फ़ायदा अता
सबंध जन्म लागला शहाणपण जमायला

दिमाख फ़क्त दाखवून विरघळून संपलो
जसा विड्यास लावतात वर्ख चमचमायला

नको नको म्हणून पाय चालतो कसातरी
शिकायला हवे अता मनासही दमायला

असाच विस्कळीत मी, मनात ताठ भूमिका
कण्यात

करून झाले

त्याने जे जे सांगितले ते करून झाले
वार्‍याशी लावून शर्यती फिरून झाले

ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते
झाले तितके विरोध सारे घरून झाले

माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे-माझे वाद एवढ्यावरून झाले

काट्यांतहि फुलण्याचा त्याने वसा दिलेला,
झाले बहरुन पुन्हा, पुन्हा मोहरून झाले

काहीही दिसले नाही, जे

दुःख गोठलेले मी... !

...................................
दुःख गोठलेले मी... !
...................................

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
अन् कधी कुणालाही मी कळायचो नाही !

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही !

दाट दाट स्मरणांच्या जंगलात शिरलो

कचरा

ही स्वानुभवावर आधारित गझल आहे, जरी विडंबनात्मक वाटली तरी!
खरोखरच हडपसरातला कचरा डेपो (नाक दाबून) पाहण्यासारखा आहे :)
==================================
हडपसराच्या वाटेवरला कचरा डेपो कचरा खाउन पोट भरेतो फुगतो आहे
धडधडणारा पिवळा वेटर कढई उलटी सांडुन त्याची सोय उद्याची करतो आहे

येथ कवीला स्फूर्तीसाठी आकाशीच्या बगळ्यांच्या माळेशी नाही देणेघेणे
झुकझुकगाडी डुकरांच्या

फुलांना दंश काट्यांचे हवे होते.....

फुलांना दंश काट्यांचे हवे होते
गुलाबी भावनांना हे हवे होते.....१.

जराशी पालवी फुटली असावी तो
कुणाला रोपटे सारे हवे होते !.....२.

कधी बुलबुल रडावी, नी कधी माळी !
फुलानां काय हे सारे नवे होते ?.....३.

जराशी आग दोघांच्या मनीं झाली
जगाला हेच तर सारे हवे होते.....४.

फुलांचा जीव जातो ह्या

मी शशीची कोर व्हावे

मी शशीची कोर व्हावे
मुक्त रानी मोर व्हावे

खूप उंडारून झाले
की स्वतःचा दोर व्हावे

कोण लावे नाव मागे?
मीच अल्लड पोर व्हावे

जाग आली, स्वप्न होते
'बेमुरव्वतखोर व्हावे'

माणसे चरली मनावर
आज आपण ढोर व्हावे

बास झाले रोज रुसवे
एकदा घनघोर व्हावे

गप्प मी, नादामधे ती
प्रेमही चतकोर व्हावे

कर्ज

उपकाराचे तुझ्या जीवना कर्ज जुने सांभाळत आले
चुकवाया मी तुझी तारणे, किती बंधने पाळत आले

किती टाळले तरिही त्यांना माझ्यावाचुन थारा नव्हता
तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले

नभछाया वा मळभकाजळी निष्प्रभ का करते सूर्याला ?
ग्रहण क्षणाचे सुटता त्याचे किरण पुन्हा तेजाळत आले

किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी

कोण जाणे

कशाला तुझे व्हायचे कोण जाणे
किती गोजिरे व्हायचे कोण जाणे

'नकोसे न होणे' जगाने शिकवले
'हवेसे' कसे व्हायचे कोण जाणे

कधीचा मला रोग हा मीपणाचा
कधी मी बरे व्हायचे कोण जाणे

तुझा उंबराही लिलावात लाभे
कशाला पुढे व्हायचे कोण जाणे

तुझे नाव जेव्हा कधी घ्यायचो मी
कुणाचे भले व्हायचे कोण

अंतरा

शह-प्रतिशह माझ्याच मनाचे, वजीर मी अन् मीच मोहरा
अविरत दिसतो जुन्या दर्पणी मलाच माझा नवा चेहरा

खोल विवर मन, गूढ विलक्षण, अथांग गहिरे, ठाव न लागे
शांत नदीच्या पात्रामधला गहन, अनाकलनीय भोवरा

कुठे अता त्या नात्यांमधला ओलावा जपणार्‍या भिंती ?
अदृष्टाची काळी छाया थांबविणारा कुठे उंबरा ?

खुणा कालच्या विध्वंसाच्या

स्वप्नांच्या दुनियेत ...

स्वप्नांच्या दुनियेत सहज मी वावरतो
आणि खर्‍या दुनियेत यायला घाबरतो...

अपयश येते तेव्हा होतो आनंदी!
नित्य यशांचे मार्गच का मी ठोकरतो?...

कधीचाच मी गमावला माझा चेहरा
रोज मुखवटे नवे-नवे मी वापरतो...

आठवणी येतात नव्याने पुन्हा पुन्हा
अजून का मी तीच लक्तरे पांघरतो?...

शांतता मला असह्य होते कशी 'अजब'?
वादळा, तुझ्या