गझल

गझल

संपत नाही


वाद घालणे संपत नाही
श्रेय लाटणे संपत नाही

ओळ वाचुनी संपली जरी
अर्थ लावणे संपत नाही

खूप भांडणे झाली पण हे
ओढ वाटणे संपत नाही

दूरचे दिवे मोहविणारे
दूर पाहणे संपत नाही

रान पेटले भोवती जरी
शांत राहणे संपत नाही

गझल : मी तुझ्या प्रेमात आहे, तू मला ही प्रेम कर......

गझल :  ८

मी  तुझ्या  प्रेमात  आहे, तू  मला  ही  प्रेम  कर
आरसा  आहे  तुझा  मी, तू  मला  ही  प्रेम  कर....१.

जी   व्यथा  मी  रोज  माझ्या  अंतरी  सांभाळतो
आज  माझ्या त्या  व्यथेशी  तू  कसा  ही  खेळ  कर....२.

का  असावी  आज  माझ्या  काळ्जाला  काळ्जी ?
हे  वज़न नाही  गझल  की

ग झ ल : मला का तो वियोगाची व्यथा देतो ?

ग झ ल : ७

मला का तो  वियोगाची  व्यथा  देतो ?
कधी  कुंती, कर्णाची  ही  व्यथा  देतो ....१.

कधी  काढून  घेतो  तो  कवच  माझे
कधी  शापात ही  तो  दुर्दशा  देतो....२.

फुलांची  मी   मनोभावे  पुजा  केली
मला  तो  रोज  काट्यांची  मजा  देतो....३.

कधी  स्वप्नात येऊनी  व्यथा  देतो
कधी  घावात  राहूनी 

कसे झाले?

मी तुला फुले दिलेली, त्यांचे काटे कसे झाले?
माझ्या भाबड्या शब्दांचे शस्त्रसाठे कसे झाले?

थोडी तुझी, थोडी तुझ्या घराची, थोडी पिलांची,
माझ्या एका अस्तित्वाचे लाख वाटे कसे झाले?

माझ्या-तुझ्या मुक्कामाचा काल एक मार्ग होता,
चालता चालता त्याचे दोन फाटे कसे झाले?

केव्हा लुटली वा-याने वेड्या मनाची तिजोरी?
चोहीकडे गुपितांचे हे

साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको

गझल - ६.(क) : दुरूस्त आणी पुनः संपादित

साकी  मला  तू  असा, गळका  जाम  देऊ  नको
माझ्या  कमी   जिंदगीचा,  इलज़ाम  घेऊ  नको....१.

कापूर  ही  जिंदगी  माझी, फार  नाही  मुभा
निरांजनी  व्यर्थ  माला, हा  डाम  देऊ  नको....२.

हे  प्रारब्ध  जाण  की , मी  आहे  तुझा  सोबती
निष्कारणी   आशिकाचे,  ईमान  घेऊ  नको....३

गझल - ६.(ब) : साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको : दुरूस्त आणी पुनः संपादित

गझल - ६.(ब) : दुरूस्त आणी पुनः संपादित

साकी  मला  तू  असा, गळका  जाम  देऊ  नको
माझ्या  कमी   जिंदगीचा,  इलज़ाम  घेऊ  नको....१.

कापूर  ही  जिंदगी  माझी, फार  नाही  मुभा
निरांजनी  व्यर्थ  माला, हा  डाम  देऊ  नको....२.

हे  प्रारब्ध  जाण  की , मी  आहे  तुझा  सोबती
निष्कारणी   ह्या  ग़रीबाचा,  प्राण  घेऊ 

काही दशके त्याचे.... पाल्हाळ कशासाठी


हा जन्म कशासाठी हा काळ कशासाठी
अप्राप्य क्षितीजांचे आभाळ कशासाठी

तात्पर्य कथेचे ज्या बदले न कधी मृत्यो
काही दशके त्याचे पाल्हाळ कशासाठी

काढू सण एखादा ज्याला न 'उद्या' आहे
हे ईद दिवाळी वा नाताळ कशासाठी

पंखात बळे येता आकाश पुढे जाते
करतोस स्वतःला तू घायाळ कशासाठी

दुनियेत तुझ्या सध्या मीही जगतो आहे
बनतेस तुझ्यापुरती वेल्हाळ

भूमिका


पाठ वा़ऱ्याने फिरविली ती दिशा माझीच होती
मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती

 दैव दुबळे;  शाप माझा भोगते जन्मांतरी मी
राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती

 एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती

भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे?
वादळाने मोडलेली

कुठून जायचे पुढे

मला अशाच निश्चयाकडून जायचे पुढे
इथे-तिथे, कुठेतरी उरून जायचे पुढे

उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!

मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !

सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे

वाढतो आहे पसारा कागदांचा..

=================
मी  तुझ्या  गावात  नाही  येत  हल्ली
हे  तुझ्या  लक्षात  नाही  येत  हल्ली..


एकदा  शब्दाविना  संवाद  व्हावा
स्वप्न  हे  सत्यात  नाही  येत  हल्ली


या  जगाचा  वेग  इतका   वाढला  की,
गाय ही  रस्त्यात  नाही  येत  हल्ली


मोकळ्या  दारास  हे  पुसतात  वासे,
'का  कुणीही  आत  नाही  येत  हल्ली?'


आजही  ती  सांगते  ख्यालीखुशाली