गझल

गझल

मुखवटा घातल्यानंतर

किती झाले तरी भासे कमी झाले
तुझेही जीवना आता अती झाले

तुझा उल्लेख केला भेटलेल्यांनी
नवल म्हणजे निराळे विषयही झाले

किती बाहेरचा झालो घरामध्ये
अता ऐकून घेतो जे घरी झाले

उगाचच जागरण झाले तुझे माझे
तिथे तू आणि मी येथे तरी झाले

जगापाशीच होते चांगले पैसे
खिशामध्ये जमवले, दगदगी झाले

पाहिजे ते..

आपला अधिकार घे खेचून आता
पाहिजे ते मिळव तू भांडून आता

शांततामय बैठकांना अंत नाही
पाहिजे ते मिळव तू भांडून आता

ऐक मित्रा, फक्त माझा एक सल्ला
पाहिजे ते मिळव तू भांडून आता

तुडविले जाऊन सारे जीव गेले
देह घे निष्प्राण ते वेचून आता

काम आठवलेच आहे तर करूया..
अन्यथा

न्यास

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी

तसा मी कधीपासुनी तोच होतो

कळेना कुठे सर्व लंपास झाले
किती राहिले नी किती श्वास झाले

प्रसंगाप्रसंगातुनी तेढ आली
क्षणानी क्षणानी जसे तास झाले

सदा तांडवे फक्त परिपक्वतेची
कधी कोवळेसे पदन्यास झाले?

कशाला तुका, माउली, मीर वाचा?
स्वतःला स्वतः जाणले, बास झाले

तुला पाहुनी आजही ओळ झाली
जसे शब्द आले, अनुप्रास झाले

'तुझा मी नि

चुंबने घेउनी जे तुला बोचले....

चुंबने घेउनी जे तुला बोचले
कोवळे तेच काटे मला बोचले.....

शोधतो रोज वाटा नव्या आज ही
ते पुराणेच काटे मला बोचले.....

जे कधी ना वनीं , डोंगरी बोचले
आंगणाचेच काटे मला बोचले !.....

आसवांची कमी ना कधी भासली
चावरे तेच वारे मला बोचले.....

मैफिली त्या जुन्या कोरड्या सोडल्या
तेच साकी

मोल

जे घडले ते तुजला बहुधा नंतर कळले होते
अपुल्यामधले अंतर तोवर फसवे बनले होते

दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते

वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते

सावध झालो तेव्हा आधी तुझी आठवण झाली
तूच मला बोलावुन

आज ही वेदना दार ठोठावते.....

आजही वेदना दार ठोठावते
ज़ख्म ओली जुनी फार लोभावते.....

औषधांचा मला काय हो फायदा ?
मीठ माझी ज़खम फार गोंजारते.....

तू न येणार हे जाणतो मी तरी
सारखी ही नज़र फार घोटाळते.....

हो तुझे रूप आहेच लोभावणे !
त्या मुळे मन असे फार लोभावते.....

तू मला जीव लावू नको फारसा

दिसतील पंख त्याचे

आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा

आहे तुझ्यात 'सध्या' ते काय नेमके ... की
येतो तुझ्याकडे मी.. कोणी नसेल तेव्हा

भेटूनही तुला का अतृप्त राहतो मी?
ठरतील काय भेटी... हेही कळेल तेव्हा?

भलताच त्रास होतो या छान वागण्याचा
टिकणार कोण आहे पचनी पडेल तेव्हा

नशीब माझे...

पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...

मी दु:खांना सामोरे गेल्यावर कळले;
या दु:खांनी होते भरले नशीब माझे...

अजूनही मी का आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...

शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...

'अजब' ठरवले मी जे

नकोशी

का असे होते कधी की मी मला होते नकोशी?
का जिवाच्या पार सलते गूढ अतृप्ती, असोशी?

मोकळे आभाळ, स्वच्छंदी भरारी पाखरांची,
कापलेले पंख माझे, कैद मी माझ्याच कोषी

तो तुला नेईल मुक्कामी तुझा होऊन साथी,
वाट चुकलेल्या प्रवाशा, का असा अस्वस्थ होशी?

कोण तू? का व्यर्थ ताठा? काय तू देशी